शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

मिरची सातऱ्याने दिला हजारोंना रोजगार

By admin | Updated: March 27, 2017 00:30 IST

तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही.

मजुरांसाठी 'मास्क' गरजेचे : आंध्रप्रदेशातून आणली जाते मिरचीपवनी : तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही. अशावेळी मजूरीवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत त्रासदायक होते. सहजरित्या मजूर उपलब्ध होवू शकत असलेल्या भागात मिरची सातरे सुरु केल्याने हजारो मजूरांना रोजगारांची संधी मिळालेली आहे.तालुक्यात अल्पभुधारक व अत्यल्प भुधारकांची संख्या फार मोठी आहे. तसेच भुमिहिन शेतमजूर सुध्दा मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दोन- तीन वर्षात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याला सोडण्यात येत होते. त्यामुळे भुयार व सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भातपिक लावलेले होते. यावर्षी दुरुस्तीचे कारण देवून कालव्यात पाणी सोडण्यास सिंचन विभागाने नकार दिला. त्यामुळे उन्हाळी भातपिकापासुन शेतकरी वंचित राहिले. शेतात पिक नाही त्यामुळे शेतमजूरांना काम नाही, मजुरांची संख्या लक्षात घेवून शासनाने मनरेगा अंतर्गत काम सुरु करावयास पाहिजे होते परंतु तसे होवू शकले नाही. कऱ्हांडला अभयारण्य व जंगलात हिस्त्र पशुची भिती त्यामुळे वनउपजांचा मजुरी म्हणून व्यवसाय करणारे सुध्दा काही करु शकले नाही. परिसरात मजूर व शेत मजुरांची फार मोठी संख्या आहे. ते सहज उपलब्ध होवू शकतात असा विचार करुन कित्येक गावात मिरचीचे सातरे सुरु करण्यात आलेले आहेत. प्रत्येक सातऱ्यावर किमांन शंभर मजुर काम करीत आहेत. त्यामुळे पवनी, गोसे, भोजापूर, शेळी, कान्हळगाव, निष्ठी भुयार या गावालगत मिरचीचे सातरे सुरु करण्यात आलेले आहेत. सर्व सातऱ्यावर काम करणाऱ्या मजूरांची संख्या एक हजारांवर आहे.आंधप्रदेशातील वरंगल भागातून मिरची आणल्या जाते, त्यात तेज्ञा, बेडगी, तायवान, लवंगी, मुरला अशा विविध प्रकारची मिरची आणून सातऱ्यावर मजुरांकडून मिरचीचे देठ खुडून घेणे व दर्जेदार मिरीच निवडणे अशी कामे केली जात आहेत. मजूरांना रुपये ८ ते १५ प्रति किलो या दराने देढ खुडण्याचे काम करावे लागते. दर दिवसाला १५ ते २० किलो मिरची साफ करणाऱ्या मजुरांना दिडशे ते दोनशे रुपये याप्रमाणे मजूरी मिळत असते. देढ खुडून निवडलेली मिरची १० किलो ते २५ किलोच्या पिशवीमध्ये भरुन आंधप्रदेशात पुन्हा पाठविली जाते. काम करणाऱ्या मजूरांना श्वाच्छोश्वासाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नियमित मजुरांनी मॉस्कचा वापर करावयास पाहिजे. सदर कंपनीने मजूरांसाठी मॉस्कची सोय केल्यास आरोग्य दृष्टीने हितावह होईल, यात शंका नाही. (तालुका प्रतिनिधी)