शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजना समितीअभावी हजारो प्रकरणे धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

चुल्हाड (सिहोरा) : समाजात उपेक्षित जीवन व्यतीत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त ...

चुल्हाड (सिहोरा) : समाजात उपेक्षित जीवन व्यतीत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी महसूल विभागाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाकडून अर्थसाहाय्यता विविध योजनांच्या लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन समितीची असते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वर्षभरापासून समितीची निवड केली गेली नाही. त्यामुळे हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचे वास्तव समोर आले आहे.

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण बाळ आणि इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर योजना तसेच विधवा, परित्यक्त्या, अनाथ, आणि दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीसाठी संजय गांधी स्वावलंबन योजना सुरू आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये प्रतिमहिना अर्थसाहाय्य त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वर्षे वयोगटातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालेल्यांसाठी राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत मृतक कुटुंबीयांच्या वारस कुटुंबास वीस हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. महसूलच्या अखत्यारितील संजय गांधी स्वावलंबन योजना या विभागाकडून चालवली जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन योजना समितीकडून केली जाते.

या समितीचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता व पदसिद्ध सचिव म्हणून तहसीलदार असतात. या समितीची निवड पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी करतात. २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे महाआघाडीचे सरकार राज्यात आले. त्यामुळे युती शासनाने नेमलेली समिती बरखास्त झाली. समिती अस्तित्वात नसेल तर या योजनांकरिता लाभार्थी निवडीचे अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत; पण मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण प्रशासन कोरोनातच व्यस्त आहे.

कोट

संजय गांधी स्वावलंबन समिती अस्तित्वात नसल्याचे जिल्ह्यातील सर्वच आमदारांना माहिती आहे. तसेच आमदार सत्ताधारी पक्षाची संबंधित असतानाही संजय गांधी समिती निवडीबाबत कसलेही प्रयत्न केले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांत या योजनांच्या हजारो लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. यावर उपाय योजनांची गरज आहे.

सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष, भाजप किसान आघाडी