शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अंतिम संस्कारातही मायेची सावली नाही

By admin | Updated: May 25, 2014 23:20 IST

मृत्यू हा जीवनातील अंतिम क्षण असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू आलेला बनत नसतो. त्याचा देह असते नाशिवंत. पण या नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावाच लागतो. स्वत:च्या शरीराला जपणारा हा

राजू बांते -मोहाडी

मृत्यू हा जीवनातील अंतिम क्षण असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू आलेला बनत नसतो. त्याचा देह असते नाशिवंत. पण या नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावाच लागतो. स्वत:च्या शरीराला जपणारा हा व्यक्ती मृत्यूनंतर जळणार्‍या देहाला किमान काही काळ तरी मायेची सावलीमिळत नसल्याचे तालुक्यात दिसून आले आहे.

ऊन, वारा व पाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना गरीब / श्रीमंत आपापल्या परीने करीत असतो. जीवंतपणी उन्हाचा दाह कमी करण्यासाठी घर असतो. घरात कुलर, पंखा, ए.सी. लावला जातो. पावसाच्या बचावासाठी रेनकोट, छत्र्यांचा वापर केला जातो. प्रत्येक व्यक्ती स्वत:ला जपत असतो. मृत्यूनंतरही त्याच्या देहलोकी शरीराला अग्नी देईपर्यंत जपणार्‍या संस्कार केला जातो. पण तो देह पूर्ण जळेपर्यंत त्याच्या जळणार्‍या देहाला वरच्या मायेच्या सावलीचा पांघरून मिळावा यासाठी स्मशानशेडची योजना आहे. पण मोहाडी तालुक्यात ४१ गावात स्मशानशेडची व्यवस्था नाही आहे. यात वासेरा, देऊळगाव, ताडगाव, पालडोंगरी, मलिदा, आंधळगाव, अकोला, चिचोली, शिवनी, सालेबर्डी, पांढराबोडी, काटेबाम्हणी, सालई बु., भिकारखेडा, महालगाव, पारडी, वडेगाव, सितेपार, दहेगाव, पिंपळगाव, भोसा, नेरी, बोथली, बीड सितेपार, देव्हाडा बु., निलज बु., निलख खु, नवेगाव बु., मोहगाव, करडी, करडी, मुंढरी खु., मुंढरी बु., कान्हळगाव / करडी, बोरी, किसनपूर, केसलवाडा, बोरगाव, ढिवरवाडा, खडकी, बोंद्रे, डोंगरदेव आदी गावात स्मशानशेडची कमतरता आहे. त्याशिवाय अंतिम संस्कारासाठी मातीत देह पुरण्यासाठी १४ गावात स्मशानभूमी नसल्याची माहिती दिसून आली. यात ढिवरवाडा, केसलवाडा, कान्हळगाव, मुंढरी, बोरगाव, मोरगाव, फुटाळा, ताडगाव, मुंढरी, मलीदा, सिरसोली का., घाटकुरोडा, जांभोरा, किसनपूरचा गावांना स्मशानभूमीच नाही. तसेच महसूल विभागाकडे स्मशानभूमीची नोंद नाही असे अकरा गावे आहेत. मोरगाव, वासेरा, फुटाळा, भिकारखेडा, धर्मापूरी, ताडगाव, मुंढरी खु., मलीदा, जांभोरा, किसनपूर या गावांचा समावेश आहे. खरा प्रश्न भेडसावतो त्या १४ गावांना ज्यांना प्रेत पुरण्यासाठी गावात जमीन नाही. ही बाब विधानसभेत विचारली गेली होती. स्थानिक आमदारांनी तारांकीत प्रश्न विधानसभेत मांडला गेला होता. ज्या गावात जन्माची नाळ गाडली गेली त्यासाठी घरची भूमी वापरात येते. मात्र त्यांचे मातीत अंतिम संस्कार करण्यासाठी गावाची भूमि मिळत नाही ही बाब विचार करणारी आहे.

गाव तेथे स्मशानशेड असावे. मातीत संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी असावी असे असताना स्वातंत्र्यांच्या ६७ व्या वर्षीही अंतिम संस्काराच्या सोयी सुविधा करण्यास प्रशासन / शासन दूर राहिली आहे. ही बाब एवढ्यावरच थांबली नाही. अंतिम संस्काराचे सोयरसूतक करण्यासाठी पाण्याचीही मोठी बोंब असते. गावच्या स्मशानभूमीत एक तरी हातपंप असावे अशी किमान मागणीही शासन पूर्ण करू शकलेला नाही. उन्हाळ्यात नाले, ओढे, नद्या कोरड्या पडतात अशा वेळी अंतिम संस्कार करण्यासाठी पंचवीस कि.मी. अंतरावर असणारी वैनगंगा नदीवर नेणे हाच एक पर्याय असतो. पण हे सगळ्यांनाच जमत नाही. त्याचा पर्याय शोधला जातो. नजीकच्या विहिरीवरून पाणी शोधून अंतिम संस्काराचे सूतक केले जातात. लहान नदीमध्ये रेती ओढून पाण्याचा शोध लावूनही मोठय़ा कष्टाने अंतिम संस्कार केले जात आहेत. मृत्यूनंतरही थट्टा थांबविण्यासाठी शासनाने स्मशानभूमी, एक हातपंप, शोकमंडपाची सुविधा करणे गरजेचे आहे.