शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

त्यांच्या घरी अजूनही आली नाही ‘उज्ज्वला’

By admin | Updated: June 19, 2017 00:29 IST

गरीब परिवारातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली.

सरपणाची तयारी : जीव टांगणीला, आरोग्याला धोका राजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : गरीब परिवारातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली. तथापी, अनेक गरीब महिलांच्या घरी उज्वला पोहचलीच नाही. आजही गरीब महिला परंपरागत चूलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. ग्रामीण भागात उर्जेची सर्वात मोठी गरज स्वयंपाकासाठी लागते. यातील जास्त भाग जळण व लाकुडफाटा पुरविला जातो. पुर्वापार चालत असलेल्या चूलीमध्ये ही लाकडे जाळण म्हणून वापरतात. अशा चूलीची अन्न शिजविण्याची क्षमता अधिकच कमी म्हणजे सुमारे १० टक्के एवढीच असते. त्यामुळे जळण मोठ्या प्रमाणावर लागते. ते मिळविण्यासाठी स्त्रियांना व मुलांना वणवण करावी लागते. शिवाय चुलीच्या वापराने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. तो धूर स्वयंपाक घरात कोंडत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यास धोकादायक असतो. गरीब महिलांचे सशक्तीकरण सोबतच आरोग्याची सुरक्षा व्हावी या प्रमुख हेतुने केंद्र सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ग्रामीण भागातील अनेक गरीब महिलांच्या घरी गेलीच नाही हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. मोहाडी तालुक्यात ९,९७९ हजार गरीब रेषेखालील शिधापत्रिका आहेत. त्यापैकी केवळ २२९९ गरीब महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले. गॅस कनेक्शन देण्याची टक्केवारी २३.०३ एवढी आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्र महिलांना गॅस एजन्सी वितरण केंद्रात जावून आॅनलाईन आवेदन पत्र भरावे लागते. बीपीएल प्रमाणपत्रासह दहा प्रकारचे दस्ताऐवज सादर करावे लागते. गरीब महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिल्या जातो. पण, शेगडी व इतर साहित्यासाठी दोन हजाररुपयापर्यंत रुपये खर्च करावे लागतात. एकदा की कनेक्शन मिळाला तर त्यानंतर मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे भरावे लागतात. वरकरणी उज्वला योजना मोफत वाटत असली तरी तिच्यावर गरीबांना रुपये खर्च करावेच लागतात. गॅस कनेक्शन शिवाय इतर साहित्य घेण्यासाठी महिलांना लोन घेण्याची सुविधा आहे. पण, ही लोन प्रक्रिया त्रासदायक असल्याची माहिती आहे. मोहाडी तालुक्याची स्थिती बघितली तर दत्तप्रभू गॅस एजन्सी जांबला ९१० कनेक्शन जोडली गेली आहेत. निशा गॅस एजन्सी वरठी ३५९ व डोहळे गॅस एजन्सी करडी यांना१०३० कनेक्शन उज्वलाची जोडली गेली आहेत. तालुक्यात ७७ टक्के महिलांच्या घरी उज्वला न जाण्याला प्रशासन जबाबदार आहे. खेड्यात अजूनही गरीबांना उज्वला विषयी निटपणे माहिती नाही. खऱ्या गरीबांच्या घरी उज्वला जाण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला नाही. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली पाहिजेत. काही गॅस एजन्सी ठराविक रुपये घेत नसल्याची ओरड आहे. गॅस कनेक्शन देण्यात समानता नसल्याचे बोलले जाते. अनेक गरीब महिलांनी गॅस कनेक्शनसाठी अर्ज करुनही लाभ मिळाला नाही. याला काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जाते. गॅस कनेक्शन मोफत देणारी सरकार कितीही गवगवा करीत असली तरी गॅस कनेक्शन घेतेवेळी महिलांना काही रुपये मोजावे लागतात ही वास्तविकता आहे. त्यापुढे तर गॅस सिलेंडर घेण्यासाठी पैसा दयावाच लागतो. पावसाळ्यात सरपणासाठी परिसरातील शिवारात जावे लागते. सकाळी निघून लाकूड फाटे जमा करुन डोक्यावर आणणाऱ्या गरीब महिला आहेत. या महिलांना सरपणासाठी रानात बाहेर जावे लागते. त्यामुळे हिंस्र पशूचा मोठा धोका असतो. तसेच विकृत मनोवृत्ती असलेल्या मानवाची भिती कायम असते. ग्रामीण भागात जागरुकतेची कमतरता आहे. उज्वला विषयी परिपूर्ण माहिती नाही. लाभार्थी महिलांना लाभ माहिती देण्यासाठी मेळावे घेतले जातील. - सुर्यकांत पाटील, तहसिलदार मोहाडी उज्वला गॅस कनेक्शनसंबंधी काम प्रगतीवर आहे. दरमहिन्याला केरोसीनचा होणारा साठा कमी होत आहे. स्थानिक जनप्रतिनिधींनी गरीब महिलांना लाभ मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा. - धनंजय देशमुख, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा