शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

ठाणा नळयोजना निकामी

By admin | Updated: February 27, 2016 01:04 IST

बोरगाव नदीवर बांधण्यात आलेल्या खराडी व राजेदहेगाव शेतशिवारात कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय होत आहे.

लोखंडी पाट्या चोरीला, बंधारे निरुपयोगीजवाहरनगर / खरबी : बोरगाव नदीवर बांधण्यात आलेल्या खराडी व राजेदहेगाव शेतशिवारात कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय होत आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधारे अखेरच्या घटका मोजत आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पुनरूज्जीवन युतीच्या काळात होईल का, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.जलयुक्त शिवार अभियान ही युती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. परंतु कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने गावापासून वाहणाऱ्या नदीवर बंधाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली होती. आघाडीच्या कार्येकाळात सन १९९२ मध्ये खराडी येथे कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामामुळे बंधारा खालील भागाला पोकळ झाल्यामुळे पाण्याची साठवण बंद झाली व पुर्ण पाणी वाहून जात असते या बंधाऱ्याला १६ दारे असून यांची लोखंडी पाट्या चोरीला गेला आहे. १२ वर्षापुर्वी याच बंधाऱ्याच्या दुरूस्तीवर खर्च करण्यात आला. परंतु पाणी ना अडले ना जमिनीत जिरले. ठाणा पेट्रोलपंप येथे येथून जाणारा जलवाहिनी पाण्याअभावी निष्पळ झाली आहे. राजेदहेगाव व खराडी येथे बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे निकामी पडलेले आहेत. जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून जुन्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किमतीच्या लोखंडी प्लेट व खालील भागाला काँक्रेट अभावी दुरूस्तीची प्रतिक्षा करीत आहे. शेतकऱ्यांचे जीवन मान उंचविण्यासाठी व हरीतक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मोहिम हाती घेवून शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचवण्याची गरज आहे. मात्र नवीन बंधारे बांधण्यासाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास उन्हाळ्यात होणारा पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल व अशावेळी जनावरांना पिण्यासाठी पाणी व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल व पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल. (वार्ताहर)