शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

सकारात्मक विचार करा, आयुष्यात यशस्वी व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:34 IST

मकर संक्रांत आली की, प्रत्येक जण तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. मात्र लवकरच ते विसरूनही जातात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात. प्रत्येकाने आपला दृष्टिकोण सकारात्मक ठेवला तर मनुष्य आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो, असा मंत्र भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिला.

ठळक मुद्देआरडीसी विजय भाकरे यांचा मंत्र

भंडारा : मकर संक्रांत आली की, प्रत्येक जण तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. मात्र लवकरच ते विसरूनही जातात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात. प्रत्येकाने आपला दृष्टिकोण सकारात्मक ठेवला तर मनुष्य आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो, असा मंत्र भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिला.मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड’ बोला, गोड बोला अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना विजय भाकरे म्हणाले, देश जोडण्यासाठी देशातील माणसाची मने आपआपसात जुळणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांच्या मनातील कटुता, विद्वेश, सुडाची भावना समुळ नष्ट करणे आवश्यक झाले आहे. बंधूभाव व प्रेमपूर्वक वर्तन हे चांगल्या विचारातून निर्माण होते. मकरसंक्रांत हा केवळ गोड बोला अशा शुभेच्छा देण्याचा नाही तर हा विचार मनात रुजविण्यासाठी अत्यंत पोषक आहे. आपल्या देशात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे म्हटले जाते. हा प्रेमाचा संदेश कायमस्वरुपी रूजवायचा असेल तर प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. व्यक्ती सुखी, समाधानी, बंधूभाव व प्रेमाने ओतप्रेत असेल तर संपूर्ण समाज आणि देश बलशाली होण्यास विलंब लागणार नाही. त्यासाठी आपल्या देशातील सण उत्सव महत्वपूर्ण ठरतात. अशा सण उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकात्मता निर्माण करणे पोषक ठरते, असे आरडीसी विजय भाकरे यांनी सांगितले.मकरसंक्रांतीचा सण हा परिवर्तनाची नांदी ठरणारा आहे. तीळगूळ घ्या गोड गोड बोला असू म्हणून बंधूभाव व प्रेमाचे प्रतिक तीळगूळ वाटून समोरच्या व्यक्तीकडूनही तशाच वर्तनाची अपेक्षा आणि विनंती करणे ही या सणाची महती असल्याचे भाकरे म्हणाले.