शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

विदर्भाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 00:22 IST

मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी अशी आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा तुलनात्मक

राजकुमार तिरपुडे : -तर हिंदी भाषिकांचे एकच राज्य कराभंडारा : मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी अशी आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास महाराष्ट्र राज्याचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दैनंदिन विकास होत असताना नागपूर कराराकडे परस्पर दुर्लक्ष झाल्याने विविध क्षेत्रात अनुशेष निर्माण झाला. आजघडीला १.५० लाख कोटीच्या घरात असून कधीही भरून येणे शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नसल्याचे मत विदर्भ राज्याचे समर्थक राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. या संपूर्ण काळात जागृत विदर्भीय नेत्यांनी या प्रादेशिक अन्यायाविरूद्ध आवाज उठविला. वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जोर धरू लागली. अनुशेष भरून देत नसाल तर विदर्भ राज्य वेगळे देण्याची मागणी करण्यात आली व वैदर्भीय जनतेने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमिवर वैदर्भीय जनतेत विदर्भावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाबद्दल असंतोष आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्रात विदर्भ शासनाकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे पिछाडीवर आहे. शेतकरी आत्महत्या ही विदर्भातील विशेष ज्वलंत समस्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)१९ मे विदर्भ राज्य संकल्प दिवस पाळा१९ मे हा दिवस विदर्भवादी जनतेतर्फे संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्य संकल्प दिवस म्हणून पाळला जातो. स्वतंत्र विदर्भाचे खंदे पुरस्कर्ते व महाराष्ट्राचे प्रथम उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या स्मृतीदिवसाचे औचित्य साधून विदर्भवादी उत्स्फूर्तपणे हा दिवस साजरा करतात. यंदाही याप्रसंगी विदर्भातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील जनतेने ‘माझा विदर्भ हा नैसर्गिक संपत्ती तसेच विविधतेने परिपूर्ण असूनही हवी असलेली संपन्नता विदर्भाच्या वाट्याला आलेली नाही. आम्हाला विश्वास वाटतो की विदर्भराज्य वेगळे झाल्यास आमच्या विदर्भाची प्रगती होवून संपन्नता येईल. विदर्भ राज्य मिळविण्याचा मी संकल्प करतो’. अशी शपथ घेण्याचे आवाहनही राजकुमार तिरपुडे यांनी केली.