शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

निराधार योजना समितीअभावी हजारो प्रकरणे धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

चुल्हाड (सिहोरा) : समाजात उपेक्षित जीवन व्यतीत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त ...

चुल्हाड (सिहोरा) : समाजात उपेक्षित जीवन व्यतीत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी महसूल विभागाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाकडून अर्थसाहाय्यता विविध योजनांच्या लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन समितीची असते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वर्षभरापासून समितीची निवड केली गेली नाही. त्यामुळे हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचे वास्तव समोर आले आहे.

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण बाळ आणि इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर योजना तसेच विधवा, परित्यक्त्या, अनाथ, आणि दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीसाठी संजय गांधी स्वावलंबन योजना सुरू आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये प्रतिमहिना अर्थसाहाय्य त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वर्षे वयोगटातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालेल्यांसाठी राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत मृतक कुटुंबीयांच्या वारस कुटुंबास वीस हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. महसूलच्या अखत्यारितील संजय गांधी स्वावलंबन योजना या विभागाकडून चालवली जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन योजना समितीकडून केली जाते.

या समितीचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता व पदसिद्ध सचिव म्हणून तहसीलदार असतात. या समितीची निवड पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी करतात. २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे महाआघाडीचे सरकार राज्यात आले. त्यामुळे युती शासनाने नेमलेली समिती बरखास्त झाली. समिती अस्तित्वात नसेल तर या योजनांकरिता लाभार्थी निवडीचे अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत; पण मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण प्रशासन कोरोनातच व्यस्त आहे.

कोट

संजय गांधी स्वावलंबन समिती अस्तित्वात नसल्याचे जिल्ह्यातील सर्वच आमदारांना माहिती आहे. तसेच आमदार सत्ताधारी पक्षाची संबंधित असतानाही संजय गांधी समिती निवडीबाबत कसलेही प्रयत्न केले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांत या योजनांच्या हजारो लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. यावर उपाय योजनांची गरज आहे.

सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष, भाजप किसान आघाडी