शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

निराधार योजना समितीअभावी हजारो प्रकरणे धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

चुल्हाड (सिहोरा) : समाजात उपेक्षित जीवन व्यतीत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त ...

चुल्हाड (सिहोरा) : समाजात उपेक्षित जीवन व्यतीत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी महसूल विभागाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाकडून अर्थसाहाय्यता विविध योजनांच्या लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन समितीची असते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वर्षभरापासून समितीची निवड केली गेली नाही. त्यामुळे हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचे वास्तव समोर आले आहे.

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण बाळ आणि इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर योजना तसेच विधवा, परित्यक्त्या, अनाथ, आणि दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीसाठी संजय गांधी स्वावलंबन योजना सुरू आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये प्रतिमहिना अर्थसाहाय्य त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वर्षे वयोगटातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालेल्यांसाठी राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत मृतक कुटुंबीयांच्या वारस कुटुंबास वीस हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. महसूलच्या अखत्यारितील संजय गांधी स्वावलंबन योजना या विभागाकडून चालवली जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन योजना समितीकडून केली जाते.

या समितीचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता व पदसिद्ध सचिव म्हणून तहसीलदार असतात. या समितीची निवड पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी करतात. २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे महाआघाडीचे सरकार राज्यात आले. त्यामुळे युती शासनाने नेमलेली समिती बरखास्त झाली. समिती अस्तित्वात नसेल तर या योजनांकरिता लाभार्थी निवडीचे अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत; पण मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण प्रशासन कोरोनातच व्यस्त आहे.

कोट

संजय गांधी स्वावलंबन समिती अस्तित्वात नसल्याचे जिल्ह्यातील सर्वच आमदारांना माहिती आहे. तसेच आमदार सत्ताधारी पक्षाची संबंधित असतानाही संजय गांधी समिती निवडीबाबत कसलेही प्रयत्न केले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांत या योजनांच्या हजारो लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. यावर उपाय योजनांची गरज आहे.

सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष, भाजप किसान आघाडी