शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महिनाभरात रोहयोचा थकीत निधी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:28 IST

भंडारा जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कुशल कामाच्या निधी अभावी २४ कोटी रूपयाची देयके अडली आहेत. यामुळे ग्रामीण भागात विकास प्रभावित ठरत असल्याने जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू : सभापती धनेंद्र तुरकर यांची सकारात्मक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कुशल कामाच्या निधी अभावी २४ कोटी रूपयाची देयके अडली आहेत. यामुळे ग्रामीण भागात विकास प्रभावित ठरत असल्याने जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या शिवाय सकारात्मक चर्चा केली. महिना भरात थकीत निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात गेल्या दोन वर्षापासून कुशल कामे करण्यात आली आहेत. याशिवाय योजनेतून नव्याने कुशल कामे प्रस्तावित व मंजूर करण्यात आली आहेत. परंतु थकीत निधी उपलब्ध करण्यात येत नसल्याने नव्याने प्रस्तावित कुशल कामांना यंत्रणा हात जोडून नमस्कार करीत आहे. नव्याने मंजुरी प्रदान करण्यात आलेली विकास कामे सुरू करण्यात आली नाही.यामुळे गावात होणाऱ्या विकास कामांना ब्रेक मिळाला आहे. या योजने अंतर्गत कुशल कामांचा नाव घेतले असता यंत्रणा नाक तोंड दाबत आहे. गावात मजुरांना रोजगार आणि गावांचा चेहरा मोहरा बदलविणारी योजना म्हणून आशेचे बघीतने जात आहे. परंतु सरसकट निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायत स्तरावर पदाधिकारी टेंशन घेताना दिसून येत आहे. मजुरांची ओरड आणि रोष थेट ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांचे दिशेने जात असल्याचे त्यांचे हिताचे विचार करताना पदाधिकारी आराखडा घेत आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील तालुक्यांना कुशल कामाचे थकीत निधी देण्यात आला नाही. २४ कोटी रूपयांचे घरात निधी अडला असल्याने साहित्य धारक आणि पुरवठा धारकांचे ओरडणे सुरू झाले आहे. गावात देयकांचे प्राप्ती वरून भांडणे सुरू झाले आहे. या थकीत निधी करिता जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांना निवेदन दिले.ग्रामीण भागात प्रभावित कामाचे बाबतीत त्यांनी विस्तृत चर्चा केली आहे. निधी नसल्याने यंत्रणा थकल्याचे माहिती त्यांनी दिली. या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. महिला भरात संपूर्ण निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन चर्चे दरम्यान त्यांनी दिले. यावेळी यशवंत सोनकुसरे, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, सिहोराचे सरपंच मधु अडमाचे, चंद्रशेखर बन्सोड उपस्थित होते.जिल्ह्यात शिक्षकांचे पद रिक्तभंडारा जिल्ह्यात शिक्षकांचे १८२ पदे रिक्त आहेत. यामुळे दर्जेदार शिक्षण देण्याचे प्रयत्नात रिक्त पदे आडकाठी ठरत आहेत. विहाराचे पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची गुणवत्ता ठासळत आहे. शिक्षण हे वाघीनीचे दुध असल्याचे म्हटले जात असले तरी या दुधालाच आटविण्याचा हा प्रयत्न आहे. शासन स्तरावर रिक्त पदे भरण्याचे प्रयत्न झाले पाहिजे, अशी माहिती धनेंद्र तुरकर यांनी दिली आहे.विकास कार्यासाठी हजार कोटींची गरजभंडारा जिल्ह्यात विकास कार्यासाठी अनेक विभाग कार्यरत आहेत. या विभागांना अर्धवट निधी उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे विशेषत: ग्रामीण भागात विकासाचे लचके तोडली जात आहे. गावांना जोडणारे पूर्ण रस्ते बांधकाम करता येत नाही. इमारती बांधकामाचा बेधडक कार्यक्रम राबविता येत नसल्याची माहिती धनेंद्र तुरकर यांनी दिली आहे.निधी अभावी जिल्ह्यात प्रभावी विकास कार्यक्रम राबविताना सर्वच विभागांना अडचणीचे ठरत आहे. विकास कार्यासाठी १ हजार कोटीचे निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.-धनेंद्र तुरकर, सभापती अर्थ व शिक्षण समिती भंडारा.