शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे उपोषण मागे

By admin | Updated: September 10, 2016 00:34 IST

भंडारा येथे प्रस्तावित महिला व बाल रूग्णालयाच्या जमिनीच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजकुमार राऊत व सचिन घनमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

भंडारा : भंडारा येथे प्रस्तावित महिला व बाल रूग्णालयाच्या जमिनीच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजकुमार राऊत व सचिन घनमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी सदर जमिन अधिग्रहीत केलेल्या एका खाजगी कंपनीचा करार रद्द करून महिला रूग्णालयासाठी ५.५ एकर जमिन डिसेंबरपूर्वी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना सुजल निर्माण योजनेतून शहरातील नळयोजनेची जीर्ण पाईपलाईन बदलणे, दोन जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. मागण्यांचे निराकरण झाल्यानंतर उपोषण मंडपात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, जिल्हा प्रभारी प्रमोद गुडधे यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घनमारे व तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे, सीमा भुरे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रसन्न चकोले, अजय गडकरी व पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)भाजप विदर्भ देणार नाही : वडेट्टीवारजनतेची दिशाभूल करून वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर सत्ता मिळविणारे भाजप सरकार स्वतंत्र विदर्भ देणार नाही. विदर्भाच्या मुद्यावर राज्य सरकार अद्यापही गंभीर नाही. नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात येत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परंतु राज्य सरकारला जनतेची चिंता नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. भंडारा येथे स्थानिक मुद्यांना घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सोडविल्यानंतर आयोजित परिषदेत आमदार वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रस्ताव तत्कालीन काँग्रेस सरकारने आणला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षांपासून जागा उपलब्ध केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार डिसेंबरपर्यंत जागा उपलब्ध झाली नाही तर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.