शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या घरी अजूनही आली नाही ‘उज्ज्वला’

By admin | Updated: June 19, 2017 00:29 IST

गरीब परिवारातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली.

सरपणाची तयारी : जीव टांगणीला, आरोग्याला धोका राजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : गरीब परिवारातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली. तथापी, अनेक गरीब महिलांच्या घरी उज्वला पोहचलीच नाही. आजही गरीब महिला परंपरागत चूलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. ग्रामीण भागात उर्जेची सर्वात मोठी गरज स्वयंपाकासाठी लागते. यातील जास्त भाग जळण व लाकुडफाटा पुरविला जातो. पुर्वापार चालत असलेल्या चूलीमध्ये ही लाकडे जाळण म्हणून वापरतात. अशा चूलीची अन्न शिजविण्याची क्षमता अधिकच कमी म्हणजे सुमारे १० टक्के एवढीच असते. त्यामुळे जळण मोठ्या प्रमाणावर लागते. ते मिळविण्यासाठी स्त्रियांना व मुलांना वणवण करावी लागते. शिवाय चुलीच्या वापराने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. तो धूर स्वयंपाक घरात कोंडत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यास धोकादायक असतो. गरीब महिलांचे सशक्तीकरण सोबतच आरोग्याची सुरक्षा व्हावी या प्रमुख हेतुने केंद्र सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ग्रामीण भागातील अनेक गरीब महिलांच्या घरी गेलीच नाही हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. मोहाडी तालुक्यात ९,९७९ हजार गरीब रेषेखालील शिधापत्रिका आहेत. त्यापैकी केवळ २२९९ गरीब महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले. गॅस कनेक्शन देण्याची टक्केवारी २३.०३ एवढी आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्र महिलांना गॅस एजन्सी वितरण केंद्रात जावून आॅनलाईन आवेदन पत्र भरावे लागते. बीपीएल प्रमाणपत्रासह दहा प्रकारचे दस्ताऐवज सादर करावे लागते. गरीब महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिल्या जातो. पण, शेगडी व इतर साहित्यासाठी दोन हजाररुपयापर्यंत रुपये खर्च करावे लागतात. एकदा की कनेक्शन मिळाला तर त्यानंतर मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे भरावे लागतात. वरकरणी उज्वला योजना मोफत वाटत असली तरी तिच्यावर गरीबांना रुपये खर्च करावेच लागतात. गॅस कनेक्शन शिवाय इतर साहित्य घेण्यासाठी महिलांना लोन घेण्याची सुविधा आहे. पण, ही लोन प्रक्रिया त्रासदायक असल्याची माहिती आहे. मोहाडी तालुक्याची स्थिती बघितली तर दत्तप्रभू गॅस एजन्सी जांबला ९१० कनेक्शन जोडली गेली आहेत. निशा गॅस एजन्सी वरठी ३५९ व डोहळे गॅस एजन्सी करडी यांना१०३० कनेक्शन उज्वलाची जोडली गेली आहेत. तालुक्यात ७७ टक्के महिलांच्या घरी उज्वला न जाण्याला प्रशासन जबाबदार आहे. खेड्यात अजूनही गरीबांना उज्वला विषयी निटपणे माहिती नाही. खऱ्या गरीबांच्या घरी उज्वला जाण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला नाही. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली पाहिजेत. काही गॅस एजन्सी ठराविक रुपये घेत नसल्याची ओरड आहे. गॅस कनेक्शन देण्यात समानता नसल्याचे बोलले जाते. अनेक गरीब महिलांनी गॅस कनेक्शनसाठी अर्ज करुनही लाभ मिळाला नाही. याला काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जाते. गॅस कनेक्शन मोफत देणारी सरकार कितीही गवगवा करीत असली तरी गॅस कनेक्शन घेतेवेळी महिलांना काही रुपये मोजावे लागतात ही वास्तविकता आहे. त्यापुढे तर गॅस सिलेंडर घेण्यासाठी पैसा दयावाच लागतो. पावसाळ्यात सरपणासाठी परिसरातील शिवारात जावे लागते. सकाळी निघून लाकूड फाटे जमा करुन डोक्यावर आणणाऱ्या गरीब महिला आहेत. या महिलांना सरपणासाठी रानात बाहेर जावे लागते. त्यामुळे हिंस्र पशूचा मोठा धोका असतो. तसेच विकृत मनोवृत्ती असलेल्या मानवाची भिती कायम असते. ग्रामीण भागात जागरुकतेची कमतरता आहे. उज्वला विषयी परिपूर्ण माहिती नाही. लाभार्थी महिलांना लाभ माहिती देण्यासाठी मेळावे घेतले जातील. - सुर्यकांत पाटील, तहसिलदार मोहाडी उज्वला गॅस कनेक्शनसंबंधी काम प्रगतीवर आहे. दरमहिन्याला केरोसीनचा होणारा साठा कमी होत आहे. स्थानिक जनप्रतिनिधींनी गरीब महिलांना लाभ मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा. - धनंजय देशमुख, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा