शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:07 IST

दरवर्षीच येतो उन्हाळा. दरवर्षीच्याच उपाययोजना, पण फरक एवढाच तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार प्रशासनाकडून होतोय. जानेवारी ते मार्च तीन महिने निघून गेले तरी पाणी टंचाई आराखड्यातील एकही प्रस्तावित कामे झाली नाहीत.

ठळक मुद्देपाणीटंचाई योजना : तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : दरवर्षीच येतो उन्हाळा. दरवर्षीच्याच उपाययोजना, पण फरक एवढाच तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार प्रशासनाकडून होतोय. जानेवारी ते मार्च तीन महिने निघून गेले तरी पाणी टंचाई आराखड्यातील एकही प्रस्तावित कामे झाली नाहीत.जिल्हाधिकारी भंडारा यांनी यांच्याद्वारे १४ जानेवारीच्या पत्रानुसार टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी पाणी टंचाई मंजूर आराखडाची प्रत मोहाडी पंचायत समितीला १६ जानेवारी रोजी पाठविली. जिल्हास्तरावरून इकडची कागदपत्रे, नियोजन आदी संदेश तालुकास्तरावर पोहचली. तथापि जानेवारी ते मार्च २०१९ करिता तयार करण्यात आलेला संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यातील प्रस्तावित एकही उपाययोजनेला प्रारंभ झाला नाही. मोहाडी तालुक्यात जानेवारी ते मार्च महिन्यात विहिरीतील गाळ काढणे, विहिर खोल करणे अशी ४० यातून २३ कामे करायची होती. तसेच नळ योजनेची विशेष दुरुस्तीची ६ कामे,विंधन विहिरीची विशेष दुरुस्तीची १८ कामे, विंधन विहिरी घेणे ३३ कामे, कुपनलिका एक अशी १३३ कामाच्या संख्येतून ८१ कामांची उपाययोजना करावयाची होती. या कामावर ९७ लक्ष रुपये खर्च करावयाचे होते. ही सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करावयाची होती. मात्र एकही कामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नाहीत.एप्रिल ते जून या महिन्यातही पाणी टंचाईसाठी आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यालाही मंजुरी प्राप्त झाली आहे. एप्रिल ते जून या महिन्यात ९६ कामापैकी ६७ कामाची उपाययोजना करावयाची आहे. या कामासाठी ८२ लक्ष ५८ हजार रुपये खर्चाची मर्यादा आहे. यात विहिरीची गाळ काढणे, विहिरी खोल करणे २१ कामे नळ योजनांची विशेष दुरुस्तीची ७ कामे, विंधन विहिरीची, विशेष दुरुस्तीची ९ कामे, विंधन विहिरीची २९ कामे तसेच कुपनलिका घेणयाचे एक काम असे जून अखेर ६७ काम करावयाची आहेत. सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. विहिरी खोल गेल्या, हातपंपाच्या पाण्याची पातळी खोलवर गेली, नदी नाले तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याचे पाणी टंचाईकरिता ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्या योजनांची निधी मार्च २०१९ ला प्राप्त झाल्याचे पंचायत समितीमधील बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई