शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या अफवेने धास्ती

By admin | Updated: May 20, 2014 23:26 IST

चोर-चोर, धावा-धावा असे वाक्य ग्रामीण भागात दररोज रात्रीला ऐकावयास मिळत असून संपूर्ण गाव चोरांच्या धास्तीने जागा राहात असतो. आज या गावात चोर आले होते,

मोहाडी : चोर-चोर, धावा-धावा असे वाक्य ग्रामीण भागात दररोज रात्रीला ऐकावयास मिळत असून संपूर्ण गाव चोरांच्या धास्तीने जागा राहात असतो. आज या गावात चोर आले होते, काल त्या गावात चोर आले होते अशा अफवांना ऊत आलेला आहे. त्यामुळे यावर आवर घालणे आवश्यक झाले आहे. काही वर्षापूर्वी मोहाडी तालुक्यात अशीच स्थिती आली होती. आणि रात्रीला एखादा अनोळखी व्यक्ती गावात आला तर त्याची विचारपूस करण्याऐवजी त्याला बदडण्यात येत होते. चोरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बेटाळ्यात ४ व्यक्तींना, देव्हाड्यात २ व्यक्तींना, पालोर्‍यात एकाला कंठस्नान घातले होते. त्यांच्या मृत्युमुळे संपूर्ण तालुका ढवळून निघाला होता. ही परिस्थिती काही वर्षानंतर पुन्हा अनुभवाला येत आहे. आंधळगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या गावात तर सर्वात जास्त चोरांची लाट आल्याचे जाणवते. कान्हळगाव, टांगा येथे चोर आले होती अशी अफवा आहे. मोहाडीतही शेवटच्या टोकावर बांधलेल्या घराचे दार चोर ठोठावतात, अर्ध्या रात्री काही चोर फिरताना आढळले अशा चर्चा सुरू आहेत. आंध़ळगाव पोलिसांनी पाठलाग करुन दोन अट्टल चोरांना पकडले व त्यांच्या जवळून गावठी पिस्तुल व शस्त्रे जप्त केली अशाही चर्चा आहेत. मात्र या चर्चांना उधाण आल्यामुळे गावाबाहेर किंवा शेवटच्या टोकावर असलेल्या घरात राहणारे कुटुंब धास्तीत संपूर्ण रात्र काढत आहेत. पोलिसांनी या अफवांवर अंकुश लावण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी पोलिसानी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. अन्यथा चोरांच्या धास्तीने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हातून पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता फेटाळता येणार नाही. काही वर्षापूर्वी अशाच अफवेने त्रस्त झालेल्या नागरिकांनी बेटाळ्यात ४ चोरांची चांगलीच धुलाई केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. देव्हाड्यात सुद्धा दोन अनोळखी व्यक्तींंना चोर समजून मारहाण करण्यात आली होती तर पालोर्‍यात एका अनोळखी व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या दृष्टीने आता उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. (शहर प्रतिनिधी)