शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा नळयोजना निकामी

By admin | Updated: February 27, 2016 01:04 IST

बोरगाव नदीवर बांधण्यात आलेल्या खराडी व राजेदहेगाव शेतशिवारात कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय होत आहे.

लोखंडी पाट्या चोरीला, बंधारे निरुपयोगीजवाहरनगर / खरबी : बोरगाव नदीवर बांधण्यात आलेल्या खराडी व राजेदहेगाव शेतशिवारात कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय होत आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधारे अखेरच्या घटका मोजत आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पुनरूज्जीवन युतीच्या काळात होईल का, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.जलयुक्त शिवार अभियान ही युती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. परंतु कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने गावापासून वाहणाऱ्या नदीवर बंधाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली होती. आघाडीच्या कार्येकाळात सन १९९२ मध्ये खराडी येथे कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामामुळे बंधारा खालील भागाला पोकळ झाल्यामुळे पाण्याची साठवण बंद झाली व पुर्ण पाणी वाहून जात असते या बंधाऱ्याला १६ दारे असून यांची लोखंडी पाट्या चोरीला गेला आहे. १२ वर्षापुर्वी याच बंधाऱ्याच्या दुरूस्तीवर खर्च करण्यात आला. परंतु पाणी ना अडले ना जमिनीत जिरले. ठाणा पेट्रोलपंप येथे येथून जाणारा जलवाहिनी पाण्याअभावी निष्पळ झाली आहे. राजेदहेगाव व खराडी येथे बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे निकामी पडलेले आहेत. जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून जुन्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किमतीच्या लोखंडी प्लेट व खालील भागाला काँक्रेट अभावी दुरूस्तीची प्रतिक्षा करीत आहे. शेतकऱ्यांचे जीवन मान उंचविण्यासाठी व हरीतक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मोहिम हाती घेवून शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचवण्याची गरज आहे. मात्र नवीन बंधारे बांधण्यासाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास उन्हाळ्यात होणारा पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल व अशावेळी जनावरांना पिण्यासाठी पाणी व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल व पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल. (वार्ताहर)