शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

ज्यांना भाेंगे लावायचे त्यांनी लावावे, भोंगे काढण्याचे राजकारण करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अवलंबविल्याने पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले. हीच बाब विरोधकांना पचत नाही त्यामुळे ते वादंग घालत आहेत. येणाऱ्या काळातही निवडणुकीवर आमचे लक्ष आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ होतील, असेही ते म्हणाले. रस्ते विकासाच्या माध्यमातून देशपातळीवर विकासाची गंगा प्रवाहित करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना भ्रमित करण्यासाठी धर्माधर्मात वाद निर्माण केला जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्यावरून वादंग माजविला जात आहे. ज्यांना भोंगे लावायचे असेल तर त्यांनी खुशाल लावावेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतो.  ते मंदिरावर भोंगे लावू शकतात; पण भोंगे काढण्यावरून धर्माधर्मात वितुष्ट आणून राजकारण करू नये, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.भंडारा येथील विश्रामगृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. आठवले म्हणाले, केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. गत आठ वर्षांपासून मोदी शासनाने विविध लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. जवळपास ८५ टक्के नागरिक सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत येतात. जनधन योजना असो की उज्ज्वला. अनेक योजनांमधून अनेक गरीब व गरजू लोकांना लाभ मिळालेला आहे आणि अजूनही मिळत आहे. केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अवलंबविल्याने पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले. हीच बाब विरोधकांना पचत नाही त्यामुळे ते वादंग घालत आहेत. येणाऱ्या काळातही निवडणुकीवर आमचे लक्ष आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ होतील, असेही ते म्हणाले. रस्ते विकासाच्या माध्यमातून देशपातळीवर विकासाची गंगा प्रवाहित करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना भ्रमित करण्यासाठी धर्माधर्मात वाद निर्माण केला जात आहे.भाेंगे काढण्याची भूमिका ही संविधानविराेधी आहे. सगळ्या रंगाला घेवून साेबत जायचे आहे. सर्वच रंगाचा सन्मान केला पाहिजे, असे ना. आठवले यांनी सांगितले. भारतात श्रीलंकेसारखी कुठलीही स्थिती नाही. मात्र स्वत:च्या अवस्थेवरुन देशाची अवस्था सांगण्याची गरज नाही, असा टाेलाही एका नेत्याला लगावला. पत्रकार परिषदेला आरपीआयचे  जिल्हाध्यक्ष असीत बागडे व पदाधिकारी उपस्थित हाेते.

राज्य सरकार पडेल तर आम्ही बनवू - महाराष्ट्रात सध्या जे सरकार आहे ते पडत नाही. सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने या सरकारमधून आपला पाठिंबा काढला पाहिजे, यासाठी नाना पटोले यांनी पुढाकार घ्यावा. राज्यातील विद्यमान सरकार पडले तर आम्ही सरकार बनवू, असा आत्मविश्वासही ना. आठवले यांनी व्यक्त केला. युती शासनाच्या काळातील कामांचा आढावा देताना ना. आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. याशिवाय  त्यांच्याच काळात दीक्षाभूमीला शंभर कोटींचा निधी मिळाला. इंदू मिल येथे भव्य स्मारक घडत आहे.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले