शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

साकोली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:57 IST

पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा चोरटे घेत असून गत काही दिवसात तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एटीएम फोडण्याची घटना ताजी असतांनाच आता विर्शी येथील महाराष्ट्र बँकेची चक्क तिजोरीच चोरट्यांनी फोडली. तालुक्यात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : बँक, एटीएम फोडल्यानंतर चोरीचे सत्र सुरुच, नागरिकांत भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा चोरटे घेत असून गत काही दिवसात तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एटीएम फोडण्याची घटना ताजी असतांनाच आता विर्शी येथील महाराष्ट्र बँकेची चक्क तिजोरीच चोरट्यांनी फोडली. तालुक्यात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. गत महिन्यात एकोडी येथे अज्ञात चोरट्यानी स्टेट बँकेचे एटीएम फोडले होते. त्यानंतर लहान सहान चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाही. एटीएम चोरीची घटना ताजी असतांना शनिवारच्या रात्री विर्शी येथील महाराष्टÑ बँकेची तिजोरी फोडून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपये लंपास केले. बँकेत रात्रीचा चौकीदार नसल्याने चोरट्यांचे फावले. परंतु चोरटे गॅस कटर घेवून बँकेत शिरतात. तेव्हा पोलिसांची गस्त नव्हती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विर्शी या गावात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अद्यापपर्यंत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. विशेष म्हणजे चोरीमध्ये चारचाकी वाहनांचा उपयोग झाल्याचा संशय आहे. तसेच गॅस सिलिंडरही साकोलीच्या नागझीरा रोडवरील एका ट्रेडर्समधील आहे. तालुक्यात जणू चोरट्यांचे समेलन भरल्याचा भास होत आहे.वाढत्या चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. साकोलीचे ठाणेदार मात्र चोरट्यांना जेरबंद करण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच या तालुक्याकडे लक्ष देवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.चोरट्यांची हिम्मत वाढलीपोलीस कोणतीच कारवाई करीत नसल्याने तालुक्यात चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे दिसून येत आहे. साकोलीपासून हाकेच्या अंतरावर असलेली बँक फोडली जाते. चोरटे रक्कम घेवून पसार होतात. मात्र पोलिसांना त्याची साधी कुणकुणही लागूनही नागरिकांना चोरीचा प्रकार दिसावा. त्यानंतर पोलिसांनी धाव घ्यावी नेहमीच्या पध्दतीने सोपस्कार पार पाडून स्वानपथकालाही आणण्यात आले मात्र चोरटे हाती लागले नाही. पोलिसांच्या रात्रगस्तीवर संशय निर्माण झाला असून पोलीस गस्तीऐवजी राष्ट्रीय महामार्गावर वसुलीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येते.