शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

तुमसरमध्ये ३२ गावांसाठी केवळ ६५ पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:34 IST

जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ ६५ पोलिसांवर आली आहे. पोलिसांची ३० पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. मात्र संवेदनशील शहरात पोलिसांच्या नियुक्तीबाबत गृहविभाग दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे कार्यरत पोलिसांवर कामांचा ताण वाढत आहे.

ठळक मुद्दे३० पदे रिक्त : संवेदनशील शहराकडे गृह विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ ६५ पोलिसांवर आली आहे. पोलिसांची ३० पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. मात्र संवेदनशील शहरात पोलिसांच्या नियुक्तीबाबत गृहविभाग दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे कार्यरत पोलिसांवर कामांचा ताण वाढत आहे.तुमसर शहराचा क्राईम रेट वाढत आहे. तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह ३२ गावे येतात. येथे पोलिसांची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३० पदे गत तीन वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे येथील कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. ६५ पोलिसांवर जबाबदारी असली तरी खऱ्या अर्थाने त्यापेक्षाही कमी कर्मचारी ठाण्यात कार्यरत असतात. कारण दररोज साप्ताहिक सुटीवर आठ ते दहा पोलीस असतात. बंदोबस्ताकरिता चार, हरविले तपासणीसाठी दोन, गार्ड म्हणून तीन, चार वाहतूक पोलीस नियुक्त आहेत. प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात १२ ते १३ कर्मचारी कर्तव्य बजावतात. देव्हाडी येथील पोलीस चौकीत तीन ते चार कर्मचारी आहेत. परंतु सध्या ते क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे सायंकाळी चौकी कुलूपबंद असते.याशिवाय दैनंदिन कार्यरत, न्यायालय, वायरलेस, आॅनलाईन डायरी, भंडारा न्यायालयात नियुक्ती आदींमुळे पोलिसांच्या मुख्य कामावर दुर्लक्ष होत आहे. बीट वाटून दिले असले तरी पोलिसांच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी ठाण्याचे लेखापरिक्षण होते. त्यावेळी जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतात. त्यांचा अहवाल शासनाकडे पाठविला जातो. परंतु त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही.जिल्हा स्तरावर पोलीस दक्षता समिती आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या व निराकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहिती देते. परंतु येथील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जात नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.पोलिसांवर कामांचा ताण वाढता कामा नये. कारण त्यांना २४ तास कर्तव्य बजवावे लागते. शासनाने तात्काळ रिक्त पदे भरण्याची गरज आहे. संवेदनशील तुमसर शहर व ३२ गावांकडे शासनाने लक्ष द्यावे.-डॉ.पंकज कारेमोरे, युवक काँग्रेस, तुमसर.