लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कुशल कामाच्या निधी अभावी २४ कोटी रूपयाची देयके अडली आहेत. यामुळे ग्रामीण भागात विकास प्रभावित ठरत असल्याने जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या शिवाय सकारात्मक चर्चा केली. महिना भरात थकीत निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात गेल्या दोन वर्षापासून कुशल कामे करण्यात आली आहेत. याशिवाय योजनेतून नव्याने कुशल कामे प्रस्तावित व मंजूर करण्यात आली आहेत. परंतु थकीत निधी उपलब्ध करण्यात येत नसल्याने नव्याने प्रस्तावित कुशल कामांना यंत्रणा हात जोडून नमस्कार करीत आहे. नव्याने मंजुरी प्रदान करण्यात आलेली विकास कामे सुरू करण्यात आली नाही.यामुळे गावात होणाऱ्या विकास कामांना ब्रेक मिळाला आहे. या योजने अंतर्गत कुशल कामांचा नाव घेतले असता यंत्रणा नाक तोंड दाबत आहे. गावात मजुरांना रोजगार आणि गावांचा चेहरा मोहरा बदलविणारी योजना म्हणून आशेचे बघीतने जात आहे. परंतु सरसकट निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायत स्तरावर पदाधिकारी टेंशन घेताना दिसून येत आहे. मजुरांची ओरड आणि रोष थेट ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांचे दिशेने जात असल्याचे त्यांचे हिताचे विचार करताना पदाधिकारी आराखडा घेत आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील तालुक्यांना कुशल कामाचे थकीत निधी देण्यात आला नाही. २४ कोटी रूपयांचे घरात निधी अडला असल्याने साहित्य धारक आणि पुरवठा धारकांचे ओरडणे सुरू झाले आहे. गावात देयकांचे प्राप्ती वरून भांडणे सुरू झाले आहे. या थकीत निधी करिता जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांना निवेदन दिले.ग्रामीण भागात प्रभावित कामाचे बाबतीत त्यांनी विस्तृत चर्चा केली आहे. निधी नसल्याने यंत्रणा थकल्याचे माहिती त्यांनी दिली. या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. महिला भरात संपूर्ण निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन चर्चे दरम्यान त्यांनी दिले. यावेळी यशवंत सोनकुसरे, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, सिहोराचे सरपंच मधु अडमाचे, चंद्रशेखर बन्सोड उपस्थित होते.जिल्ह्यात शिक्षकांचे पद रिक्तभंडारा जिल्ह्यात शिक्षकांचे १८२ पदे रिक्त आहेत. यामुळे दर्जेदार शिक्षण देण्याचे प्रयत्नात रिक्त पदे आडकाठी ठरत आहेत. विहाराचे पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची गुणवत्ता ठासळत आहे. शिक्षण हे वाघीनीचे दुध असल्याचे म्हटले जात असले तरी या दुधालाच आटविण्याचा हा प्रयत्न आहे. शासन स्तरावर रिक्त पदे भरण्याचे प्रयत्न झाले पाहिजे, अशी माहिती धनेंद्र तुरकर यांनी दिली आहे.विकास कार्यासाठी हजार कोटींची गरजभंडारा जिल्ह्यात विकास कार्यासाठी अनेक विभाग कार्यरत आहेत. या विभागांना अर्धवट निधी उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे विशेषत: ग्रामीण भागात विकासाचे लचके तोडली जात आहे. गावांना जोडणारे पूर्ण रस्ते बांधकाम करता येत नाही. इमारती बांधकामाचा बेधडक कार्यक्रम राबविता येत नसल्याची माहिती धनेंद्र तुरकर यांनी दिली आहे.निधी अभावी जिल्ह्यात प्रभावी विकास कार्यक्रम राबविताना सर्वच विभागांना अडचणीचे ठरत आहे. विकास कार्यासाठी १ हजार कोटीचे निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.-धनेंद्र तुरकर, सभापती अर्थ व शिक्षण समिती भंडारा.
महिनाभरात रोहयोचा थकीत निधी उपलब्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:28 IST
भंडारा जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कुशल कामाच्या निधी अभावी २४ कोटी रूपयाची देयके अडली आहेत. यामुळे ग्रामीण भागात विकास प्रभावित ठरत असल्याने जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
महिनाभरात रोहयोचा थकीत निधी उपलब्ध होणार
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू : सभापती धनेंद्र तुरकर यांची सकारात्मक चर्चा