शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

तीन कोटींचा खर्च गेला पाण्यात

By admin | Updated: September 28, 2015 00:56 IST

ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे

निश्चित मेश्राम  पालोरा (चौ.)ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे जलप्राधिकरण योजनेचे भूमीपूजन केले होते. बऱ्याच प्रमाणात काम पूर्ण झाले होते. मात्र वारंवार पाईप लाईन लिकेज होत असल्यामुळे दोन आवठडयातच ही योजना गुंडाळण्यात आली. मागील पाच वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जलप्राधिकरण योजना भंगारात जमा झाली आहे. सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पवनी तालुक्यातील ब्राम्हणी येथे जलप्राधिकरण योजनेअंतर्गत मोठे मोठे जलकूंभ तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे याकरिता जवळपास तिन कोटी रुपये खर्चून हि योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत १३ गावाचा समावेश येतो. यात बाम्हणी, पालोरा, सेंद्री, मावळ, कोंढा, कोसरा, आकोट, चिचाळ, मेंढा, पाथरी आदी गावांचा समावेश आहे. यापैकी अनेक गावांमध्ये आजही पाण्याची तिव्र टंचाई आहे. या गावांना मुबलक पाणी मिळावे हे प्रशासनाचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत वैनगंगा नदीतून पाणी ब्राम्हणी येथे जलकुंभात जमा करणे व ते पाणी शुध्द करुन सर्व गावांना पाणी पुरवठा करणे हे या योजनेचे उदिष्ट होते. याकरिता वैनगंगा काटेवर असलेले इंटगाव या गावाला लागून नदीच्या काठावर यंत्र सामुगी लावण्यात आली आहे. या यंत्राच्या साहाय्याने वैनगंगा नदीचे पाणी थेट या जलकुंभात जमा केले जात होते ते पाणी शुध्द प्रक्रिया करुन गावात पाणी पुरवठा केला जात होता. योजना पूर्ण होताच मोठया थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. दोन आठवडे ही योजना सुरु होती. मात्र सर्वत्र वारंवार पाईप लाईन लिकेज होत असल्यामुळे दुरुस्तीचे काम झपाटयाने सुरु करण्यात आले होते. मात्र जास्त खर्चामुळे काही दिवसातच कंत्राटदाराकडून काम बंद करण्यात आले. तीन कोटी रुपये खर्चून बाधलेली जलप्राधिकरण योजना धुळखात उभी आहे. हि योजना सुरु करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधिनी धावपळ केली मात्र अजूनपर्यंत कूणालाही यश मिळाले नाही. योजना बेवारस असल्यामुळे अनेकांनी येथील साहित्य लंपास केले आहे. बाम्हणी ते कोंढा या ५ कि.मी. मध्ये टाकलेली पाईप लाईन बेपत्ता झाली आहे. ठिकठिकाणी उभे वाल फक्त जनतेला दिसत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेनी केली आहे.