शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

एकलारी रस्ता झाला मृत्यूमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:59 IST

वरठी-एकलारी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. वरठी पासून एक किमी अंतरावर असलेल्या एकलारी गावाला जाणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे. दिवस रात्र वाहन व पादचाऱ्यांचा रेलचेल असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. एक किमी अंतराच्या रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देअपघातात वाढ : वरठीपासून एकलारीपर्यंत खड्डेच खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : वरठी-एकलारी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. वरठी पासून एक किमी अंतरावर असलेल्या एकलारी गावाला जाणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे. दिवस रात्र वाहन व पादचाऱ्यांचा रेलचेल असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. एक किमी अंतराच्या रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे दुर्घटनांना कारणीभूत असून विध्यार्थी व नागरिकां करिता डोकेदुखी ठरत आहेत. वरठी- एकलारी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वरठी - एकलारी रस्ता हा परिसरातील अनेक गावाना जोडणारा रस्ता आहे. वरठी हे गाव केंद्र ठिकाण असल्यामुळे एकलारी, नेरी, बीड, सातोना येथून वरठीला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शालेय शिक्षणा करिता परिसरातील शेकडो विध्यार्थी दररोज वरठीला येतात. या रस्त्याची अवस्था वाईट असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.वरठी- एकलारी - बीड हा रास्ता डांबरी असला तरी डांबरीकरण दूर दूर पर्यंत दिसत नाही. या मार्गावर पडलेले असंख्य खड्डे हे दुर्घटनाना आमंत्रण देणारे आहेत. वरठी - एकलारी रस्त्यांवर पडलेले खड्डे म्हंणजे एकप्रकारचे विश्वरीकार्ड ठरत आहेत. रस्त्यावर पडणारे खड्डे हे नेहमीचे असले तरी वरठी- एकलारी मार्गावर असलेले खड्ड्यात स्वरूप म्हंणजे एकप्रकारचे छोटेखानी डबक्याप्रमाणे आहेत. वरठी येथून एकलारी ला जाण्यासाठी असलेल्या वळण मार्गावर पडलेले खड्डा म्हणजे तलावाचं असल्यासारखा भासतो.वरठी - भंडारा राज्य महामार्ग सोडून राष्ट्रीय महामागार्ला जोडणारा हा रस्ता आहे.नागपूर जिल्ह्यातील गावाना जाण्याकरिता शॉर्टकट मार्ग असल्यामुळे रस्त्यावरून दिवस रात्र रहदारी सुरु राहते. पण रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उखडलेले रस्ता हे जिल्ह्यातील अन्य रस्त्यांची स्थिती दर्शविते. दर दोन फुटावर या प्रमाणे मोजता येणार नाही असे असंख्य खड्डे पडले आहेत. नुसते खड्डे पडले नसून त्यात पावसाचे पाणी जमा झाल्यावर एखादा अपघात झाल्यास खड्यात पडलेले वाहन बुडून जाईल अशी अवस्था आहे. या मार्गावर अनेक वळण मार्ग आहेत. प्रत्येक वळण मार्गावर असलेले खड्डे म्हंणजे अपघाताला आमंत्रण ठरणारे आहेत.वरठी ते एकलारी व एकलारी ते बीड गावाला जोडणारा हा रस्ता खड्ड्यामुळे त्रासदायक ठरला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी जमा राहते. यामुळे या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना खड्डे पडल्याचे दिसत नाही आणि ते नकळत अपघाताला समोर जातात. पाणी भरलेल्या खड्ड्यातून धावणाऱ्या वाहनांमुळे पायी चालणाऱ्या पादचाऱ्याना त्रासदायक ठरत आहे. याचा सर्वात मोठा फटका विध्यार्थ्यांना बसतो. खड्ड्यातील घाण पाणी अंगावर उडाल्याने त्यांना शाळेत जाण्यापासून मुकावे लागते. रस्त्याची वाईट अवस्था जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेचे उदाहरण आहे. सदर रस्ता रास्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक