शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असूनही तहानलेले ‘गणेशपूर’

By admin | Updated: June 12, 2015 01:24 IST

भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील नागरिक पाणी टंचाईला सामोरे जात आहे. पाणी असूनही गाव तहानलेले

ग्रामपंचायतीची उदासीनता : योजनेच्या नावाखाली अनेकांनी धुतले वाहत्या गंगेत हात !भंडारा : भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील नागरिक पाणी टंचाईला सामोरे जात आहे. पाणी असूनही गाव तहानलेले असा युक्तीवाद या गावाला तंतोतंत लागू होत आहे. २००७ मध्ये वैनगंगा नदीवर कोरंभी गावात गणेशपूर गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत गणेशपूरमार्फत ही योजना सुरु झाली. वैनगंगेला भरपूर पाणी असूनही गावाला मात्र काळेकुट्ट प्रदूषित पाण्याचा पिण्यासाठी मागील ८-१० वर्षापासून नळाद्वारे पुरवठा केला जातो. पण ही योजना अंमलात आणताना भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे जलशुद्धकरणाचे संयंत्रच बसू शकले नाही. त्यामुळे सरळ प्रदूषित पेयजलाचा पुरवठा गणेशपूर गावाला केला जातो. या संबंधात अनेक ग्रामसभांमध्ये लोकांनी ओरड केली. पण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंतच्या कालखंडात कधीही गावाला शुद्ध जलपुरवठा व्हावा म्हणून तसदी घेतली नाही. अनेकदा शुद्ध जलपुरवठा व्हावा या दृष्टीने जिल्हाधिकारी व कार्यपालन अधिकारी यांच्याकडे लिखीत तक्रारीसुद्धा केल्या. पण या अधिकाऱ्यांनी सुद्धा या तक्रारीची दखल घेतली नाही. जनतेनी आपल्या तक्रारी शुद्ध जलपुरवठा केला जावा या संबंधात जनतेचे प्रतिनिधी आमदार व खासदारांना वारंवार करण्यात आली. पण त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. २०१५ च्या मे महिन्यात ग्रामसभेत नागरिकांनी आवाज उठवला. त्यावेळेस विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या संबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे असे सांगून सुटका केली. १ मे २०१५ च्या ग्रामसभेत गावासाठी बोअरवेलची व्यवस्था करून गावाला शुद्ध जल पुरवठा करू या दृष्टीने टेंडरिंगची प्रक्रिया करण्यात आली. उन्हाळ्यात गावातील विहिरी कोरड्या पडल्या असताना प्रदूषित जलपुरवठा सुरुच आहे. पाणी ऐवढे प्रदूषित आहे की जनावरे सुद्धा त्या पाण्याला पिऊ शकत नाही. प्रदूषित पाण्यामुळे मागील वर्षी २०१४ मध्ये पावसाळ्यात ५०-६० नागरिकांचे आरोग्य बिघडले. समस्या असूनसुद्धा ग्रामपंचायत पदाधिकारी, जनतेचे प्रतिनिधी, आमदार व खासदार व जिल्हा परिषद अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. वैनगंगेत नागनदीचे प्रदूषित पाणी सोडल्यामुळे पवित्र गंगा अपवित्र व प्रदूषित झाली आहे व नागरिकांना शुद्ध पाण्यापासून जीवन समजले जाते कोणाचेही नाही. कृपया वर्तमानपत्रातील या बातमीमुळे वरिष्ठ मंडळी वा अधिकारी जातीने लक्ष देवून प्रदूषित जलपुरवठा व होणारे गंभीर आरोग्य विषयक समस्यातून गणेशपूरवासीयांची सुटका करतील व शुद्ध जलपुरवठा करून केला जाईल या दृष्टीने उपाययोजना करतील अशी गणेशपूर येथील नागरिकांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)