शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरमध्ये ३२ गावांसाठी केवळ ६५ पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:34 IST

जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ ६५ पोलिसांवर आली आहे. पोलिसांची ३० पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. मात्र संवेदनशील शहरात पोलिसांच्या नियुक्तीबाबत गृहविभाग दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे कार्यरत पोलिसांवर कामांचा ताण वाढत आहे.

ठळक मुद्दे३० पदे रिक्त : संवेदनशील शहराकडे गृह विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ ६५ पोलिसांवर आली आहे. पोलिसांची ३० पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. मात्र संवेदनशील शहरात पोलिसांच्या नियुक्तीबाबत गृहविभाग दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे कार्यरत पोलिसांवर कामांचा ताण वाढत आहे.तुमसर शहराचा क्राईम रेट वाढत आहे. तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह ३२ गावे येतात. येथे पोलिसांची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३० पदे गत तीन वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे येथील कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. ६५ पोलिसांवर जबाबदारी असली तरी खऱ्या अर्थाने त्यापेक्षाही कमी कर्मचारी ठाण्यात कार्यरत असतात. कारण दररोज साप्ताहिक सुटीवर आठ ते दहा पोलीस असतात. बंदोबस्ताकरिता चार, हरविले तपासणीसाठी दोन, गार्ड म्हणून तीन, चार वाहतूक पोलीस नियुक्त आहेत. प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात १२ ते १३ कर्मचारी कर्तव्य बजावतात. देव्हाडी येथील पोलीस चौकीत तीन ते चार कर्मचारी आहेत. परंतु सध्या ते क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे सायंकाळी चौकी कुलूपबंद असते.याशिवाय दैनंदिन कार्यरत, न्यायालय, वायरलेस, आॅनलाईन डायरी, भंडारा न्यायालयात नियुक्ती आदींमुळे पोलिसांच्या मुख्य कामावर दुर्लक्ष होत आहे. बीट वाटून दिले असले तरी पोलिसांच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी ठाण्याचे लेखापरिक्षण होते. त्यावेळी जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतात. त्यांचा अहवाल शासनाकडे पाठविला जातो. परंतु त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही.जिल्हा स्तरावर पोलीस दक्षता समिती आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या व निराकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहिती देते. परंतु येथील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जात नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.पोलिसांवर कामांचा ताण वाढता कामा नये. कारण त्यांना २४ तास कर्तव्य बजवावे लागते. शासनाने तात्काळ रिक्त पदे भरण्याची गरज आहे. संवेदनशील तुमसर शहर व ३२ गावांकडे शासनाने लक्ष द्यावे.-डॉ.पंकज कारेमोरे, युवक काँग्रेस, तुमसर.