शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

विदर्भाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 00:22 IST

मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी अशी आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा तुलनात्मक

राजकुमार तिरपुडे : -तर हिंदी भाषिकांचे एकच राज्य कराभंडारा : मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी अशी आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास महाराष्ट्र राज्याचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दैनंदिन विकास होत असताना नागपूर कराराकडे परस्पर दुर्लक्ष झाल्याने विविध क्षेत्रात अनुशेष निर्माण झाला. आजघडीला १.५० लाख कोटीच्या घरात असून कधीही भरून येणे शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नसल्याचे मत विदर्भ राज्याचे समर्थक राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. या संपूर्ण काळात जागृत विदर्भीय नेत्यांनी या प्रादेशिक अन्यायाविरूद्ध आवाज उठविला. वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जोर धरू लागली. अनुशेष भरून देत नसाल तर विदर्भ राज्य वेगळे देण्याची मागणी करण्यात आली व वैदर्भीय जनतेने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमिवर वैदर्भीय जनतेत विदर्भावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाबद्दल असंतोष आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्रात विदर्भ शासनाकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे पिछाडीवर आहे. शेतकरी आत्महत्या ही विदर्भातील विशेष ज्वलंत समस्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)१९ मे विदर्भ राज्य संकल्प दिवस पाळा१९ मे हा दिवस विदर्भवादी जनतेतर्फे संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्य संकल्प दिवस म्हणून पाळला जातो. स्वतंत्र विदर्भाचे खंदे पुरस्कर्ते व महाराष्ट्राचे प्रथम उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या स्मृतीदिवसाचे औचित्य साधून विदर्भवादी उत्स्फूर्तपणे हा दिवस साजरा करतात. यंदाही याप्रसंगी विदर्भातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील जनतेने ‘माझा विदर्भ हा नैसर्गिक संपत्ती तसेच विविधतेने परिपूर्ण असूनही हवी असलेली संपन्नता विदर्भाच्या वाट्याला आलेली नाही. आम्हाला विश्वास वाटतो की विदर्भराज्य वेगळे झाल्यास आमच्या विदर्भाची प्रगती होवून संपन्नता येईल. विदर्भ राज्य मिळविण्याचा मी संकल्प करतो’. अशी शपथ घेण्याचे आवाहनही राजकुमार तिरपुडे यांनी केली.