शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जिल्ह्यात २ लाख ३१ हजार शेतकरी दोन हेक्टरखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:45 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. जिल्ह्यातील दोन लाख ५३ हजार शेतकऱ्यांपैकी २ लाख ३१ हजार शेतकरी दोन हेक्टर आतील अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. रविवारी या योजनेच्या लाभ वितरणाचा प्रातिनिधीक शुभारंभ येथील जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला.

ठळक मुद्देकिसान सन्मान योजना : निधी वितरणाचा जिल्हास्तरीय प्रातिनिधीक शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. जिल्ह्यातील दोन लाख ५३ हजार शेतकऱ्यांपैकी २ लाख ३१ हजार शेतकरी दोन हेक्टर आतील अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. रविवारी या योजनेच्या लाभ वितरणाचा प्रातिनिधीक शुभारंभ येथील जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये दिले जाणार आहे. तीन टप्प्यात मिळणाऱ्या या निधीसाठी प्रशासन याद्या तयार करीत आहेत. ५ फेब्रुवारीपासून याद्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत १ लाख ६ हजार शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्यात आली. या आॅनलाईन माहितीत शेतकऱ्यांचे नाव, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर तपशील आहे. इतर शेतकऱ्यांची माहितीही लवकरच संकलीत केली जात आहे. संकलीत केलेली माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्या जात आहे. त्यानंतर त्यांची छाननी करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची नावे अंतिम केली जात आहे.पहिल्या टप्प्यात ६ हजार १७७ शेतकºयांची नावे पात्र ठरली आहेत. त्यातील २५०० शेतकऱ्यांची नावे अंतीम तयार करण्यात आली असून त्यांच्या खात्यात पैसे लवकरच वळते केले जाणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात रविवारी निधी वितरण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, किसान सन्मान योजनेचे नोडल अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एम. खांडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण, तहसीलदार अक्षय पोयाम उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कृषी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा यासाठी कृषी विभाग, पंचायत विभाग, सेवा सहकारी संस्था प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन टप्प्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार होणार आहे.९० टक्के शेतकरी अल्प भूधारकजिल्ह्यात २ लाख ५३ हजार शेतकरी असून त्यापैकी २ लाख ३१ हजार म्हणजे ९० टक्के शेतकरी अल्प भूधारक असल्याचे शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून पुढे आले आहे. त्यातही १ हेक्टरपेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५० हजार आहे. प्रमुख धान उत्पादक असलेल्या या जिल्ह्यात अत्यल्प भूधारकांची संख्याही अधिक आहे. यातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने लाभ देण्यास भंडारा जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. महसूल वसुली, निवडणूक कामे असतानाही प्रशासन शेतकऱ्यांसाठी याद्या तयार करीत आहेत. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे केली जात असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे वळते होतील.-विजय भाकरे, जिल्हा नोडल अधिकारी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना.