शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘त्या’ राष्ट्रीयीकृत बँकेतील खातेधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:03 IST

जिल्ह्यात ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनेक शाखा असल्या तरी पंजाब नॅशनल बँकेची शहरात एकमेव शाखा आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दररोज गत अनेक दिवसापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । खातेधारकांसह लोकप्रतिनिधींंनाही दिली जातात उडवाउडवीचे उत्तरे, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने वाढला कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनेक शाखा असल्या तरी पंजाब नॅशनल बँकेची शहरात एकमेव शाखा आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दररोज गत अनेक दिवसापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पंजाब नॅशनल बँकेत कर्मचाऱ्यांची वानवा असून शहरात इतरत्र कुठेही शाखा नाही. त्यामुळे खातेधारकांची दररोज गर्दी कायम राहते.व्यापारी, आबालवृद्ध, विद्यार्थी त्यांच्यासह अनेक जणांची बँकेत व्यवहार असल्याने लग्नसराईच्या दिवसात खातेधारकांना दररोज तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. सकाळी १०.३० वाजतापासून बँकेत लांबच लांब रांगा लागतात. बँकेत कर्मचारी, एक शाखा प्रमुख, एक इन्चार्ज आॅफीसर, दोन कारकून आणि एक आर्थिक देवाण घेवाणीचा काउंटर एवढ्यावरच बँकेचा कारभार चालू आहे. त्यामुळे दिवसभरात मर्यादित कामे होत असल्याने खातेधारकांना पुन्हा दुसºया दिवशी आपल्या कामासाठी हेलपाट्या माराव्या लागतात.उन्हाळ्याच्या दिवसात बँकेत आलेल्या ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली नाही. सोमवारी खातेधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अरुण गोंडाणे यांनी बँक महिला कर्मचाºयाला ग्राहकांच्या होणाºया त्रासाबद्दल विचारणा केली. तेव्हा त्या कर्मचाºयाने उलटसुलट उत्तरे देत आम्ही काय करणार? आम्ही काही करू शकत नाही? अशा प्रकारे उलट सुलट उत्तरे दिली.नाव विचारताच नावाला काय करायचे आहे असे सांगत लोकप्रतिनिधींना देखील हे बँक कर्मचारी जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा गैरवर्तणूक करणाºया बँक कर्मचाºयांवर तात्काळ कारवाई करून खातेधारकांना न्याय देण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांची वानवाकर्मचाºयांची लंच टायमिंग, पाणी पिणे, चहासाठी बाहेर जाणे यासारख्या कारणांमुळे देखील ग्राहकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. याबाबत शाखा प्रमुखांना देखील अनेक खातेधारकांनी याबाबत सांगितले आहे. परंतु त्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. बँकेत कर्मचाºयांची वानवा असल्याने कामाचा ताण वाढला आहे.जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत वाढशहरासह ग्रामीण भागात आर्थिक देवाण घेवाणीसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढल्या असल्या तरी वाढत्या खातेधारकांच्या संख्येमुळे व लिंक फेलच्या ग्रहणामुळे बँक कर्मचारी सातत्याने ग्राहकांवर संतापत असल्याचे प्रकार वाढले आहेत. आबाल वृद्धासह विद्यार्थ्यांचे हाल होत असताना बँक कर्मचाºयांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याबाबत जनसामान्यांत रोष दिसून येत आहे.

टॅग्स :bankबँक