शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताने हजारो कोंबड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:38 IST

तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.किशोर डोंगरे यांच्या मालकीचे हे पोल्ट्रीफार्म असून रविवारला दुपारपासून कोंबड्यांच्या मृत्यूची सुरूवात झाल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारला सकाळी १० वाजेपर्यंत १,२०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्यामुळे डोंगरे हे कमालिचे धास्तावले. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत काही कळले नसल्याचे त्यांनी सांगितले.कोंबड्यांचा मृत्यू नेमका विषबाधेने झाला की उष्माघाताने याची तपासणी करण्यासाठी त्यांनी मानेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांना बोलाविले. त्यांनी काही कोंबड्याचे शवविच्छेदन करून पोल्ट्रीफार्मची पाहणी केली असता या कोंबड्याचा मृत्यू हा कडक उन्हामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी डोंगरे यांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.पोल्ट्रीफार्म मालकांनी अशी घ्यावी काळजीविदर्भामध्ये उन्ह चांगलीच तापत आहे. तापमान ३५ अंश सेल्सीअस पुढे गेल्यास मोठ्या पक्षांना श्वसनक्रियेत त्रास होतो व पक्षी मृत्यूचे प्रमाण वाढते. कारण पक्ष्यांना घामाच्या ग्रंथी नसल्याने श्वसनाने उष्माचे उत्सर्जन करतात. त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण जाते. त्यामुळे पक्षी दगावतात. त्याकरिता पोल्ट्री फार्मच्या शेडमधील तापमान नियंत्रित करणे गरजेचे आहे. शेडमध्ये पंखे, फॉगर बसविणे, दुपारच्यावेळेस कोंढ्यामध्ये ओलावा निर्माण करणे, छतवरील पत्र्यांना आतुन व बाहेरून चुना लावणे, छतावर गवत किंवा तणीस टाकणे किंवा छतावर तुषार सिंचनाची व्यवस्था करणे, पाण्याची टाकी व पाण्याचे पाईप गरम होणार नाहीत याची व्यवस्था करावी, गरम हवा आत शिरणार नाही याची काळजी घेऊन दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान खाद्य देऊ नये, असे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांनी सांगितले.