शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ दोन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:32 IST

खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत शिक्षणचा अधिकार कायद्यान्वये २५ टक्के जागा आॅनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर दोन मुलाची नोंदणी संस्कार कॉन्व्हेंटमध्ये झाली.

ठळक मुद्देआरटीई कायद्याची पायमल्ली : शाळा संचालक व अधिकाऱ्यांचे संगनमत, पत्रपरिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत शिक्षणचा अधिकार कायद्यान्वये २५ टक्के जागा आॅनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर दोन मुलाची नोंदणी संस्कार कॉन्व्हेंटमध्ये झाली. मात्र संस्था संचालकाने काही कारणाने त्यांचे प्रवेश नाकारले. त्यामुळे ते दोन्ही मुले आज शिक्षणापासून वंचित असून शाळाबाह्य मुले म्हणून वावरत आहेत. शिक्षण विभागाचे शिक्षण संस्था संचालकांशी मधुर संबंध असल्याने त्यांना कायद्यावर बोट ठेवून अभय देण्याचे कार्य सुरू केले, असा आरोप येथे आयोजित पत्रपरिषदेत विलास वक्कलकार व नारायण निनावे यांनी केला.आरटीई कायद्यानुसार आंधळगावातील दोन व्यक्तींनी आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर केला होता. त्यांच्या मुलांचे प्रवेश संस्कार कान्व्हेंट आंधळगाव येथे निश्चित झाले. त्यामुळे ते प्रवेशासाठी सदर कॉन्व्हेंटमध्ये गेले असता त्यांना तुम्ही आमच्या शाळेतून आॅनलाईन अर्ज का केले नाही असे बोलून त्यांना प्रवेश दिला नाही. त्यामुळे ते दोन्ही पालक हताश होवून शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेले.शिक्षणाधिकारी यांनी संस्कार कान्हव्हेंटच्या नावे पत्र देवून त्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा आदेश दिला. तसे पत्र घेवून हे दोन्ही पालक पुन्हा त्या कान्व्हेंटमध्ये गेले असता संस्था संचालकाने त्यांना १,५०० रूपयांची मागणी केली. आरटीई कायद्यानुसार प्रवेश नि:शुल्क असल्याचे पालकांनी बोलताच संस्था संचालकाने त्या दोन्ही पालकांशी हुज्जत घालून त्यांना शाळेबाहेर काढले. प्रवेश न देण्याचे कारण विचारले असता घर व शाळेचे अंतर चुकीचे टाकले असे उत्तर दिले. आॅनलाईन अर्ज करताना घर व शाळेचे अंतर हे गुगल मॅपवरून आपोआप प्रिंट होते त्यामुळे चुकीचे अंतर टाकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. विशेष म्हणजे शाळा व विद्यार्थ्यांचे घर हे आंधळगावातच आहे.प्रार्थना व खेळण्यासाठी जागाच नाहीसंस्कार कॉन्व्हेंट आंधळगाव येथील संचालक नियम सांगून प्रवेश नाकारत आहेत. या कान्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांची प्रार्थना घेण्यासाठी जागा नाही. प्रार्थना सिमेंट रस्त्यावर किंवा समोरील दुसºयाच्या जागेवर घेतली जाते. खेळण्यासाठी पटांगण नाही. जेवणाच्या सुटीच्या वेळी विद्यार्थी सिमेंट रस्त्यावर खेळत असतात व पडून जखमी होतात. एवढेच नाही तर शौचालयाची सुद्धा व्यवस्था नाही. शौचालयासाठी विद्यार्थी संचालकाच्या घरी जातात. मग या कॉन्व्हेंटला कोणत्या नियमानुसार अधिकाºयांनी मान्यता दिली, असा प्रश्न उपस्थित होण्यास वाव आहे.त्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कान्व्हेंटच्या नावे पत्र दिले होते. कॉन्व्हेंटच्या संचालकांनी प्रवेश नाकारले असेल तर पालकांनी तशी सुचना द्यायला हवी होती. जर पालकांनी तक्रार केली तर सदर कॉन्व्हेंट विरूद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल.-एल.एस. पच्छापुरे, शिक्षणाधिकारी ,भंडारा.