शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

तिसरा रेल्वे ट्रॅक २०२२पर्यंत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:51 IST

हावडा-मुंंबई मार्गावर तिसरी रेल्वे ट्रॅकची कामे जोरात सुरू आहे. हावडा ते राजनांदगावपर्यंतच्या रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आला आहे. राजनांदगाव ते कळमना दरम्यान पूलांचे व रेल्वे ट्रॅकचा टप्प्याची कामे प्रगतीपथावर असून सदर रेल्वे मार्ग २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : हालचालींना वेग, हावडा-राजनांदगावपर्यंत बांधकाम पूर्ण

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : हावडा-मुंंबई मार्गावर तिसरी रेल्वे ट्रॅकची कामे जोरात सुरू आहे. हावडा ते राजनांदगावपर्यंतच्या रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आला आहे. राजनांदगाव ते कळमना दरम्यान पूलांचे व रेल्वे ट्रॅकचा टप्प्याची कामे प्रगतीपथावर असून सदर रेल्वे मार्ग २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. देशातील ब्रिटीशकालीन मुंबई-हावडा असा हा रेल्वेमार्ग असून पूर्वी तो एकेरी होता. त्यानंतर दुहेरी व सध्या तिहेरी रेल्वे मार्गाचे बांधकाम केले जात आहे.मुंबई-हावडा हा देशातील प्रमुख व प्रथम रेल्वे मार्ग आहे. देशांतर्गत मालवाहतुकीकरीता ब्रिटीशांनी सर्वप्रथम हा रेल्वे मार्ग तयार केला. रेल्वे मार्गाला भारतात लाईफ लाईन असेही संबोधतात. ब्रिटीशांनी एकेरी रेल्वे ट्रॅक तयार केला होता. भारतीयांनी तो दूहेरी केला व तब्बल पन्नास वर्षानी मुंबई-हावडा रेल्वे मार्ग तिहेरी होत आहे.हावडा-नागपूर-मुंबई दरम्यान मालवाहतूक गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून दूहेरी रेल्वे ट्रॅकवरील प्रवाशी रेल्वेगाड्यांना त्यामुळे मोठा फटका बसतो मालवाहतूक गाड्या विना थांबा तिसऱ्या ट्रॅकवरून धावणार असल्याची माहिती आहे. देशांतर्गत स्वस्त मालवाहतुकीकरीता रेल्वेला उद्योगती प्रथम पसंती देतात. केंद्र शासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल यातून प्राप्त होणार आहे.प्रवाशी गाड्यांची संख्या वाढणारतिसºया रेल्वे ट्रॅकमुळे मालवाहतूक गाड्यांना स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालय या मार्गावर प्रवाशी रेल्वेगाड्या वाढविणार आहे. छत्तीसगड, ओरीसा, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यात थेट मालांची ने-आण तथा प्रवाशांना मोठी सेवा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे समजते.नागपूर-बिलासपूर शटल ट्रेनतिसºया रेल्वे ट्रॅक उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकार नागपूर-बिलासपूर अशी शटल ट्रेन सुरू करणार असल्याचे समजते. प्रथम टप्प्यात नागपूर-गोंदिया, रायपूर, बिलासपूर असा हा प्रवास राहणार आहे. याकरिता इतर खर्च येणार नाही. प्रवाशांना सोयीचे व महाराष्ट्र छत्तीसगड अशी कनेक्टव्हीटी येथे वाढणार आहे. पुढील काळात भारतीय रेल्वे हायटेक होणार असून महसूल वाढ हा त्यामागील एक हेतू असल्याचे समजते.