शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम संस्कारातही मायेची सावली नाही...

By admin | Updated: May 30, 2016 00:56 IST

जीवनातला अंतिम क्षण हा मृत्यू असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू बनत नसतो. दाहसंस्कार ही जीवनातील अंतिम प्रक्रिया असते.

मृत्यूनंतरही थट्टा : मोहाडी तालुक्यात ३६ गावात स्मशानशेड नाही, ६४ गावांच्या स्मशानभूमीत पाण्याची सोय नाहीराजू बांते मोहाडीजीवनातला अंतिम क्षण हा मृत्यू असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू बनत नसतो. दाहसंस्कार ही जीवनातील अंतिम प्रक्रिया असते. नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावा लागतो. संपूर्ण आयुष्य सुखात व स्वत:च्या शरीराला जपणारा हा व्यक्ती अग्नीत लोप पावतो. तथापि या निर्जीव देहाला काही काळ तरी मायेची सावली मिळावी ही किमान अपेक्षा नातलगांची असते. पण मोहाडी तालुक्यातील ३६ गावात स्मशान शेड नसल्याने मृतात्मा तपत्या सुर्यात/ पाण्यापावसात जाळावा लागतो.मृत्यूनंतर मुखाग्नी दिली जाते. पण मृत्यूपर्व सुखात राहणारा मनुष्य प्राणी विविध स्तरावर संघर्ष करीत असतो, ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना गरीब, श्रीमंत आपल्यापरीने करीत असतो. जिवंतपणी उन्हाचा दाह कमी करण्यासाठी निवारा म्हणून घर असतो. घरात पंखा, कुलर लावला जातो, पावसाच्या बचावासाठी रेनकोट छत्र्यांचा वापर केला जातो. अशाप्रकारे स्वत:ला जपत असतो. स्वत:ला जपणारे शरीर एक दिवस परलोकी जातो. देहलोकी शरीरावर अंतिम संस्कार केला जातो. तत्पूर्वी त्याच्या पार्थिवाला सावली दिली जाते. अग्नीस्थानी चिता ठेवली जाते तेव्हा मायेची सावली दूर केली जाते. त्यानंतर जळणाऱ्या देहाला वरच्या मायेच्या सावलीचे पांघरुन असावे यासाठी शासनातर्फे श्मशासन शेड निर्माण केले जाते. तथापि, अंतिम संस्कारातही त्या मृत्युरुपी शरीराला ३६ गावात मायेची सावली मिळत नसल्याचे दिसून आले आहे.अंतिम संस्कार करण्यासाठी धर्मापुरी, भोसा, चिचोली, देवूळगाव, बिटेखारी, नरसिंहटोला, देव्हाडा बू. ढिवरवाडा, किसनपूर, कान्हळगाव, मुंढरी, काटे बाम्हणी, लेंडेझरी, केसलवाडा, डोंगरदेव, बोंडे, मोरगाव, महालगाव, मालिदा, बोटेश्वर, जांभळपाणी, दवडीपार, मुंढरी खू. निलज बू., निलज खू., पालडोंगरी, पांढराबोडी, बोरी, पिंपळगाव चोरखमारी, सकरला, नेरला, सितेपार झं., शिवनी, ताडगाव, सिहरी फुटाळा निवारा तयार केला गेला नाही. तसेच महसूल विभागाकडे श्मशानभूमीची नोंद नाही, अशी अकरा गाव आहेत. मोरगाव, वासेरा, ताडगाव, मुंढरी खू., मलीदा, जांभोरा, किसनपूर या गावाचा समावेश आहे. या गावात प्रेत पुरण्यासाठी गावात जमीन नाही. ज्या गावात जन्माची नाळ गाडली जाते. त्याच भूमित आपली अंतीम संस्कार व्हावा, अशी अनेकाचंी इच्छा असते. पण, गावच्याच मातीत अंतीम संस्कार करण्यासाठी गावची भूमि मिळत नाही ही चिंतेची बाब आहे.गाव तिथे अंतिम संस्कार निवारा असावा. मातीत संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी असावी, असे असताना स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्षीही अंतिम संस्काराच्या सोयी सुविधा करण्यास प्रशासन दूर राहिला आहे. ६४ गावात श्मशानभूमीवर हातपंपाची सोय नाही. उन्हाळ्यात नाले, नद्या कोरड्याठक पडतात. त्यावेळी स्मशानघाटावर हातपंप असले तर अंतीम संस्काराचे सुतक करण्यासाठी पाण्याचा वापर होईल. तसेच अंतीम संस्कारासाठी जमलेल्या आप्तमंडळींना कोरडे घसे ओले करता येतील.स्मशानभूमीवर ना श्मशानशेड ना पाण्याची सोय करण्यासाठी कोणत्याच शासनाने आवश्यक पावले उचलली नाही. मृतात्मा जाळतानाही दु:ख अन् त्यांच्या परिवारालाही वेदना देण्याचं काम शासन करीत आहे..डबक्यातील पाण्याने अग्निसंस्कारअंतिम संस्कारासाठी पाणी महत्त्वाचे असते. पण ६४ गावात स्मशानघाटावर पाण्याची व्यवस्था नाही. अग्निदाह करण्यापूर्वी मुखाग्नी देणारे नातलग पाण्याने ओले होतात. मगच शवाला मुखाग्नी देण्याची रित पार पाडतात. मुखाग्नी देण्याचा संस्कार करण्यापूर्वी पाणी घरुन तर काहींना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. काही तर डबक्यातील साचलेलं पाणी अंगावर शिंपडून अग्नी संस्कार करतात.