शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तंमुसच्या अध्यक्षपदापासून महिला कोसोदूर

By admin | Updated: February 24, 2016 00:39 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर महिलांची वर्णी ग्रामसभेत लावण्यात आली नाही.

ग्रामसभेत निवड नाही : सिहोरा परिसरात पदापासून महिला वंचितचुल्हाड (सिहोरा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर महिलांची वर्णी ग्रामसभेत लावण्यात आली नाही. या सभेत निवड करण्यात येत नसल्याने महिला वंचित आहेत. सिहोरा परिसरातील ४७ गावात एकाही महिलेने अध्यक्ष पद भुषविले नाही असे दिसून येत आहे.राज्यात आघाडी शासनाने गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महिला गांधी तंटामुक्त गाव योजना सुरु केली आहे. दिवंगत आर. आर. पाटील हे ग्राम विकास मंत्री असतांना त्यांनी विकासाची दोरी गावकऱ्यांचे हाती दिली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाने गावात स्वच्छतेची प्रेरणा दिली आहे. गावात आपुलकीची नाते, अखंडता व गावकऱ्यांचा वेळ तथा पैसा वाचविण्यासाठी २००७ वर्षात महात्मा गांधी तंटामुक्त गाव हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. गावातच तंटे निकाली काढण्यात येत असल्याने गावकऱ्यांचे विभक्त संबंध पुन्हा जोडण्याचे कार्य समिती मार्फत केली जात आहे. या समितीची निवड स्वातंत्र दिनी ग्रामसभेत केली जात आहे. विविध स्तरावर कार्य करणारे व्यक्ती, सेवा निवृत्त कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे नागरिक तथा अन्य नागरिकांचा या समितीत समावेश करण्यात येत आहे. महिलांचा समावेश अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे सदस्य, प्रतिष्ठित महिला यांची समितीत निवड करण्यात येत आहे. ग्राम सभेत समितीची निवड करण्यात येत असतांना अध्यक्ष पदावर निवड होण्याचा मान आजवर सिहोरा परिसरात एकाही महिलेला मिळाला नाही. विविध क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. अधिकार व हक्कासाठी महिला भांडताना दिसत आहे. नेतृत्व करण्याची क्षमता महिलामध्ये आहे. शासकिय व निमशासकीय, राजकारण सामाजिक क्षेत्रात महिला अग्रणी भुमिका बजावत आहेत. ७ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये ४ महिला सत्ताधारी झालेल्या आहेत.गावात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी महिला महत्वाची भुमिका बजावत आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला एक संघ निर्माण करीत असतांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर २००७ पासून महिलांची सिहोरा परिसरात निवड करण्यात आली नाही. या पदावर वर्णी लागण्याचा पहीला बहुमान एकाही महिलेला प्राप्त झाला नाही. गावात आता पोलीस पाटील पदाची धुरा महिला सांभाळत आहे. गावच सरपंच पद भुषवून गावात विकासाची लाट या महिला नेतृत्वानी आणली आहे. अन्याय व अत्याचार विरोधात कायद्याचे चौकटीत राहून महिला लढा देत आहे. गावातील उध्वस्त संसार पुर्ववत आणण्यासाठी महिला प्रयत्न करीत आहेत. पंरतु तमुसचे अध्यक्ष पद या महिला पासून कोसो दुर ठेवण्यात आले आहे. या पदावर एकाही महिलेची वर्णी लागली नसल्याने वंचित आहेत. (वार्ताहर)ग्रामसभेत तमुसच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाल्यास महिलांचे मनोबल उंचावेल, पर्यायाने महिलात जागृकता आणता येईल. - प्रेरणा तुरकर, सदस्य जि.प. बपेरा क्षेत्रग्रामसभेला सर्वाधिकार प्राप्त आहेत. या सभेत तंमुसच्या अध्यक्षपदी महिलेची निवड गावकऱ्यांनी करायला पाहिजे.- विमल कानतोडे, सदस्य पं.स. खापा क्षेत्रगाव विकासात महिलांची भुमिका महत्वपूर्ण आहे. यामुळे तमुसचे अध्यक्ष पद सर्व समंतीने महिलांना दिल्यास महिलामध्ये जागृकता आणता येईल.- नेहा पटले, अध्यक्ष महिला मंडळ चुल्हाड