शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ उपविभागांना हवी जिल्ह्यात एन्ट्री!

By admin | Updated: December 21, 2014 22:52 IST

शेतीच्या सिंचनासाठी महत्वपूर्ण विभाग म्हणून समजल्या जाणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या तीन नविन उपविभागांना कार्यान्वित करण्यासाठी एन्ट्री हवी आहे. तांत्रिक अडचण व शासन दिरंगाई यामुळे मंजुरी

मंजुरी आली, पण कारवाई अडली : तर पाण्याची समस्या सुटू शकतेअशोक पारधी - भंडाराशेतीच्या सिंचनासाठी महत्वपूर्ण विभाग म्हणून समजल्या जाणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या तीन नविन उपविभागांना कार्यान्वित करण्यासाठी एन्ट्री हवी आहे. तांत्रिक अडचण व शासन दिरंगाई यामुळे मंजुरी असूनही जिल्हयातील तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे नवीन लघु पाटबंधारे उपविभाग कार्यान्वित झालेले नाहीत. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिध्द आहे. त्यामुळे तलावात पाणी साठा असो किंवा नसो सिंचनाचा अनुशेष नाही म्हणून शासनाकडून दुर्लक्षित केले जात आहे. १४२१ मालगुजारी तलावभंडारा जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव १४२१, लघु पाटबंधारे तलाव १४४, कोल्हापुरी बंधारे १७९, साठवण बंधारे २६२, सिमेंट प्लग बंधारे ३१५, पाझर तलाव १५ अशा एकूण २०६९ योजना आहेत. त्याची सिंचन क्षमता ४४६०० हेक्टर आहे परंतु त्याचे देखभाल दुरुस्तीवर लक्ष ठवेणारा अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग मात्र पुरेशा प्रमाणात नाही. तसेच मंजूर असलेले तीन उपविभाग कार्यान्वित न झाल्याने शेतकऱ्यांना पाणी पाहिजे असल्यास ७० ते ८० किमी अंतरावर पायपीट करावी लागत आहे. १०९ पदांना मुदतवाढ शासनाचे लघु सिंचन (जलसंधारण) विभागाने जिल्हा परिषदेकरीता ६ मे च्या शासन निर्णयान्वये एक कार्यकारी अभियंता, ७ उपविभागीय अभियंता, ३४ शाखा अभियंता व इतर कार्यालयीन कर्मचारी असे एकूण १०९ पदांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. पदांना मंजूरी असतांना तत्कालीन राज्य शासनाने मंजूर असलेले तीन उपविभाग कार्यान्वित केले नाही. शेतकऱ्यांची पायपीट जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग भंडाराचे पवनी, साकोली व भंडारा येथे तीन उपविभाग सद्यस्थितीत कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार नव्याने तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे उपविभाग सुरु करावा. यासाठी २५ जून २०१० पासून आजतागायत जिल्हा परिषदेने प्रयत्न केलेला आहे. पंरतु शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भंडारा, साकोली व पवनी येथील उपविभागात जावे लागते. जे काम तालुक्याचे ठिकाणी होऊ शकते त्या कामासाठी काही एक कारण नसताना उपविभाग कार्यान्वित न झाल्यामुळे अन्य तालुक्यात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.