शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

यंदा खरिपात धानासोबत ऊस व तूर पिकांचाही पेरा वाढणार

By युवराज गोमास | Updated: May 4, 2024 15:20 IST

सर्वाधिक १.८१ लाख हेक्टरवर धान : गत वर्षाच्या तुलनेत ११ हेक्टरची वाढ

भंडारा : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. लवकरच ग्रामीण भागात शेतावर सेंद्रिय खत टाकण्याच्या कामाला वेग येणार आहे. त्याचबरोबर धुरे स्वच्छ करणे, तणकट काढणे, पऱ्ह्यांची जागा तयार करणे आदी कामांची सुरुवात होणार आहे. खरिपाच्या दृष्टीने कृषी विभागही सज्ज झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा धानासोबत ऊस व तूर पिकांचाही पेरा ११ हेक्टरने वाढणार आहे. बियाणे व खतांची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

जिल्हा कृषी विभागाने यंदा खरिपाच्या लागवडीचे वाढविण्याचा चंग बांधला आहे. दरवर्षी जुलै महिन्यापासून खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात होत असत. यंदाही तसा प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर पिकांची लागवड करण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे सर्वाधिक १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाणार आहे.

बियाणे, खत उपलब्धतेवर अधिक भरभंडारा जिल्ह्यात मुख्यत्वे धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. खरिपाचे नियोजन कृषी विभागाने केले असून खते, बियाणे, कीटकनाशके पर्याप्त उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी तयारी चालविली आहे. विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी धानासोबतच तूर आणि उसाचा पेरा वाढविण्यावर अधिक लक्ष पुरविले जाणार आहे.

पडीक क्षेत्र येणार लागवडीखालीवाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिकुटुंब जमिनीचे क्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे यंदा लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी पडीक जमील लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जाणार आहे. पडीक क्षेत्रावर पीक घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असाच प्रयत्न दरवर्षी केला जाणार असल्याने पीक लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. यावर्षी १ लाख ९६ हजार हेक्टरवर पिकांची लागवड होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

यंदाचे पीकनिहाय लक्षांक (हेक्टर)पीक                                        क्षेत्रधान                                        १,८१,२५४तूर                                          ११,४००ऊस                                        २,३००सोयाबीन                                 १,१४०

४०० हेक्टरने वाढणार तुरीचे क्षेत्रयंदा खरिपात ११,४०० हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड होणार आहे. यंदा तुरीचा पेरा ४०० हेक्टरने वाढणार आहे. त्यापाठोपाठ ऊस आणि सोयाबीनची लागवडही वाढविली जाणार आहे. २ हजार ३०० हेक्टरवर उसाची, तर १ हजार १४० हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे.

यंदा लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत व गरजेनुसार खते, बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. खते, बियाणे खरेदी करताना दुकानदारांकडून फसवणूक होत असेल तर तातडीने कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अधिकृत कृषी केंद्रामधून खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. पक्के बिल विक्रेत्यांकडून घेऊन जपून ठेवावे.- संगीता माने, जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग, भंडारा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी