शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताची टंचाई भासणार!

By admin | Updated: June 9, 2017 00:34 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ९८ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली.

मागणीपेक्षा मंजुरी अधिक: अधिकारी म्हणतात, मुबलक पुरवठा होणारदेवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ९८ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. कृषी आयुक्तालयाकडून एक लाख तीन हजार ९०० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी मंजूर करण्यात आली. दि.३० मे अखेर २९ हजार ४४७ मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा शिल्लक आहे. दरवर्षीे शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होत नसल्यामुळे यावर्षी मागणीपेक्षा पुरवठा अधिक असूनही शेतकऱ्यांना वेळेवर रायायनिक खतांचा पुरवठा होईल काय, याविषयी संभ्रमावस्था आहे.मागील पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात रायायनिक खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई यावर्षी जाणवू नये, यासाठी जिल्हा परिषदेने खतांची मागणी वाढवून मागितली. कृषी आयुक्तालयाकडून १ लाख ३ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर करण्यात आले आहे. शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत असताना पिकांसाठी लागणाऱ्या ९८ हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. यात १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत १९४४ मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पुरवठा करण्यात आलेला व मागील वर्षाचा शिल्लकसाठा मिळून २९४४७ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. सद्यस्थितीत या खताची ७५ मेट्रीक टन विक्री झालेली आहे.सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेची युरिया खताची मागणी ४७ हजार ३५५ मे.टन होती. यात ४६ हजार ९०० मे.टन मंजूर करण्यात आले. तर ३१ मार्चपर्यंत ६६९३.९० मे.टन युरिया शिल्लक होता. ३१ मेपर्यंत ४०४ मे.टन पुरवठा करण्यात आला. या खताची ५० मेट्रीक टन विक्री झालेली आहे. एकूण युरियाचा ७०४७.९ मे.टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी खताची मागणी ४ हजार ९७१ मे.टन असून १४ हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. पूर्वीचा शिल्लकसाठा ५०४.३५ मे.टन होता. त्यात पुरवठा करण्यात आलेल्या ७४ मे. टनाची भर पडून सध्या ५७८.४ मे. टन साठा शिल्लक आहे. एमओपी खताची मागणी ६२३ मे. टन असून चार हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. ११४.९२ मे. टन मागील शिल्लक असून १४८.९ मे. टन पुरवठा करण्यात आला. सध्या १४८.९ मे. टन एमओपी शिल्लक आहे. एसएसपी खताची मागणी ९ हजार ९९९ मे. टनाची होती. १९ हजार १०० मे. टन मंजूर झाले. शिल्लक साठा १० हजार ८२० मे.टन असून पुरवठा ९७ मे. टन झाला. असा एकूण शिल्लकसाठा १० हजार ९१७ मे.टन आहे.याशिवाय १५.१५.१५, २०.२०.०, २०.२०.१३, २४.२४.०, १२.३२.१६, १६.१६.१६ या खतांचीही खरिपासाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सद्यस्थितीत या रासायनिक खतांच्या मागणीला मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. मात्र या खतांचा मागील वर्षाचा काही साठा शिल्लक असल्याचे जि. प. कृषी विभागाने सांगितले आहे.आता खत खरेदीसाठी लागणार "आधार"आता शेतकयांना खत खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खतासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानातील गैरप्रकार कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. शेतकऱ्यांना खते हवी असल्यास कृषी सेवा केंद्रात जाताना बरोबर आधारकार्ड न्यावे लागणार आहे. याठिकाणी असलेल्या मशीनवर आधार नंबरची नोंदणी झाल्यानंतर हाताचा अंगठा मशीनवर द्यावा लागणार आहे. त्यामुळे तेथेच बिल तयार केले जाऊन शेतकऱ्यांना खत मिळणार आहे. म्हणजेच खते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष हातात पडल्यानंतरच कंपन्यांना अनुदान मिळणार आहे.