शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

तीन महिन्यात उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:07 IST

दरवर्षीच येतो उन्हाळा. दरवर्षीच्याच उपाययोजना, पण फरक एवढाच तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार प्रशासनाकडून होतोय. जानेवारी ते मार्च तीन महिने निघून गेले तरी पाणी टंचाई आराखड्यातील एकही प्रस्तावित कामे झाली नाहीत.

ठळक मुद्देपाणीटंचाई योजना : तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : दरवर्षीच येतो उन्हाळा. दरवर्षीच्याच उपाययोजना, पण फरक एवढाच तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार प्रशासनाकडून होतोय. जानेवारी ते मार्च तीन महिने निघून गेले तरी पाणी टंचाई आराखड्यातील एकही प्रस्तावित कामे झाली नाहीत.जिल्हाधिकारी भंडारा यांनी यांच्याद्वारे १४ जानेवारीच्या पत्रानुसार टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी पाणी टंचाई मंजूर आराखडाची प्रत मोहाडी पंचायत समितीला १६ जानेवारी रोजी पाठविली. जिल्हास्तरावरून इकडची कागदपत्रे, नियोजन आदी संदेश तालुकास्तरावर पोहचली. तथापि जानेवारी ते मार्च २०१९ करिता तयार करण्यात आलेला संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यातील प्रस्तावित एकही उपाययोजनेला प्रारंभ झाला नाही. मोहाडी तालुक्यात जानेवारी ते मार्च महिन्यात विहिरीतील गाळ काढणे, विहिर खोल करणे अशी ४० यातून २३ कामे करायची होती. तसेच नळ योजनेची विशेष दुरुस्तीची ६ कामे,विंधन विहिरीची विशेष दुरुस्तीची १८ कामे, विंधन विहिरी घेणे ३३ कामे, कुपनलिका एक अशी १३३ कामाच्या संख्येतून ८१ कामांची उपाययोजना करावयाची होती. या कामावर ९७ लक्ष रुपये खर्च करावयाचे होते. ही सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करावयाची होती. मात्र एकही कामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नाहीत.एप्रिल ते जून या महिन्यातही पाणी टंचाईसाठी आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यालाही मंजुरी प्राप्त झाली आहे. एप्रिल ते जून या महिन्यात ९६ कामापैकी ६७ कामाची उपाययोजना करावयाची आहे. या कामासाठी ८२ लक्ष ५८ हजार रुपये खर्चाची मर्यादा आहे. यात विहिरीची गाळ काढणे, विहिरी खोल करणे २१ कामे नळ योजनांची विशेष दुरुस्तीची ७ कामे, विंधन विहिरीची, विशेष दुरुस्तीची ९ कामे, विंधन विहिरीची २९ कामे तसेच कुपनलिका घेणयाचे एक काम असे जून अखेर ६७ काम करावयाची आहेत. सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. विहिरी खोल गेल्या, हातपंपाच्या पाण्याची पातळी खोलवर गेली, नदी नाले तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याचे पाणी टंचाईकरिता ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्या योजनांची निधी मार्च २०१९ ला प्राप्त झाल्याचे पंचायत समितीमधील बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई