शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

खांब तलाव मार्ग झाला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 23:21 IST

भंडारा ते रामटेक राष्ट्रीय महामार्ग घाेषित झाल्यानंतर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. जिल्हा परिषद चाैक ते बीएसएनएल कार्यालय आणि रेल्वे क्राॅसिंग ते खात राेड अशा रस्ता तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र, शीतलामाता मंदिर परिसरात खांबतलाव चाैकात या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर माेठमाेठाले खड्डे पडले आहेत. जीवघेण्या खड्ड्यातून खात राेड आणि वरठी राेडकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करावा लागताे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या भंडारा-रामटेक महामार्गाचे खांबतलाव चाैकात काम तीन वर्षांपासून ठप्प आहे. अत्यंत वर्दळीच्या या चाैकात माेठमाेठाले खड्डे पडले असून दरराेज लहान माेठे अपघात हाेत आहेत. सहा महिन्यांत चाैघांचा या खड्ड्यांनी बळी घेतला. जणू खांबतलाव चाैक वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे.भंडारा ते रामटेक राष्ट्रीय महामार्ग घाेषित झाल्यानंतर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. जिल्हा परिषद चाैक ते बीएसएनएल कार्यालय आणि रेल्वे क्राॅसिंग ते खात राेड अशा रस्ता तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र, शीतलामाता मंदिर परिसरात खांबतलाव चाैकात या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर माेठमाेठाले खड्डे पडले आहेत. जीवघेण्या खड्ड्यातून खात राेड आणि वरठी राेडकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करावा लागताे. विशेष म्हणजे तुमसरकडे जाणारी संपूर्ण अवजड वाहतूक याच चाैकातून जाते. त्याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची माेठी काेंडी हाेते. खड्यांमुळे अपघात हाेत आहेत. गत सहा महिन्यांत येथे अनेक अपघात झाले आहेत. चाैघांचा बळी गेला आहे.नागरिक व सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला की राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करतात. मात्र, काही दिवसांतच पुन्हा रस्त्यावर खड्डे कायम दिसतात. आता पुन्हा या खड्ड्यांमुळे शहरातील वातावरण तापत असून विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्षभंडारा शहरातील खांब तलाव चाैकातून जिल्ह्यातील बहुतांश लाेकप्रतिनिधींच्या घराकडे जाणारे रस्ते आहेत. खासदार, आमदार, माजी आमदार यासह विविध पक्षांचे पदाधिकारी याच परिसरात राहतात. तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची घरेही आहेत. दिवसातून किमान एकदा ही मंडळी या रस्त्यावरून जातात. मात्र रस्त्याकडे त्यांचे दुर्लक्ष हाेत आहे.

शिवसेनेचा आठ दिवसांचा अल्टीमेटम- तीन वर्षांपासून रखडलेल्या खांब तलावातील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. गुरुवारी शिवसेना शहरप्रमुख मनाेज साकुरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे शहर संघटक नितीन धकाते, युवा सेना संघटक मुकेश थाेटे, टिंकू खान, कृष्णा ठवकर, प्रकाश देशकर यांनी हा अल्टीमेटम दिला आहे.

 जय जवान संघटनेचे बेमुदत धरणे- तीन वर्षांपासून अपूर्ण असलेल्या खांबतलाव चाैकातील रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी जय जवान, जय किसान संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून खांबतलाव चाैकातच धरणे आंदाेलन सुरू केले आहे. यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. या रस्त्याचे बांधकाम तत्काळ पूर्ण झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदाेलन करण्याचा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन घनमारे यांनी दिला. शुक्रवारी धरणे आंदाेलनात संजय मते, अरुण भेदे, बाबा पाटेकर, राजकपूर राऊत, सचिन बागडे, सुहास बागडे, सुहास गजभिये, जगदिश कडव, पराग खाेब्रागडे, सुगद शेंडे, निश्चल येनाेरकर, भारती निमजे, नंदकिशाेर नागाेसे, कमलेश बाहे, पायल सतदेवे, लक्ष्मण वानखेडे, मनिष साेनकुसरे, राकेश आगरे, पवन भेले, कमलेश मेंढे, प्रशांत सराेजकर, बबन बुध्दे, सचिन हुमणे, लक्ष्मण कनाेजीया, किशाेर पंचभाई यांच्यासह अनेकजण सहभागी झाले हाेते.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक