शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

देव्हाडी उड्डाणपुलाचे सिमेंंट खांब तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 21:49 IST

सिमेंट बांधकामाला मजबुती व टणकपणा येण्याकरिता काही दिवस योग्य क्युरिंग पाणी घालणे करण्याची गरज असते. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूलाचा मुख्य सिमेंट खांब पाण्याविना कोरडा दिसून येतात. खांबावर केवळ पोत्यांचे तुकडे आच्छादीत केले आहे. हजारो टनांचा भार सहन करणाऱ्या सिमेंट खांबाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तहानलेले सिमेंट खांब हजारो टनाचे वजन कसे सहन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमजबुतीकरणावर प्रश्नचिन्ह : पाण्याचा अत्यल्प वापर

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिमेंट बांधकामाला मजबुती व टणकपणा येण्याकरिता काही दिवस योग्य क्युरिंग पाणी घालणे करण्याची गरज असते. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूलाचा मुख्य सिमेंट खांब पाण्याविना कोरडा दिसून येतात. खांबावर केवळ पोत्यांचे तुकडे आच्छादीत केले आहे. हजारो टनांचा भार सहन करणाऱ्या सिमेंट खांबाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तहानलेले सिमेंट खांब हजारो टनाचे वजन कसे सहन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.देव्हाडी येथील मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील कॉसिंग क्रमांक ५३१ वर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून सिमेंट खांबाचे पिल्लर दोन्ही बाजूला बांधकाम सध्या सुरू आहे. खांब मोठे व प्रशस्त आहेत. खांबात लोखंडी सळाखी, सिमेंट, रेती, गिट्टीचा वापर केला जात आहे. १५ ते १७ फुट उंच खांबाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. पूर्णत्वास आलेल्या सिमेंट खांबावर पाणी अल्प प्रमाणात घालण्यात येत आहे. दिवसातून केवळ दोन ते तीनदाच प्लॉस्टिक पाईपने पाण्याचा फवारा मारण्यात येते. दिवसभर सदर खांब कोरड्या स्थितीत असतो.बांधकामानंतर किमान २० ते ३१ दिवस सतत पाणी घालून बांधकाम ओलसर ठेवणे गरजेचे आहे. उड्डाणपुलाचे खांब आहेत. खांब सतत ओले करण्याची गरज आहे. हजारो टन वजन या खांबावर राहणार आहे. उड्डाणपूलाचे किमान आयुष्य शंभर वर्षाचे आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्वक व मजबुतीला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.सिमेंट बांधकामाला पाण्याची विशेष गरज आहे. पाण्यामुळे त्याला मजबुती येते. येथे केवळ थातुरमातूर पाणी सिमेंट खांबावर घालण्यात येते. त्यामुळे खांबाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.-सुधाकर कारेमोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुमसर.