शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालय मिळालेच पाहिजे

By admin | Updated: September 13, 2014 01:01 IST

सुमारे १२ कोटींच्या महाराष्ट्र राज्यात सहा कोटींच्यावर ओबीसी प्रवर्गातील समाज आहे. त्यातुलनेत अनूसूचित जाती, जमाती.....

भंडारा : सुमारे १२ कोटींच्या महाराष्ट्र राज्यात सहा कोटींच्यावर ओबीसी प्रवर्गातील समाज आहे. त्यातुलनेत अनूसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यक प्रवर्गातील समाज कमी असतानाही आघाडी शासनाने केवळ मताच्या राजकारणासाठी ओबीसी प्रवर्गाला डावलले आहे. अनूसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यकांसाठी जशी तरतूद आहे, त्याचप्रमाणे ओबीसी समाजासाठी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करुन राज्यात महायुतीची सत्ता आल्यास ओबीसी प्रवर्गाच्या स्वतंत्र मंत्रालयासाठी पुढाकार घेणार असा निर्धार आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला. राज्यातील आघाडी शासनाकडून ओबीसी समाजाला सातत्याने डावलण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, उद्योग उभे करण्यासाठी मदत लाभत नाही, सुशिक्षीत बेरोजगारांना कर्ज उपलब्ध होत नाही. घरकुलाची समस्या तर कायम आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगात ओबीसी विद्यार्थी पूढे जावा, यासाठी राज्यात स्वतंत्र परीक्षा मार्गदर्शन केंद्र नाही. यासाठी आपण सभागृहात वारंवार लक्षवेधी, तारांकित प्रश्न उचलला. परंतु १२ कोटी जनतेचे मायबाप असलेले आघाडी सरकार ओबीसीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत राहिले. राज्य शासनाचा दरवर्षांचा बजेट सुमारे ६० हजार कोटींचा आहे. राज्यात सहा कोटी ओबीसी असताना त्यांना १०० कोटींच्यावर काही मिळत नाही. समाजाच्या संख्येनुसार त्यांना मदत मिळाली पाहिजे असे सांगून आ. भोंडेकर म्हणाले, आजघडीला अनूसूचित जातीसाठी ५,००० कोटींची तरतूद, अनूसूचित जमातीसाठी ३,५०० कोटींची तर अल्पसंख्यक प्रवर्गासाठी ५०० कोटींची तरतूद आहे. त्यामुळे ओबीसीसाठी किमान १,५००० कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे. जेणेकरुन ओबीसी समाजातील तरुणांना शिक्षण, रोजगार, उद्योग क्षेत्रात कर्तबगारी करता येईल. परिणामी ओबीसी समाज पुढे जाण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)