शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

निम्न चुलबंद प्रकल्पाची चाचणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:17 IST

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी सोमवारला पंपहाऊस व संबंधित यंत्र सज्ज असल्याची माहिती ...

ठळक मुद्देपाणी तलावात सोडणार : सहा हजार हेक्टर सिंचनाची सुविधा

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी सोमवारला पंपहाऊस व संबंधित यंत्र सज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.साकोली तालुक्यात पारंपारिक शेती व्यवसाय असून बहुतांश लोक भात शेती करतात. तालुका निसर्ग सानिध्यानी नटलेला असून या तालुक्यातून चुलबंद नदीचा प्रवाह आहे. मात्र शेतीला सिंचनाची सोय नव्हती. शेती सिंचनासाठी चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्पाचे १९९५ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. तेव्हापासून कधी राजकीय अडचणी तर कधी निधीची कमतरता अशा एक ना अनेक अडचणीतून हा प्रकल्प रेंंगाळत्ला. शेतकऱ्यांची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढतच गेली. एकेकाळी तर शेतकऱ्यांची निराशाच झाली होती की हा प्रकल्प होणार की नाही. अनेक वर्षे निधीअभावी या प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात होते. नंतर पुन्हा या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आणि आता हा प्रकल्प पूर्ण झाला. आता लवकरच प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पात एकुण सात दरवाजे असून चुलबंद नदीचे पाणी या प्रकल्पात अडविण्यात येणार आहे. तसेच हे अडविलेले पाणी पंपहाऊसच्या सहाय्याने डाव्या व उजव्या कालव्याच्या सहाय्याने तलावात सोडण्यात येणार आहे.तलाव पूर्ण भरणारया प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून तलाव प्रकल्पाच्या पाण्याने पूर्णपणे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे.पिण्यासाठी राखीव राहणार पाणीया प्रकल्पांतर्गत डिसेंबरपर्यंत पाणी तलावात व नंतर येणारे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना दिलासाया प्रकल्पाच्या उभारणीमुळे शेतीला सिंचनाची सोय आहे. त्यामुळे निसर्गावर अवलंबून राहणाऱ्यां शेतकऱ्यांना आता तलावाचे पाणी मिळणार. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.सदर प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पंगृहाऊसचे काम पूर्ण झाले असून या पंपहाऊसची चाचणी पूर्ण झाली आहे. येत्या एक दोन दिवसातच या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून या पाण्याचा शेतीला मोठा फायदा होणार आहे.-अमोल चोपडे, उपविभागीय अभियंता