शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:15 IST

मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली आहे.

धरणस्थळी पर्यटकांची गर्दी : -तर रोजगाराला मिळू शकतो वावलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली आहे. परिणामी गोसेखुर्द धरणाचे तीन वक्रद्वारे अर्धा मिटरने उघडण्यात आली असून १० हजार ६६५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. भंडारा जिल्ह्यात अपेक्षेनुरुप अजूनपर्यंत पाऊस बरसलेला नाही. काही ठिकाणी आलेल्या पावसामुळे धान पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाची पाण्याची पातळी २४४ मीटरवर पोहोचली आहे. मध्यप्रदेश सीमावर्ती भागात व वैनगंगा नदीच्या पात्रात पाऊस बरसल्याने नदीच्या जलसाठ्यात वाढ झालेली दिसून येत आहे.परिणामी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आली आहे. सध्या वैनगंगा नदीच्या कारधा नदीपात्रात १२ फूट जलसाठा आहे. संजय सरोवराच्या पातळीत वाढ झाल्याने पाणी वैनगंगेत सोडण्यात आले.दुसरीकडे धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे जिल्हाभरातून पर्यटक भेट देत आहेत. परिणामी क्षेत्रातील रोजगारालाही चालना मिळत आहे. पावसाची टक्केवारीजिल्ह्यात १ जून ते १७ जुलैपर्यंत बरसलेल्या पावसाची एकूण टक्केवारी ५७ इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४८.४ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १३३० मि.मी. पाऊस बरसतो. मागील ४७ दिवसात तालुकानिहाय नोंदीत भंडारा तालुक्यात २४५.३ मि.मी., मोहाडी १८९.१, तुमसर २३५.८, पवनी १९४.५, साकोली २५८.८, लाखांदूर २४४.६ तर लाखनी तालुक्यात ३७०.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सातही तालुक्यात बरसलेल्या एकूण पावसाची नोंद १७३८.९ मि.मी. करण्यात आली असून त्याची सरासरी २४८.४ मि.मी. इतकी आहे.