शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे

By admin | Updated: June 24, 2015 01:03 IST

निराधार, निराश्रित वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा, असे म्हटले जाते. वृद्धत्व आल्यावर मुलं आपले कर्तव्य विसरतात.

अनुदानापासून वंचित : मिटेवानी येथील वृद्धाश्रमाला लागली अखेरची घरघरविलास बन्सोड उसर्रानिराधार, निराश्रित वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा, असे म्हटले जाते. वृद्धत्व आल्यावर मुलं आपले कर्तव्य विसरतात. पण अशा वृद्धांसाठी शासनाने वृद्धाश्रम स्थापित केले. परंतु अनुदानाअभावी वृद्धाश्रमाला अखेरची घरघर लागली असून त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे.तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथे असेच एक वृद्धाश्रम आहे जो अखेरची घटका मोजत आहे. वृद्धाप्रमाणे सदर वृद्धाश्रमही अनुदान नसल्यामुळे वृद्धाश्रम बंद होणार काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. सन २००२ पासून मिटेवानी येथे दि सेल्फस्टंड रिव्होलुशन सोशल एज्युकेशन (फ्रन्ट) सोसायटी द्वारा संचालित लिलादेवी मातोश्री निराश्रीत वृद्धाश्रम सुरू आहे. सदर वृद्धाश्रम शासनमान्यता सुद्धा आहे. सन १९९१ च्या युती सरकारने मातोश्री वृद्धश्रम योजनानुसार अशा निराश्रीत वृद्धांसाठी मिटेवानी येथील वृद्धाश्रम सुरू करण्यात आले.सदर वृद्धाश्रमात सुरूवातीला ५० च्या वर वृद्ध होते. पण कालांतराने ही संख्या कमी-कमी होत गेली. सध्या लिलादेवी मातोश्री निराश्रीत वृद्धाश्रमात १५ वृद्ध आश्रयास आहे. यात पुरूषांची संख्या सात तर महिलांची संख्या आठ आहे.शासनाकडून अद्यापही अनुदान न मिळाल्याने स्वखर्चाने संचालक मंडळ सदर वृद्धाश्रम चालवित आहे. या सर्वाचे खर्च भागविताना त्यांची दमछाक होते. शिवाय सदर वृद्धाश्रमात कर्मचारी सुद्धा मोफत काम करत आहेत. यात अधीक्षक, स्वयंपाकी, चपराशी, सहा वॉर्ड बाय असा येथील कर्मचाऱ्यांचा ताफा आहेत. आपल्याला शासनाकडून जरी वेतन मिळत नसले तरीही समाजभावनेतून आपण हे काम करीत असल्याचे मत सदर कर्मचारी विश्वासाने सांगतात. सध्या हे वृद्धाश्रम किरायाच्या घरात आहे. त्यांची स्वत:च्या मालकीची जागा नाही. एवढे असूनही सदर वृद्धाश्रमातील वृद्ध मात्र घरच्यांची चिंता न करता आनंदाने राहतात. शासनाकडून समाजकल्याण विभागाचे अनेक मोठे अधिकारी वृद्धाश्रमाला भेट देवून गेलेत पण अद्यापही अनुदान मिळाले नाही. शासन अनेक कल्याणकारी योजना अमलात आणते पण अशा निराश्रीत वृद्धावर शासन केव्हा मेहरबान होणार हे सांगणे कठीण आहे.