शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

त्यांच्या घरी अजूनही आली नाही ‘उज्ज्वला’

By admin | Updated: June 19, 2017 00:29 IST

गरीब परिवारातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली.

सरपणाची तयारी : जीव टांगणीला, आरोग्याला धोका राजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : गरीब परिवारातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली. तथापी, अनेक गरीब महिलांच्या घरी उज्वला पोहचलीच नाही. आजही गरीब महिला परंपरागत चूलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. ग्रामीण भागात उर्जेची सर्वात मोठी गरज स्वयंपाकासाठी लागते. यातील जास्त भाग जळण व लाकुडफाटा पुरविला जातो. पुर्वापार चालत असलेल्या चूलीमध्ये ही लाकडे जाळण म्हणून वापरतात. अशा चूलीची अन्न शिजविण्याची क्षमता अधिकच कमी म्हणजे सुमारे १० टक्के एवढीच असते. त्यामुळे जळण मोठ्या प्रमाणावर लागते. ते मिळविण्यासाठी स्त्रियांना व मुलांना वणवण करावी लागते. शिवाय चुलीच्या वापराने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. तो धूर स्वयंपाक घरात कोंडत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यास धोकादायक असतो. गरीब महिलांचे सशक्तीकरण सोबतच आरोग्याची सुरक्षा व्हावी या प्रमुख हेतुने केंद्र सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ग्रामीण भागातील अनेक गरीब महिलांच्या घरी गेलीच नाही हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. मोहाडी तालुक्यात ९,९७९ हजार गरीब रेषेखालील शिधापत्रिका आहेत. त्यापैकी केवळ २२९९ गरीब महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले. गॅस कनेक्शन देण्याची टक्केवारी २३.०३ एवढी आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्र महिलांना गॅस एजन्सी वितरण केंद्रात जावून आॅनलाईन आवेदन पत्र भरावे लागते. बीपीएल प्रमाणपत्रासह दहा प्रकारचे दस्ताऐवज सादर करावे लागते. गरीब महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिल्या जातो. पण, शेगडी व इतर साहित्यासाठी दोन हजाररुपयापर्यंत रुपये खर्च करावे लागतात. एकदा की कनेक्शन मिळाला तर त्यानंतर मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे भरावे लागतात. वरकरणी उज्वला योजना मोफत वाटत असली तरी तिच्यावर गरीबांना रुपये खर्च करावेच लागतात. गॅस कनेक्शन शिवाय इतर साहित्य घेण्यासाठी महिलांना लोन घेण्याची सुविधा आहे. पण, ही लोन प्रक्रिया त्रासदायक असल्याची माहिती आहे. मोहाडी तालुक्याची स्थिती बघितली तर दत्तप्रभू गॅस एजन्सी जांबला ९१० कनेक्शन जोडली गेली आहेत. निशा गॅस एजन्सी वरठी ३५९ व डोहळे गॅस एजन्सी करडी यांना१०३० कनेक्शन उज्वलाची जोडली गेली आहेत. तालुक्यात ७७ टक्के महिलांच्या घरी उज्वला न जाण्याला प्रशासन जबाबदार आहे. खेड्यात अजूनही गरीबांना उज्वला विषयी निटपणे माहिती नाही. खऱ्या गरीबांच्या घरी उज्वला जाण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला नाही. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली पाहिजेत. काही गॅस एजन्सी ठराविक रुपये घेत नसल्याची ओरड आहे. गॅस कनेक्शन देण्यात समानता नसल्याचे बोलले जाते. अनेक गरीब महिलांनी गॅस कनेक्शनसाठी अर्ज करुनही लाभ मिळाला नाही. याला काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जाते. गॅस कनेक्शन मोफत देणारी सरकार कितीही गवगवा करीत असली तरी गॅस कनेक्शन घेतेवेळी महिलांना काही रुपये मोजावे लागतात ही वास्तविकता आहे. त्यापुढे तर गॅस सिलेंडर घेण्यासाठी पैसा दयावाच लागतो. पावसाळ्यात सरपणासाठी परिसरातील शिवारात जावे लागते. सकाळी निघून लाकूड फाटे जमा करुन डोक्यावर आणणाऱ्या गरीब महिला आहेत. या महिलांना सरपणासाठी रानात बाहेर जावे लागते. त्यामुळे हिंस्र पशूचा मोठा धोका असतो. तसेच विकृत मनोवृत्ती असलेल्या मानवाची भिती कायम असते. ग्रामीण भागात जागरुकतेची कमतरता आहे. उज्वला विषयी परिपूर्ण माहिती नाही. लाभार्थी महिलांना लाभ माहिती देण्यासाठी मेळावे घेतले जातील. - सुर्यकांत पाटील, तहसिलदार मोहाडी उज्वला गॅस कनेक्शनसंबंधी काम प्रगतीवर आहे. दरमहिन्याला केरोसीनचा होणारा साठा कमी होत आहे. स्थानिक जनप्रतिनिधींनी गरीब महिलांना लाभ मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा. - धनंजय देशमुख, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा