शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना भाेंगे लावायचे त्यांनी लावावे, भोंगे काढण्याचे राजकारण करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अवलंबविल्याने पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले. हीच बाब विरोधकांना पचत नाही त्यामुळे ते वादंग घालत आहेत. येणाऱ्या काळातही निवडणुकीवर आमचे लक्ष आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ होतील, असेही ते म्हणाले. रस्ते विकासाच्या माध्यमातून देशपातळीवर विकासाची गंगा प्रवाहित करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना भ्रमित करण्यासाठी धर्माधर्मात वाद निर्माण केला जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्यावरून वादंग माजविला जात आहे. ज्यांना भोंगे लावायचे असेल तर त्यांनी खुशाल लावावेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतो.  ते मंदिरावर भोंगे लावू शकतात; पण भोंगे काढण्यावरून धर्माधर्मात वितुष्ट आणून राजकारण करू नये, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.भंडारा येथील विश्रामगृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. आठवले म्हणाले, केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. गत आठ वर्षांपासून मोदी शासनाने विविध लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. जवळपास ८५ टक्के नागरिक सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत येतात. जनधन योजना असो की उज्ज्वला. अनेक योजनांमधून अनेक गरीब व गरजू लोकांना लाभ मिळालेला आहे आणि अजूनही मिळत आहे. केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अवलंबविल्याने पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले. हीच बाब विरोधकांना पचत नाही त्यामुळे ते वादंग घालत आहेत. येणाऱ्या काळातही निवडणुकीवर आमचे लक्ष आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ होतील, असेही ते म्हणाले. रस्ते विकासाच्या माध्यमातून देशपातळीवर विकासाची गंगा प्रवाहित करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना भ्रमित करण्यासाठी धर्माधर्मात वाद निर्माण केला जात आहे.भाेंगे काढण्याची भूमिका ही संविधानविराेधी आहे. सगळ्या रंगाला घेवून साेबत जायचे आहे. सर्वच रंगाचा सन्मान केला पाहिजे, असे ना. आठवले यांनी सांगितले. भारतात श्रीलंकेसारखी कुठलीही स्थिती नाही. मात्र स्वत:च्या अवस्थेवरुन देशाची अवस्था सांगण्याची गरज नाही, असा टाेलाही एका नेत्याला लगावला. पत्रकार परिषदेला आरपीआयचे  जिल्हाध्यक्ष असीत बागडे व पदाधिकारी उपस्थित हाेते.

राज्य सरकार पडेल तर आम्ही बनवू - महाराष्ट्रात सध्या जे सरकार आहे ते पडत नाही. सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने या सरकारमधून आपला पाठिंबा काढला पाहिजे, यासाठी नाना पटोले यांनी पुढाकार घ्यावा. राज्यातील विद्यमान सरकार पडले तर आम्ही सरकार बनवू, असा आत्मविश्वासही ना. आठवले यांनी व्यक्त केला. युती शासनाच्या काळातील कामांचा आढावा देताना ना. आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. याशिवाय  त्यांच्याच काळात दीक्षाभूमीला शंभर कोटींचा निधी मिळाला. इंदू मिल येथे भव्य स्मारक घडत आहे.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले