शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

‘त्या’ राष्ट्रीयीकृत बँकेतील खातेधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:03 IST

जिल्ह्यात ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनेक शाखा असल्या तरी पंजाब नॅशनल बँकेची शहरात एकमेव शाखा आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दररोज गत अनेक दिवसापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । खातेधारकांसह लोकप्रतिनिधींंनाही दिली जातात उडवाउडवीचे उत्तरे, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने वाढला कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनेक शाखा असल्या तरी पंजाब नॅशनल बँकेची शहरात एकमेव शाखा आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दररोज गत अनेक दिवसापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पंजाब नॅशनल बँकेत कर्मचाऱ्यांची वानवा असून शहरात इतरत्र कुठेही शाखा नाही. त्यामुळे खातेधारकांची दररोज गर्दी कायम राहते.व्यापारी, आबालवृद्ध, विद्यार्थी त्यांच्यासह अनेक जणांची बँकेत व्यवहार असल्याने लग्नसराईच्या दिवसात खातेधारकांना दररोज तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. सकाळी १०.३० वाजतापासून बँकेत लांबच लांब रांगा लागतात. बँकेत कर्मचारी, एक शाखा प्रमुख, एक इन्चार्ज आॅफीसर, दोन कारकून आणि एक आर्थिक देवाण घेवाणीचा काउंटर एवढ्यावरच बँकेचा कारभार चालू आहे. त्यामुळे दिवसभरात मर्यादित कामे होत असल्याने खातेधारकांना पुन्हा दुसºया दिवशी आपल्या कामासाठी हेलपाट्या माराव्या लागतात.उन्हाळ्याच्या दिवसात बँकेत आलेल्या ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली नाही. सोमवारी खातेधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अरुण गोंडाणे यांनी बँक महिला कर्मचाºयाला ग्राहकांच्या होणाºया त्रासाबद्दल विचारणा केली. तेव्हा त्या कर्मचाºयाने उलटसुलट उत्तरे देत आम्ही काय करणार? आम्ही काही करू शकत नाही? अशा प्रकारे उलट सुलट उत्तरे दिली.नाव विचारताच नावाला काय करायचे आहे असे सांगत लोकप्रतिनिधींना देखील हे बँक कर्मचारी जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा गैरवर्तणूक करणाºया बँक कर्मचाºयांवर तात्काळ कारवाई करून खातेधारकांना न्याय देण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांची वानवाकर्मचाºयांची लंच टायमिंग, पाणी पिणे, चहासाठी बाहेर जाणे यासारख्या कारणांमुळे देखील ग्राहकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. याबाबत शाखा प्रमुखांना देखील अनेक खातेधारकांनी याबाबत सांगितले आहे. परंतु त्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. बँकेत कर्मचाºयांची वानवा असल्याने कामाचा ताण वाढला आहे.जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत वाढशहरासह ग्रामीण भागात आर्थिक देवाण घेवाणीसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढल्या असल्या तरी वाढत्या खातेधारकांच्या संख्येमुळे व लिंक फेलच्या ग्रहणामुळे बँक कर्मचारी सातत्याने ग्राहकांवर संतापत असल्याचे प्रकार वाढले आहेत. आबाल वृद्धासह विद्यार्थ्यांचे हाल होत असताना बँक कर्मचाºयांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याबाबत जनसामान्यांत रोष दिसून येत आहे.

टॅग्स :bankबँक