शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रकरणे अपात्र तर तीन प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: November 25, 2014 22:50 IST

शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतीसाठी सिंचनाची अपुरी साधने आणि निसर्गाचा लहरीपणा याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी साकोली तालुक्यातील सात शेतकऱ्यांनी

संजय साठवणे - साकोलीशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतीसाठी सिंचनाची अपुरी साधने आणि निसर्गाचा लहरीपणा याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी साकोली तालुक्यातील सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ज्या शेतकऱ्यांनी आयुष्यभर शेतात राबले त्या शेतकऱ्यांच्या घरी तेरवीचे जेवण द्यायलाही अन्न उरले नाही, अशी शोकांतिका आहे. साकोली तालुक्यातील सातही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. यातील चार प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयात अपात्र ठरविण्यात आली असून अन्य तीन शेतकऱ्यांची प्रकरणे वर्ष उलटली तरी अद्याप प्रलंबित आहे.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रमोद लहानू कांबळे रा.धर्मापुरी यांनी २ जानेवारी रोजी आत्महत्या केली. मृतकाकडे थकीत व चालू कर्ज नसल्याच्या कारणावरून या शेतकऱ्याचे प्रकरण समितीने अपात्र ठरविले आहे. दयाराम जाजू कोरे रा.पळसगाव या शेतकऱ्याने दि.१७ फेब्रुवारीला आत्महत्या केली. या शेतकऱ्याकडे थकीत व चालू कर्ज नसल्याचे हे कारण सांगून नामंजूर करण्यात आले. सखाराम गणपत दोनोडे रा.परसटोला या शेतकऱ्याने १ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. या शेतकऱ्याकडे थकीत व कर्ज नसल्याचे कारणाने प्रकरण अपात्र करण्यात आले. रमेश टेकराम रहांगडाले रा.किन्ही एकोडी या शेतकऱ्याने दि. ६ एप्रिल रोजी आत्महत्या केली. या शेतकऱ्याचे प्रकरण ही घटना शेतकरी आत्महत्या प्रकरणात मोडत नसल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आले. महादेव हरी पर्वते रा.उमरझरी या शेतकऱ्याने १४ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. सदर शेतकऱ्याचे प्रकरण जिल्हाधिकारी यांचे समक्ष सादर करण्यात आले असून हे प्रकरण प्रलंबित आहे. बिसन श्रावण गिऱ्हेपुंजे रा.किन्ही एकोडी या शेतकऱ्याने दि. १ जानेवारी रोजी आत्महत्या केली. ते प्रकरण प्रलंबित आहे. भागरथा शंकर काऱ्हेकर या शेतकरी महिलेने २४ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्यांचे प्रकरण उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असून अजूनपर्यंत ते प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाकडून दिली जाणरी एक लाख रुपयाची आर्थिक मदत या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांपर्यंत अजूनपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे नव्याने सत्तारुढ झालेल्या राज्य सरकारकडून मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या आशा मदतीसाठी पल्लवीत झाल्या आहेत.