शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

तीन कोटींचा खर्च गेला पाण्यात

By admin | Updated: September 28, 2015 00:56 IST

ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे

निश्चित मेश्राम  पालोरा (चौ.)ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे जलप्राधिकरण योजनेचे भूमीपूजन केले होते. बऱ्याच प्रमाणात काम पूर्ण झाले होते. मात्र वारंवार पाईप लाईन लिकेज होत असल्यामुळे दोन आवठडयातच ही योजना गुंडाळण्यात आली. मागील पाच वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जलप्राधिकरण योजना भंगारात जमा झाली आहे. सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पवनी तालुक्यातील ब्राम्हणी येथे जलप्राधिकरण योजनेअंतर्गत मोठे मोठे जलकूंभ तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे याकरिता जवळपास तिन कोटी रुपये खर्चून हि योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत १३ गावाचा समावेश येतो. यात बाम्हणी, पालोरा, सेंद्री, मावळ, कोंढा, कोसरा, आकोट, चिचाळ, मेंढा, पाथरी आदी गावांचा समावेश आहे. यापैकी अनेक गावांमध्ये आजही पाण्याची तिव्र टंचाई आहे. या गावांना मुबलक पाणी मिळावे हे प्रशासनाचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत वैनगंगा नदीतून पाणी ब्राम्हणी येथे जलकुंभात जमा करणे व ते पाणी शुध्द करुन सर्व गावांना पाणी पुरवठा करणे हे या योजनेचे उदिष्ट होते. याकरिता वैनगंगा काटेवर असलेले इंटगाव या गावाला लागून नदीच्या काठावर यंत्र सामुगी लावण्यात आली आहे. या यंत्राच्या साहाय्याने वैनगंगा नदीचे पाणी थेट या जलकुंभात जमा केले जात होते ते पाणी शुध्द प्रक्रिया करुन गावात पाणी पुरवठा केला जात होता. योजना पूर्ण होताच मोठया थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. दोन आठवडे ही योजना सुरु होती. मात्र सर्वत्र वारंवार पाईप लाईन लिकेज होत असल्यामुळे दुरुस्तीचे काम झपाटयाने सुरु करण्यात आले होते. मात्र जास्त खर्चामुळे काही दिवसातच कंत्राटदाराकडून काम बंद करण्यात आले. तीन कोटी रुपये खर्चून बाधलेली जलप्राधिकरण योजना धुळखात उभी आहे. हि योजना सुरु करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधिनी धावपळ केली मात्र अजूनपर्यंत कूणालाही यश मिळाले नाही. योजना बेवारस असल्यामुळे अनेकांनी येथील साहित्य लंपास केले आहे. बाम्हणी ते कोंढा या ५ कि.मी. मध्ये टाकलेली पाईप लाईन बेपत्ता झाली आहे. ठिकठिकाणी उभे वाल फक्त जनतेला दिसत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेनी केली आहे.