शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे उपोषण मागे

By admin | Updated: September 10, 2016 00:34 IST

भंडारा येथे प्रस्तावित महिला व बाल रूग्णालयाच्या जमिनीच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजकुमार राऊत व सचिन घनमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

भंडारा : भंडारा येथे प्रस्तावित महिला व बाल रूग्णालयाच्या जमिनीच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजकुमार राऊत व सचिन घनमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी सदर जमिन अधिग्रहीत केलेल्या एका खाजगी कंपनीचा करार रद्द करून महिला रूग्णालयासाठी ५.५ एकर जमिन डिसेंबरपूर्वी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना सुजल निर्माण योजनेतून शहरातील नळयोजनेची जीर्ण पाईपलाईन बदलणे, दोन जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. मागण्यांचे निराकरण झाल्यानंतर उपोषण मंडपात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, जिल्हा प्रभारी प्रमोद गुडधे यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घनमारे व तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे, सीमा भुरे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रसन्न चकोले, अजय गडकरी व पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)भाजप विदर्भ देणार नाही : वडेट्टीवारजनतेची दिशाभूल करून वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर सत्ता मिळविणारे भाजप सरकार स्वतंत्र विदर्भ देणार नाही. विदर्भाच्या मुद्यावर राज्य सरकार अद्यापही गंभीर नाही. नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात येत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परंतु राज्य सरकारला जनतेची चिंता नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. भंडारा येथे स्थानिक मुद्यांना घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सोडविल्यानंतर आयोजित परिषदेत आमदार वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रस्ताव तत्कालीन काँग्रेस सरकारने आणला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षांपासून जागा उपलब्ध केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार डिसेंबरपर्यंत जागा उपलब्ध झाली नाही तर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.