शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

वनभरतीसाठी हजारो युवक दाखल

By admin | Updated: November 7, 2016 00:42 IST

नागपूर वनवृत्तांतर्गत विभागातील रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे.

पहाटेपासून होणार चाचणी : भंडारा उपवन संरक्षक कार्यालय सज्जभंडारा : नागपूर वनवृत्तांतर्गत विभागातील रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या रिक्त पदांसाठी उद्या (दि.७) पासून भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी सुमारे १२ हजार युवक युवती सहभागी होत आहेत.नागपूर वनविभागाच्या अखत्यारीत भंडारा, वर्धा, गोंदिया व नागपूर हे उपवनसंरक्षक कार्यालय आहेत. या चारही विभागात विविध प्रवर्गातील सुमारे १५६ रिक्त पदे आहेत. ही पदभरती प्रक्रिया वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. उद्या सोमवारपासून भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया प्रारंभ होत आहे. १५६ रिक्त जागांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातील सुमारे ४८ हजार युवक युवतींनी वन विभागाकडे अर्ज केलेले आहेत.यातील भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयात रिक्त असलेल्या जागांचाही समावेश आहे. मुख्य वन संरक्षकांनी चारही उपवन संरक्षक कार्यालयाला १२ हजार उमेदवार विभागून दिलेले आहेत. भंडारा येथील रिक्त पदांची प्रक्रिया गडेगाव लाकूड आगारात सुरु होत आहे. ७ ते १२ नोव्हेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उद्या पहिल्या दिवशी युवतींची शारीरिक चाचणी तर युवकांची उंची व वजन चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबरला पलाडी ते कोका रोड या मार्गावर धावण्याची स्पर्धा घेण्यात येईल. त्यात गुणवत्ता श्रेणीत येणाऱ्या युवक - युवतींची निवड होणार आहे. ही धावण्याची स्पर्धा युवकांसाठी ५ कि.मी. तर युवतींसाठी ३ कि.मी.ची राहणार असून हे अंतर अर्ध्या तासाच्या आत गाठायचे उद्दिष्ट्ये ठेवलेले आहे. अनेक दिवसांपासून सुशिक्षित बेरोजगारांची फौज तयार झालेली आहे. अनेक ठिकाणी चाचपणी करूनही युवकांना रोजगार मिळत नसल्याने वनविभागाच्या भरती प्रक्रियेत उच्चशिक्षित उमेदवारांनी मोठ्या उमेदीने अर्ज सादर केलेले आहेत. या भरती प्रक्रियेतून त्यांना नोकरीची संधी मिळेल अशी आशा उराशी बाळगून अनेक युवक भंडारा शहरात दाखल होत आहेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शकतेत पार पाडावी यासाठी वनविभागाचे सुमारे ७० वनकर्मचारी या प्रक्रियेदरम्यान डोळ्यात अंजन घालून कारवाई जबाबदारीने पार पाडण्यासाठी सज्ज आहेत. (शहर प्रतिनिधी)भरती प्रक्रियास्थळी मिळणार सुविधाभरती प्रक्रिया राबविताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भंडारा वनविभागाने पोलीस प्रशासनासह वन कर्मचाऱ्यांची मदत घेतलेली आहे. सोबतच वैद्यकीय सुविधाही भरती प्रक्रिया स्थळी ठेवण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडावी यासाठी वरिष्ठांच्या निर्देशाचे पालन करण्यात येत आहे. कुणाला भूलथापा देऊन नोकरी लावून देण्याचे आमिष मिळत असल्यास अशा बाबीस बळी न पडता त्याची तक्रार वनविभागाकडे करावी. सोबतच भरती प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यास त्याचीही तक्रार विभागाकडे करता येईल. - उमेश वर्माउपवनसंरक्षक, भंडारा.