शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

‘तिथे’ जडीबुटीने केला जातो ‘सर्पदंशा’वर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:05 IST

पालोरा येथील अमरकंठ मेश्राम १५ प्रकारच्या रोगांवर जडीबुटीच्या माध्यमातून धर्मार्थ व नि:शुल्क उपचार करीत असून ....

ठळक मुद्देशेकडोंना लाभ : पालोरा येथील अमरकंठचा १७ वर्षांपासून नित्यक्रम

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : पालोरा येथील अमरकंठ मेश्राम १५ प्रकारच्या रोगांवर जडीबुटीच्या माध्यमातून धर्मार्थ व नि:शुल्क उपचार करीत असून कोका वन्यजीव अभयारण्यातून भटकंती करुन जडीबुटी मिळवितात. आता पर्यंत शेकडों लोकांना साप, विंचू, कुत्रा, मुळव्याध, किडनीस्टोन, प्रसुतवाई, ठाण (गाठ) वात, लकवा, नपुंसकता, मिया, काटेमिया, खजरी, कानफुटी, चालनीकाटा तसेच अन्य आजारांवर निशुल्क औषधांचे वाटप व लेप लावतात. लाभ होत असल्याने दु:खी होऊन येणारे उपचारानंतर हसत बाहेर पडत असल्याची सुखद अनुभूती रूग्णांना येत आहे.पालोरा येथील अमरकंठ सितकुरा मेश्राम (५७) यांचे शिक्षण चवथीपर्यंत झाले असून मजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. घरची मंडळी त्यांना या धर्मार्थ कार्यासाठी मदत करतात. मागील १७ वर्षापासून त्यांचा हा औषधी देण्याचा व लेप करुन उपचाराचा नित्यक्रम सुरु आहे. मोहाडी, तुमसर, भंडारा तालुक्यात त्यांच्या धर्मार्थ कार्याची माहिती असून नागरिक मोठ्या अपेक्षेने रुग्णांना घेऊन त्यांच्याकडे पोहोचतात. मेश्राम यांना त्यांचे वडील सितकुरा मेश्राम यांच्याकडून हा वारसा मिळालेला आहे. त्यांचे वडीलही धर्मार्थ कामात अग्रेसर होते. जडीबुटीच्या माध्यमातून उपचार करण्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांच्या पत्नीला दोनदा सर्पदंश झाला होता. खडकी/पालोरा येथील होलबाजी भालाधरे हे साप व विंचूच्या औषधांचे वैद्य म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी उपचार केले. सर्पदंशातून ती सुखरुप बचावली.होलबाजींनी पालोरा गावात धर्मार्थ औषध देणारे कुणीही नसल्याचे ओळखून विविध औषधांची माहिती व विधी त्यांना सांगितली. प्रत्यक्ष कार्याची माहिती दिली. त्यांच्याबरोबर जंगलात भटकंती करुन औषधांची ओळख व गुणधर्म जाणून घेतल्याचे अमरकंठ सांगतात. ते सन १९९० पासून औषधांचे वितरण करीत असून शेकडो लोकांना त्यांनी विषमुक्त केले.वनविभाग दखल घेईल काय?कोका वन्यजीव अभयारण्यातील दुर्मिळ वनौषधींचा उपचार करीत अनेकांना लाभ मिळाला आहे. अमरकंठ अल्पशिक्षित असल्याने त्यांना वनैषधींचे शास्त्रीय नाव माहित नाहीत. मात्र, उपचाराच्या पध्दती त्यांना कळतात. वनविभाग त्यांच्या कार्याची व अनुभवाची दखल घेणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.