शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

‘तिथे’ जडीबुटीने केला जातो ‘सर्पदंशा’वर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:05 IST

पालोरा येथील अमरकंठ मेश्राम १५ प्रकारच्या रोगांवर जडीबुटीच्या माध्यमातून धर्मार्थ व नि:शुल्क उपचार करीत असून ....

ठळक मुद्देशेकडोंना लाभ : पालोरा येथील अमरकंठचा १७ वर्षांपासून नित्यक्रम

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : पालोरा येथील अमरकंठ मेश्राम १५ प्रकारच्या रोगांवर जडीबुटीच्या माध्यमातून धर्मार्थ व नि:शुल्क उपचार करीत असून कोका वन्यजीव अभयारण्यातून भटकंती करुन जडीबुटी मिळवितात. आता पर्यंत शेकडों लोकांना साप, विंचू, कुत्रा, मुळव्याध, किडनीस्टोन, प्रसुतवाई, ठाण (गाठ) वात, लकवा, नपुंसकता, मिया, काटेमिया, खजरी, कानफुटी, चालनीकाटा तसेच अन्य आजारांवर निशुल्क औषधांचे वाटप व लेप लावतात. लाभ होत असल्याने दु:खी होऊन येणारे उपचारानंतर हसत बाहेर पडत असल्याची सुखद अनुभूती रूग्णांना येत आहे.पालोरा येथील अमरकंठ सितकुरा मेश्राम (५७) यांचे शिक्षण चवथीपर्यंत झाले असून मजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. घरची मंडळी त्यांना या धर्मार्थ कार्यासाठी मदत करतात. मागील १७ वर्षापासून त्यांचा हा औषधी देण्याचा व लेप करुन उपचाराचा नित्यक्रम सुरु आहे. मोहाडी, तुमसर, भंडारा तालुक्यात त्यांच्या धर्मार्थ कार्याची माहिती असून नागरिक मोठ्या अपेक्षेने रुग्णांना घेऊन त्यांच्याकडे पोहोचतात. मेश्राम यांना त्यांचे वडील सितकुरा मेश्राम यांच्याकडून हा वारसा मिळालेला आहे. त्यांचे वडीलही धर्मार्थ कामात अग्रेसर होते. जडीबुटीच्या माध्यमातून उपचार करण्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांच्या पत्नीला दोनदा सर्पदंश झाला होता. खडकी/पालोरा येथील होलबाजी भालाधरे हे साप व विंचूच्या औषधांचे वैद्य म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी उपचार केले. सर्पदंशातून ती सुखरुप बचावली.होलबाजींनी पालोरा गावात धर्मार्थ औषध देणारे कुणीही नसल्याचे ओळखून विविध औषधांची माहिती व विधी त्यांना सांगितली. प्रत्यक्ष कार्याची माहिती दिली. त्यांच्याबरोबर जंगलात भटकंती करुन औषधांची ओळख व गुणधर्म जाणून घेतल्याचे अमरकंठ सांगतात. ते सन १९९० पासून औषधांचे वितरण करीत असून शेकडो लोकांना त्यांनी विषमुक्त केले.वनविभाग दखल घेईल काय?कोका वन्यजीव अभयारण्यातील दुर्मिळ वनौषधींचा उपचार करीत अनेकांना लाभ मिळाला आहे. अमरकंठ अल्पशिक्षित असल्याने त्यांना वनैषधींचे शास्त्रीय नाव माहित नाहीत. मात्र, उपचाराच्या पध्दती त्यांना कळतात. वनविभाग त्यांच्या कार्याची व अनुभवाची दखल घेणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.