शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

एकलारी रस्ता झाला मृत्यूमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:59 IST

वरठी-एकलारी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. वरठी पासून एक किमी अंतरावर असलेल्या एकलारी गावाला जाणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे. दिवस रात्र वाहन व पादचाऱ्यांचा रेलचेल असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. एक किमी अंतराच्या रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देअपघातात वाढ : वरठीपासून एकलारीपर्यंत खड्डेच खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : वरठी-एकलारी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. वरठी पासून एक किमी अंतरावर असलेल्या एकलारी गावाला जाणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे. दिवस रात्र वाहन व पादचाऱ्यांचा रेलचेल असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. एक किमी अंतराच्या रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे दुर्घटनांना कारणीभूत असून विध्यार्थी व नागरिकां करिता डोकेदुखी ठरत आहेत. वरठी- एकलारी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वरठी - एकलारी रस्ता हा परिसरातील अनेक गावाना जोडणारा रस्ता आहे. वरठी हे गाव केंद्र ठिकाण असल्यामुळे एकलारी, नेरी, बीड, सातोना येथून वरठीला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शालेय शिक्षणा करिता परिसरातील शेकडो विध्यार्थी दररोज वरठीला येतात. या रस्त्याची अवस्था वाईट असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.वरठी- एकलारी - बीड हा रास्ता डांबरी असला तरी डांबरीकरण दूर दूर पर्यंत दिसत नाही. या मार्गावर पडलेले असंख्य खड्डे हे दुर्घटनाना आमंत्रण देणारे आहेत. वरठी - एकलारी रस्त्यांवर पडलेले खड्डे म्हंणजे एकप्रकारचे विश्वरीकार्ड ठरत आहेत. रस्त्यावर पडणारे खड्डे हे नेहमीचे असले तरी वरठी- एकलारी मार्गावर असलेले खड्ड्यात स्वरूप म्हंणजे एकप्रकारचे छोटेखानी डबक्याप्रमाणे आहेत. वरठी येथून एकलारी ला जाण्यासाठी असलेल्या वळण मार्गावर पडलेले खड्डा म्हणजे तलावाचं असल्यासारखा भासतो.वरठी - भंडारा राज्य महामार्ग सोडून राष्ट्रीय महामागार्ला जोडणारा हा रस्ता आहे.नागपूर जिल्ह्यातील गावाना जाण्याकरिता शॉर्टकट मार्ग असल्यामुळे रस्त्यावरून दिवस रात्र रहदारी सुरु राहते. पण रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उखडलेले रस्ता हे जिल्ह्यातील अन्य रस्त्यांची स्थिती दर्शविते. दर दोन फुटावर या प्रमाणे मोजता येणार नाही असे असंख्य खड्डे पडले आहेत. नुसते खड्डे पडले नसून त्यात पावसाचे पाणी जमा झाल्यावर एखादा अपघात झाल्यास खड्यात पडलेले वाहन बुडून जाईल अशी अवस्था आहे. या मार्गावर अनेक वळण मार्ग आहेत. प्रत्येक वळण मार्गावर असलेले खड्डे म्हंणजे अपघाताला आमंत्रण ठरणारे आहेत.वरठी ते एकलारी व एकलारी ते बीड गावाला जोडणारा हा रस्ता खड्ड्यामुळे त्रासदायक ठरला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी जमा राहते. यामुळे या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना खड्डे पडल्याचे दिसत नाही आणि ते नकळत अपघाताला समोर जातात. पाणी भरलेल्या खड्ड्यातून धावणाऱ्या वाहनांमुळे पायी चालणाऱ्या पादचाऱ्याना त्रासदायक ठरत आहे. याचा सर्वात मोठा फटका विध्यार्थ्यांना बसतो. खड्ड्यातील घाण पाणी अंगावर उडाल्याने त्यांना शाळेत जाण्यापासून मुकावे लागते. रस्त्याची वाईट अवस्था जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेचे उदाहरण आहे. सदर रस्ता रास्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक