शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

खांब तलाव मार्ग झाला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 23:21 IST

भंडारा ते रामटेक राष्ट्रीय महामार्ग घाेषित झाल्यानंतर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. जिल्हा परिषद चाैक ते बीएसएनएल कार्यालय आणि रेल्वे क्राॅसिंग ते खात राेड अशा रस्ता तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र, शीतलामाता मंदिर परिसरात खांबतलाव चाैकात या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर माेठमाेठाले खड्डे पडले आहेत. जीवघेण्या खड्ड्यातून खात राेड आणि वरठी राेडकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करावा लागताे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या भंडारा-रामटेक महामार्गाचे खांबतलाव चाैकात काम तीन वर्षांपासून ठप्प आहे. अत्यंत वर्दळीच्या या चाैकात माेठमाेठाले खड्डे पडले असून दरराेज लहान माेठे अपघात हाेत आहेत. सहा महिन्यांत चाैघांचा या खड्ड्यांनी बळी घेतला. जणू खांबतलाव चाैक वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे.भंडारा ते रामटेक राष्ट्रीय महामार्ग घाेषित झाल्यानंतर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. जिल्हा परिषद चाैक ते बीएसएनएल कार्यालय आणि रेल्वे क्राॅसिंग ते खात राेड अशा रस्ता तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र, शीतलामाता मंदिर परिसरात खांबतलाव चाैकात या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर माेठमाेठाले खड्डे पडले आहेत. जीवघेण्या खड्ड्यातून खात राेड आणि वरठी राेडकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करावा लागताे. विशेष म्हणजे तुमसरकडे जाणारी संपूर्ण अवजड वाहतूक याच चाैकातून जाते. त्याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची माेठी काेंडी हाेते. खड्यांमुळे अपघात हाेत आहेत. गत सहा महिन्यांत येथे अनेक अपघात झाले आहेत. चाैघांचा बळी गेला आहे.नागरिक व सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला की राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करतात. मात्र, काही दिवसांतच पुन्हा रस्त्यावर खड्डे कायम दिसतात. आता पुन्हा या खड्ड्यांमुळे शहरातील वातावरण तापत असून विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्षभंडारा शहरातील खांब तलाव चाैकातून जिल्ह्यातील बहुतांश लाेकप्रतिनिधींच्या घराकडे जाणारे रस्ते आहेत. खासदार, आमदार, माजी आमदार यासह विविध पक्षांचे पदाधिकारी याच परिसरात राहतात. तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची घरेही आहेत. दिवसातून किमान एकदा ही मंडळी या रस्त्यावरून जातात. मात्र रस्त्याकडे त्यांचे दुर्लक्ष हाेत आहे.

शिवसेनेचा आठ दिवसांचा अल्टीमेटम- तीन वर्षांपासून रखडलेल्या खांब तलावातील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. गुरुवारी शिवसेना शहरप्रमुख मनाेज साकुरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे शहर संघटक नितीन धकाते, युवा सेना संघटक मुकेश थाेटे, टिंकू खान, कृष्णा ठवकर, प्रकाश देशकर यांनी हा अल्टीमेटम दिला आहे.

 जय जवान संघटनेचे बेमुदत धरणे- तीन वर्षांपासून अपूर्ण असलेल्या खांबतलाव चाैकातील रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी जय जवान, जय किसान संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून खांबतलाव चाैकातच धरणे आंदाेलन सुरू केले आहे. यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. या रस्त्याचे बांधकाम तत्काळ पूर्ण झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदाेलन करण्याचा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन घनमारे यांनी दिला. शुक्रवारी धरणे आंदाेलनात संजय मते, अरुण भेदे, बाबा पाटेकर, राजकपूर राऊत, सचिन बागडे, सुहास बागडे, सुहास गजभिये, जगदिश कडव, पराग खाेब्रागडे, सुगद शेंडे, निश्चल येनाेरकर, भारती निमजे, नंदकिशाेर नागाेसे, कमलेश बाहे, पायल सतदेवे, लक्ष्मण वानखेडे, मनिष साेनकुसरे, राकेश आगरे, पवन भेले, कमलेश मेंढे, प्रशांत सराेजकर, बबन बुध्दे, सचिन हुमणे, लक्ष्मण कनाेजीया, किशाेर पंचभाई यांच्यासह अनेकजण सहभागी झाले हाेते.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक