शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

‘त्या’ उपविभागांना हवी जिल्ह्यात एन्ट्री!

By admin | Updated: December 21, 2014 22:52 IST

शेतीच्या सिंचनासाठी महत्वपूर्ण विभाग म्हणून समजल्या जाणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या तीन नविन उपविभागांना कार्यान्वित करण्यासाठी एन्ट्री हवी आहे. तांत्रिक अडचण व शासन दिरंगाई यामुळे मंजुरी

मंजुरी आली, पण कारवाई अडली : तर पाण्याची समस्या सुटू शकतेअशोक पारधी - भंडाराशेतीच्या सिंचनासाठी महत्वपूर्ण विभाग म्हणून समजल्या जाणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या तीन नविन उपविभागांना कार्यान्वित करण्यासाठी एन्ट्री हवी आहे. तांत्रिक अडचण व शासन दिरंगाई यामुळे मंजुरी असूनही जिल्हयातील तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे नवीन लघु पाटबंधारे उपविभाग कार्यान्वित झालेले नाहीत. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिध्द आहे. त्यामुळे तलावात पाणी साठा असो किंवा नसो सिंचनाचा अनुशेष नाही म्हणून शासनाकडून दुर्लक्षित केले जात आहे. १४२१ मालगुजारी तलावभंडारा जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव १४२१, लघु पाटबंधारे तलाव १४४, कोल्हापुरी बंधारे १७९, साठवण बंधारे २६२, सिमेंट प्लग बंधारे ३१५, पाझर तलाव १५ अशा एकूण २०६९ योजना आहेत. त्याची सिंचन क्षमता ४४६०० हेक्टर आहे परंतु त्याचे देखभाल दुरुस्तीवर लक्ष ठवेणारा अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग मात्र पुरेशा प्रमाणात नाही. तसेच मंजूर असलेले तीन उपविभाग कार्यान्वित न झाल्याने शेतकऱ्यांना पाणी पाहिजे असल्यास ७० ते ८० किमी अंतरावर पायपीट करावी लागत आहे. १०९ पदांना मुदतवाढ शासनाचे लघु सिंचन (जलसंधारण) विभागाने जिल्हा परिषदेकरीता ६ मे च्या शासन निर्णयान्वये एक कार्यकारी अभियंता, ७ उपविभागीय अभियंता, ३४ शाखा अभियंता व इतर कार्यालयीन कर्मचारी असे एकूण १०९ पदांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. पदांना मंजूरी असतांना तत्कालीन राज्य शासनाने मंजूर असलेले तीन उपविभाग कार्यान्वित केले नाही. शेतकऱ्यांची पायपीट जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग भंडाराचे पवनी, साकोली व भंडारा येथे तीन उपविभाग सद्यस्थितीत कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार नव्याने तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे उपविभाग सुरु करावा. यासाठी २५ जून २०१० पासून आजतागायत जिल्हा परिषदेने प्रयत्न केलेला आहे. पंरतु शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना भंडारा, साकोली व पवनी येथील उपविभागात जावे लागते. जे काम तालुक्याचे ठिकाणी होऊ शकते त्या कामासाठी काही एक कारण नसताना उपविभाग कार्यान्वित न झाल्यामुळे अन्य तालुक्यात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.