शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा शॉक; महिन्याच्या वीजबिलात किमान 65 रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

गत महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका भंडारा शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या ग्राहकांना महावितरणने चांगलाच शाॅक दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, महावितरणने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. नुकतेच वीज दरवाढीचे आदेश काढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महावितरणने दोन महिन्यांपूर्वी ग्राहकांना सुरक्षा ठेव रकमेच्या नावाखाली वाढीव वीजबिले आकारल्यानंतर, आता पुन्हा वीजनिर्मितीसाठी कोळसा व इंधनाचे दर वाढल्याचे कारण देत, इंधन समायोजन आकारामध्ये वाढ केली आहे. गत महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका भंडारा शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या ग्राहकांना महावितरणने चांगलाच शाॅक दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, महावितरणने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. नुकतेच वीज दरवाढीचे आदेश काढले आहेत. मात्र, याबाबत अद्याप महावितरणच्या परिमंडळ स्तरावर कुठलेही आदेश प्राप्त झाले नाही.

१००युनिट पर्यंत सर्वाधिक ग्राहकांचा वापरजिल्ह्यात बहुतांश ग्राहकांचा १०० युनिटपर्यंत विजेचा वापर आहे. त्यांना ६५ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसणार आहे. तर ५०१ पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे.

भारनियमनाने परेशानसध्या कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. शहरी भागात भारनियमन नसले, तरी ग्रामीण भागात मात्र भारनियमन सुरु आहे.

२.७१ लाख घरगुती वीजग्राहकभंडारा जिल्ह्यात दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहक आहेत. महावितरणने दरवाढ केल्याने याचा फटका या ग्राहकांना बसणार आहे. कृषी ग्राहकांनाही मोठा फटका बसणार आहे.

पाच महिन्यांसाठी दरवाढ वीजनिर्मितीसाठी कोळसा व इंधनाचे दर वाढल्याचे कारण देत, इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका घरगुती ग्राहकांना बसणार आहे.

इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करून लागू केलेली वीज दरवाढ म्हणजे ग्राहकांची लूट आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जीवनावश्यक वस्तूही महागल्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यात पुन्हा महावितरणने दरवाढीचा शाॅक दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहे.- महेश रणदिवे, ग्राहक.

 

टॅग्स :electricityवीज