शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

ज्यांना भाेंगे लावायचे त्यांनी लावावे, भोंगे काढण्याचे राजकारण करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अवलंबविल्याने पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले. हीच बाब विरोधकांना पचत नाही त्यामुळे ते वादंग घालत आहेत. येणाऱ्या काळातही निवडणुकीवर आमचे लक्ष आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ होतील, असेही ते म्हणाले. रस्ते विकासाच्या माध्यमातून देशपातळीवर विकासाची गंगा प्रवाहित करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना भ्रमित करण्यासाठी धर्माधर्मात वाद निर्माण केला जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्यावरून वादंग माजविला जात आहे. ज्यांना भोंगे लावायचे असेल तर त्यांनी खुशाल लावावेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतो.  ते मंदिरावर भोंगे लावू शकतात; पण भोंगे काढण्यावरून धर्माधर्मात वितुष्ट आणून राजकारण करू नये, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.भंडारा येथील विश्रामगृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. आठवले म्हणाले, केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. गत आठ वर्षांपासून मोदी शासनाने विविध लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. जवळपास ८५ टक्के नागरिक सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत येतात. जनधन योजना असो की उज्ज्वला. अनेक योजनांमधून अनेक गरीब व गरजू लोकांना लाभ मिळालेला आहे आणि अजूनही मिळत आहे. केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अवलंबविल्याने पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले. हीच बाब विरोधकांना पचत नाही त्यामुळे ते वादंग घालत आहेत. येणाऱ्या काळातही निवडणुकीवर आमचे लक्ष आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ होतील, असेही ते म्हणाले. रस्ते विकासाच्या माध्यमातून देशपातळीवर विकासाची गंगा प्रवाहित करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना भ्रमित करण्यासाठी धर्माधर्मात वाद निर्माण केला जात आहे.भाेंगे काढण्याची भूमिका ही संविधानविराेधी आहे. सगळ्या रंगाला घेवून साेबत जायचे आहे. सर्वच रंगाचा सन्मान केला पाहिजे, असे ना. आठवले यांनी सांगितले. भारतात श्रीलंकेसारखी कुठलीही स्थिती नाही. मात्र स्वत:च्या अवस्थेवरुन देशाची अवस्था सांगण्याची गरज नाही, असा टाेलाही एका नेत्याला लगावला. पत्रकार परिषदेला आरपीआयचे  जिल्हाध्यक्ष असीत बागडे व पदाधिकारी उपस्थित हाेते.

राज्य सरकार पडेल तर आम्ही बनवू - महाराष्ट्रात सध्या जे सरकार आहे ते पडत नाही. सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने या सरकारमधून आपला पाठिंबा काढला पाहिजे, यासाठी नाना पटोले यांनी पुढाकार घ्यावा. राज्यातील विद्यमान सरकार पडले तर आम्ही सरकार बनवू, असा आत्मविश्वासही ना. आठवले यांनी व्यक्त केला. युती शासनाच्या काळातील कामांचा आढावा देताना ना. आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. याशिवाय  त्यांच्याच काळात दीक्षाभूमीला शंभर कोटींचा निधी मिळाला. इंदू मिल येथे भव्य स्मारक घडत आहे.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले