शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिग्गजांची कसोटी पणाला

By admin | Updated: November 15, 2016 00:23 IST

आडनाव साधर्म्य असणारे व्यक्ती शोधणे, त्यांना उमेदवारीसाठी आग्रह धरणे आणि एकाही उमेदवाराने नामांकन परत घेऊ नये,

तिहेरी लढत : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूकभंडारा : आडनाव साधर्म्य असणारे व्यक्ती शोधणे, त्यांना उमेदवारीसाठी आग्रह धरणे आणि एकाही उमेदवाराने नामांकन परत घेऊ नये, अशी व्युहरचना आखण्यापासून शेवटच्या टप्प्यात दुसऱ्या क्रमांकाची मते कशी मिळतील, या दिशेने भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा प्रवास सुरू आहे. अवघ्या चार दिवसानंतर होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप-काँग्रेस हे तिन्ही पक्ष आमनेसामने असून या निवडणुकीतील लढत चुरशीची होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सेकंड चीफ प्रफुल पटेल यांचे विश्वासू विद्यमान आमदार राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरूद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले डॉ.परिणय फुके हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या पाठिंब्यामुळे उमेदवारी दाखल केलेले प्रफुल अग्रवाल हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. हे तिन्ही उमेदवार बलाढ्य असल्यामुळे या निवडणुकीत दिग्गजांची कसोटी पणाला लागणार आहे.सद्यस्थितीत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसचे ३८५ च्या जवळपास मतदार वेगवेगळ्या राज्यात भारतभ्रमणाच्या सफरीचा आनंद घेत आहेत. एका पक्षाचे मतदार राजस्थान, उत्तराखंड राज्यात, दुसऱ्या पक्षाचे मतदार केरळ, कर्नाटक राज्यात तर तिसऱ्या पक्षाचे मतदार पश्चिम बंगाल राज्यात ‘पिकनीक’ मनवत आहेत. हे मतदार ‘पिकनिक’च्या ठिकाणी काढलेले फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे आणि कोणत्या ठिकाणी आहेत, ते जनतेला कळत आहे. भ्रमणध्वनी सुरू असल्यामुळे ते सर्वांच्या संपर्कातही आहेत. असे असले तरी ज्यांच्या पैशाने या मतदारांची ‘शान की सवारी’ सुरू आहे, त्यांच्याशी प्रामाणिक राहून मतदान करतील कां? याबाबत उमेदवारांना साशंकता आहे. अनेक मतदारांनी तिन्ही उमेदवारांकडून आपले खिसे गरम केल्यामुळे आपला कोण? आणि परका कोण? याचा अंदाज बांधणे उमेदवारांसाठी कष्टप्रद ठरत आहे. २००४ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजप उमेदवार रिंगणात असताना राजेंद्र जैन हे अपक्ष निवडून आले होते. २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप अशा थेट लढतीत ते बहुमताने विजयी झाले. आता २०१६ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप-काँग्रेससह पाच अपक्ष असे आठ उमेदवार रिंगणात आहेत. विजयाचे गणित बांधताना आमचाच उमेदवार विजयी होईल, असे त्या-त्या पक्षाचे नेते विश्वासाने सांगत आहेत. मागील १२ वर्षांपासून प्रत्येक मतदाराच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेले राजेंद्र जैन मतदारांना आपलेसे करण्यात मुरब्बी आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांवर निवडणूक होत असली तरी भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या निवडणुकीची सर्व सुत्रे राज्यातील त्या-त्या पक्षाच्या मुख्यालयातून विजयाची व्युहरचना दिग्गजांकडून आखण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गजांची कसोटी पणाला लागलेली असल्यामुळे निकालाअंतीच चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)