शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २८ गावांना पुराचा धोका आजही कायम

By admin | Updated: July 5, 2016 01:08 IST

दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील २८ गावांना पुराचा तडाखा सहन करावा लागतो. यंदा हवामान खात्याने चांगल्या

लाखांदूर : दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील २८ गावांना पुराचा तडाखा सहन करावा लागतो. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचे शुभवर्तन केल्याने चुलबंद व वैनगंगा नदी काठावरील ‘त्या’ २८ गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका सहन करावा लागणार आहे. मात्र तालुका प्रशासनाच्या योग्य नियोजनाने सतर्कता सुध्दा बाळगली जाते. तालुक्यातील चुलबंद नदी काठावरील १७ तर वैनगंगा नदीकाठावरील ११ गावे पुर परिस्थितीचा दरवर्षी सामोरे जातात. वाहतुकीच्या दृष्टीने लाखांदुर तालुक्यातील अंतर्गत खेडेगावाना जोडणारी मार्ग सुध्दा नाले भरभरुन वाहत असल्याने बंद पडुन तालुक्याशी संपर्क तुटतो. भंडारा शहराजवळील पाणी पातळीबाबद इशारा पातळी ९.०० मिटर तर धोक्याची पातळी ९.५० मिटर एवढी आहे. लाखांदुर तालुक्याचा २० वर्षाचा पुर परिस्थितीचा आढावा बघीतला असता १९९४ ला आलेल्या महापुराने जनजिवन विस्कळीत करुन टाकले होते. पुरात अडकलेल्यांना हेलीकॉप्टरने सुरक्षित स्थळी बाहेर काढावे लागले होते. त्यानंतर १४ ते १७ सप्टेंबर २००५. दि. १३ ते १७ आॅगस्ट २००६ दरम्यान मोठी पुरपरिस्थीती ओढवली होती. विविध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थित हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंमलात आणला. या कायद्यातील तरतुदीला अनुसरुन महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाची स्थापना करण्यात आली होती.पुरामुळे त्या नदीकाठावरील २८ गावांना फटका बसत असला तरी त्याहीपेक्षा चौरास भागात शेकडो हेक्टर धानपिक दरवर्षी पाण्याखाली सापडते. वैनगंगा नदीकाठावरील आवळी, तर चुलबंद नदीकाठावरील खोलमारा/ बु. या गावाचा दरवर्षी तालुक्याशी संपर्क तुटतो. या दोन्ही पुरग्रस्त गावांचे शासनाने यापुर्वी पुनर्वसन केली होते. परंतु पुनर्वसन करताना शासनाने पुर्णपणे मदतकार्य व अटी, शर्तीची पुर्तता न केल्याने आमचे पुनर्वसन झालेच नसल्याचे समजुन दोन्ही पुरग्रस्त गावानी ते गाव सोडले नाही. असे पुरग्रस्तांचे म्हणने आहे. गोसेखुर्द धरणाच्या कालव्याचे जाळे संपुर्ण चौरास भागात पसरले आहेत. अनेक ठिकाणी कालवे खंडित असल्याने पवनी तालुक्यातील पाण्याचा येणारा लोंढा चौरास भागात पसरतो. पाणी निघण्याचा पुढे मार्ग नसल्याने हजारो हेक्टर शेतजमीन जलमय होते. ही परिस्थिती जास्त दिवसाची रहिल्यास धानपिक सडुन शेतकरी संकटात सापडतो. हा प्रसंग अनेकदा घडला. यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधून आर्थिक मदतीची मागणी केली पंरतु काही एक अर्थ झाली नाही. तालुक्यातील किरमटी, गवराळा, रोहणी, विरली/खु. मोहरणा, ओपारा, ईटान, नांदेड, खैरी, टेंभरी, विहीरगाव, आवळी, नांदेड हे वैनगंगा काठावरील तर चुलबंद नदीकाठावरील सोनी, धर्मापुरी, पाऊलदवना बोथली, परसोडी मांढळ किन्ही आसोला, आथली, भागडी, खैरी/पट, चप्राड किन्हाळा, लाखांदूर, चिचोली, खोलमारा, बारवा ही गावे पुरामुळे प्रभावीत होतात. प्रकल्पामध्ये संजय सरोवर मध्यप्रदेश तर धरणामध्ये शिरपुर पुजारिटोला, कालीसराड, इटीयाडोह धरणामुळे लाखांदुर तालुक्यात पुरपरिस्थिती ओढवते. (तालुका प्रतिनिधी)पुराचा धोका तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदी काठावरील गावांना बसतो. आपत्ती निवारण कक्षाची स्थापना केली. त्या त्या गावातील कोतवाल तलाठी, सरपंचांना तालुक्याशी संपर्क ठेवुन वेळोवेळी माहिती पुरण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या. तालुक्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन त्यावर मात करण्यासाठी सज्ज आहे. पुरपरिस्थितीत नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. -विजय पवार, तहसिलदार , लाखांदूर