शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उष्माघाताने हजारो कोंबड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:38 IST

तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.किशोर डोंगरे यांच्या मालकीचे हे पोल्ट्रीफार्म असून रविवारला दुपारपासून कोंबड्यांच्या मृत्यूची सुरूवात झाल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारला सकाळी १० वाजेपर्यंत १,२०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्यामुळे डोंगरे हे कमालिचे धास्तावले. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत काही कळले नसल्याचे त्यांनी सांगितले.कोंबड्यांचा मृत्यू नेमका विषबाधेने झाला की उष्माघाताने याची तपासणी करण्यासाठी त्यांनी मानेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांना बोलाविले. त्यांनी काही कोंबड्याचे शवविच्छेदन करून पोल्ट्रीफार्मची पाहणी केली असता या कोंबड्याचा मृत्यू हा कडक उन्हामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी डोंगरे यांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.पोल्ट्रीफार्म मालकांनी अशी घ्यावी काळजीविदर्भामध्ये उन्ह चांगलीच तापत आहे. तापमान ३५ अंश सेल्सीअस पुढे गेल्यास मोठ्या पक्षांना श्वसनक्रियेत त्रास होतो व पक्षी मृत्यूचे प्रमाण वाढते. कारण पक्ष्यांना घामाच्या ग्रंथी नसल्याने श्वसनाने उष्माचे उत्सर्जन करतात. त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण जाते. त्यामुळे पक्षी दगावतात. त्याकरिता पोल्ट्री फार्मच्या शेडमधील तापमान नियंत्रित करणे गरजेचे आहे. शेडमध्ये पंखे, फॉगर बसविणे, दुपारच्यावेळेस कोंढ्यामध्ये ओलावा निर्माण करणे, छतवरील पत्र्यांना आतुन व बाहेरून चुना लावणे, छतावर गवत किंवा तणीस टाकणे किंवा छतावर तुषार सिंचनाची व्यवस्था करणे, पाण्याची टाकी व पाण्याचे पाईप गरम होणार नाहीत याची व्यवस्था करावी, गरम हवा आत शिरणार नाही याची काळजी घेऊन दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान खाद्य देऊ नये, असे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांनी सांगितले.