शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

रासायनिक खताची टंचाई भासणार!

By admin | Updated: June 9, 2017 00:34 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ९८ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली.

मागणीपेक्षा मंजुरी अधिक: अधिकारी म्हणतात, मुबलक पुरवठा होणारदेवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ९८ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. कृषी आयुक्तालयाकडून एक लाख तीन हजार ९०० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी मंजूर करण्यात आली. दि.३० मे अखेर २९ हजार ४४७ मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा शिल्लक आहे. दरवर्षीे शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होत नसल्यामुळे यावर्षी मागणीपेक्षा पुरवठा अधिक असूनही शेतकऱ्यांना वेळेवर रायायनिक खतांचा पुरवठा होईल काय, याविषयी संभ्रमावस्था आहे.मागील पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात रायायनिक खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई यावर्षी जाणवू नये, यासाठी जिल्हा परिषदेने खतांची मागणी वाढवून मागितली. कृषी आयुक्तालयाकडून १ लाख ३ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर करण्यात आले आहे. शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत असताना पिकांसाठी लागणाऱ्या ९८ हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. यात १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत १९४४ मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पुरवठा करण्यात आलेला व मागील वर्षाचा शिल्लकसाठा मिळून २९४४७ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. सद्यस्थितीत या खताची ७५ मेट्रीक टन विक्री झालेली आहे.सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेची युरिया खताची मागणी ४७ हजार ३५५ मे.टन होती. यात ४६ हजार ९०० मे.टन मंजूर करण्यात आले. तर ३१ मार्चपर्यंत ६६९३.९० मे.टन युरिया शिल्लक होता. ३१ मेपर्यंत ४०४ मे.टन पुरवठा करण्यात आला. या खताची ५० मेट्रीक टन विक्री झालेली आहे. एकूण युरियाचा ७०४७.९ मे.टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी खताची मागणी ४ हजार ९७१ मे.टन असून १४ हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. पूर्वीचा शिल्लकसाठा ५०४.३५ मे.टन होता. त्यात पुरवठा करण्यात आलेल्या ७४ मे. टनाची भर पडून सध्या ५७८.४ मे. टन साठा शिल्लक आहे. एमओपी खताची मागणी ६२३ मे. टन असून चार हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. ११४.९२ मे. टन मागील शिल्लक असून १४८.९ मे. टन पुरवठा करण्यात आला. सध्या १४८.९ मे. टन एमओपी शिल्लक आहे. एसएसपी खताची मागणी ९ हजार ९९९ मे. टनाची होती. १९ हजार १०० मे. टन मंजूर झाले. शिल्लक साठा १० हजार ८२० मे.टन असून पुरवठा ९७ मे. टन झाला. असा एकूण शिल्लकसाठा १० हजार ९१७ मे.टन आहे.याशिवाय १५.१५.१५, २०.२०.०, २०.२०.१३, २४.२४.०, १२.३२.१६, १६.१६.१६ या खतांचीही खरिपासाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सद्यस्थितीत या रासायनिक खतांच्या मागणीला मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. मात्र या खतांचा मागील वर्षाचा काही साठा शिल्लक असल्याचे जि. प. कृषी विभागाने सांगितले आहे.आता खत खरेदीसाठी लागणार "आधार"आता शेतकयांना खत खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खतासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानातील गैरप्रकार कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. शेतकऱ्यांना खते हवी असल्यास कृषी सेवा केंद्रात जाताना बरोबर आधारकार्ड न्यावे लागणार आहे. याठिकाणी असलेल्या मशीनवर आधार नंबरची नोंदणी झाल्यानंतर हाताचा अंगठा मशीनवर द्यावा लागणार आहे. त्यामुळे तेथेच बिल तयार केले जाऊन शेतकऱ्यांना खत मिळणार आहे. म्हणजेच खते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष हातात पडल्यानंतरच कंपन्यांना अनुदान मिळणार आहे.