शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मिरची सातऱ्याने दिला हजारोंना रोजगार

By admin | Updated: March 27, 2017 00:30 IST

तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही.

मजुरांसाठी 'मास्क' गरजेचे : आंध्रप्रदेशातून आणली जाते मिरचीपवनी : तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही. अशावेळी मजूरीवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत त्रासदायक होते. सहजरित्या मजूर उपलब्ध होवू शकत असलेल्या भागात मिरची सातरे सुरु केल्याने हजारो मजूरांना रोजगारांची संधी मिळालेली आहे.तालुक्यात अल्पभुधारक व अत्यल्प भुधारकांची संख्या फार मोठी आहे. तसेच भुमिहिन शेतमजूर सुध्दा मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दोन- तीन वर्षात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याला सोडण्यात येत होते. त्यामुळे भुयार व सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भातपिक लावलेले होते. यावर्षी दुरुस्तीचे कारण देवून कालव्यात पाणी सोडण्यास सिंचन विभागाने नकार दिला. त्यामुळे उन्हाळी भातपिकापासुन शेतकरी वंचित राहिले. शेतात पिक नाही त्यामुळे शेतमजूरांना काम नाही, मजुरांची संख्या लक्षात घेवून शासनाने मनरेगा अंतर्गत काम सुरु करावयास पाहिजे होते परंतु तसे होवू शकले नाही. कऱ्हांडला अभयारण्य व जंगलात हिस्त्र पशुची भिती त्यामुळे वनउपजांचा मजुरी म्हणून व्यवसाय करणारे सुध्दा काही करु शकले नाही. परिसरात मजूर व शेत मजुरांची फार मोठी संख्या आहे. ते सहज उपलब्ध होवू शकतात असा विचार करुन कित्येक गावात मिरचीचे सातरे सुरु करण्यात आलेले आहेत. प्रत्येक सातऱ्यावर किमांन शंभर मजुर काम करीत आहेत. त्यामुळे पवनी, गोसे, भोजापूर, शेळी, कान्हळगाव, निष्ठी भुयार या गावालगत मिरचीचे सातरे सुरु करण्यात आलेले आहेत. सर्व सातऱ्यावर काम करणाऱ्या मजूरांची संख्या एक हजारांवर आहे.आंधप्रदेशातील वरंगल भागातून मिरची आणल्या जाते, त्यात तेज्ञा, बेडगी, तायवान, लवंगी, मुरला अशा विविध प्रकारची मिरची आणून सातऱ्यावर मजुरांकडून मिरचीचे देठ खुडून घेणे व दर्जेदार मिरीच निवडणे अशी कामे केली जात आहेत. मजूरांना रुपये ८ ते १५ प्रति किलो या दराने देढ खुडण्याचे काम करावे लागते. दर दिवसाला १५ ते २० किलो मिरची साफ करणाऱ्या मजुरांना दिडशे ते दोनशे रुपये याप्रमाणे मजूरी मिळत असते. देढ खुडून निवडलेली मिरची १० किलो ते २५ किलोच्या पिशवीमध्ये भरुन आंधप्रदेशात पुन्हा पाठविली जाते. काम करणाऱ्या मजूरांना श्वाच्छोश्वासाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नियमित मजुरांनी मॉस्कचा वापर करावयास पाहिजे. सदर कंपनीने मजूरांसाठी मॉस्कची सोय केल्यास आरोग्य दृष्टीने हितावह होईल, यात शंका नाही. (तालुका प्रतिनिधी)