शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मिरची सातऱ्याने दिला हजारोंना रोजगार

By admin | Updated: March 27, 2017 00:30 IST

तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही.

मजुरांसाठी 'मास्क' गरजेचे : आंध्रप्रदेशातून आणली जाते मिरचीपवनी : तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही. अशावेळी मजूरीवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत त्रासदायक होते. सहजरित्या मजूर उपलब्ध होवू शकत असलेल्या भागात मिरची सातरे सुरु केल्याने हजारो मजूरांना रोजगारांची संधी मिळालेली आहे.तालुक्यात अल्पभुधारक व अत्यल्प भुधारकांची संख्या फार मोठी आहे. तसेच भुमिहिन शेतमजूर सुध्दा मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दोन- तीन वर्षात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याला सोडण्यात येत होते. त्यामुळे भुयार व सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भातपिक लावलेले होते. यावर्षी दुरुस्तीचे कारण देवून कालव्यात पाणी सोडण्यास सिंचन विभागाने नकार दिला. त्यामुळे उन्हाळी भातपिकापासुन शेतकरी वंचित राहिले. शेतात पिक नाही त्यामुळे शेतमजूरांना काम नाही, मजुरांची संख्या लक्षात घेवून शासनाने मनरेगा अंतर्गत काम सुरु करावयास पाहिजे होते परंतु तसे होवू शकले नाही. कऱ्हांडला अभयारण्य व जंगलात हिस्त्र पशुची भिती त्यामुळे वनउपजांचा मजुरी म्हणून व्यवसाय करणारे सुध्दा काही करु शकले नाही. परिसरात मजूर व शेत मजुरांची फार मोठी संख्या आहे. ते सहज उपलब्ध होवू शकतात असा विचार करुन कित्येक गावात मिरचीचे सातरे सुरु करण्यात आलेले आहेत. प्रत्येक सातऱ्यावर किमांन शंभर मजुर काम करीत आहेत. त्यामुळे पवनी, गोसे, भोजापूर, शेळी, कान्हळगाव, निष्ठी भुयार या गावालगत मिरचीचे सातरे सुरु करण्यात आलेले आहेत. सर्व सातऱ्यावर काम करणाऱ्या मजूरांची संख्या एक हजारांवर आहे.आंधप्रदेशातील वरंगल भागातून मिरची आणल्या जाते, त्यात तेज्ञा, बेडगी, तायवान, लवंगी, मुरला अशा विविध प्रकारची मिरची आणून सातऱ्यावर मजुरांकडून मिरचीचे देठ खुडून घेणे व दर्जेदार मिरीच निवडणे अशी कामे केली जात आहेत. मजूरांना रुपये ८ ते १५ प्रति किलो या दराने देढ खुडण्याचे काम करावे लागते. दर दिवसाला १५ ते २० किलो मिरची साफ करणाऱ्या मजुरांना दिडशे ते दोनशे रुपये याप्रमाणे मजूरी मिळत असते. देढ खुडून निवडलेली मिरची १० किलो ते २५ किलोच्या पिशवीमध्ये भरुन आंधप्रदेशात पुन्हा पाठविली जाते. काम करणाऱ्या मजूरांना श्वाच्छोश्वासाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नियमित मजुरांनी मॉस्कचा वापर करावयास पाहिजे. सदर कंपनीने मजूरांसाठी मॉस्कची सोय केल्यास आरोग्य दृष्टीने हितावह होईल, यात शंका नाही. (तालुका प्रतिनिधी)