शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे उपोषण मागे

By admin | Updated: September 10, 2016 00:34 IST

भंडारा येथे प्रस्तावित महिला व बाल रूग्णालयाच्या जमिनीच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजकुमार राऊत व सचिन घनमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

भंडारा : भंडारा येथे प्रस्तावित महिला व बाल रूग्णालयाच्या जमिनीच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजकुमार राऊत व सचिन घनमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी सदर जमिन अधिग्रहीत केलेल्या एका खाजगी कंपनीचा करार रद्द करून महिला रूग्णालयासाठी ५.५ एकर जमिन डिसेंबरपूर्वी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना सुजल निर्माण योजनेतून शहरातील नळयोजनेची जीर्ण पाईपलाईन बदलणे, दोन जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. मागण्यांचे निराकरण झाल्यानंतर उपोषण मंडपात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, जिल्हा प्रभारी प्रमोद गुडधे यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घनमारे व तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे, सीमा भुरे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रसन्न चकोले, अजय गडकरी व पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)भाजप विदर्भ देणार नाही : वडेट्टीवारजनतेची दिशाभूल करून वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर सत्ता मिळविणारे भाजप सरकार स्वतंत्र विदर्भ देणार नाही. विदर्भाच्या मुद्यावर राज्य सरकार अद्यापही गंभीर नाही. नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात येत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परंतु राज्य सरकारला जनतेची चिंता नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. भंडारा येथे स्थानिक मुद्यांना घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सोडविल्यानंतर आयोजित परिषदेत आमदार वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रस्ताव तत्कालीन काँग्रेस सरकारने आणला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षांपासून जागा उपलब्ध केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार डिसेंबरपर्यंत जागा उपलब्ध झाली नाही तर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.