शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

निम्न चुलबंद प्रकल्पाची चाचणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:17 IST

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी सोमवारला पंपहाऊस व संबंधित यंत्र सज्ज असल्याची माहिती ...

ठळक मुद्देपाणी तलावात सोडणार : सहा हजार हेक्टर सिंचनाची सुविधा

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी सोमवारला पंपहाऊस व संबंधित यंत्र सज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.साकोली तालुक्यात पारंपारिक शेती व्यवसाय असून बहुतांश लोक भात शेती करतात. तालुका निसर्ग सानिध्यानी नटलेला असून या तालुक्यातून चुलबंद नदीचा प्रवाह आहे. मात्र शेतीला सिंचनाची सोय नव्हती. शेती सिंचनासाठी चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्पाचे १९९५ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. तेव्हापासून कधी राजकीय अडचणी तर कधी निधीची कमतरता अशा एक ना अनेक अडचणीतून हा प्रकल्प रेंंगाळत्ला. शेतकऱ्यांची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढतच गेली. एकेकाळी तर शेतकऱ्यांची निराशाच झाली होती की हा प्रकल्प होणार की नाही. अनेक वर्षे निधीअभावी या प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात होते. नंतर पुन्हा या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आणि आता हा प्रकल्प पूर्ण झाला. आता लवकरच प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पात एकुण सात दरवाजे असून चुलबंद नदीचे पाणी या प्रकल्पात अडविण्यात येणार आहे. तसेच हे अडविलेले पाणी पंपहाऊसच्या सहाय्याने डाव्या व उजव्या कालव्याच्या सहाय्याने तलावात सोडण्यात येणार आहे.तलाव पूर्ण भरणारया प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून तलाव प्रकल्पाच्या पाण्याने पूर्णपणे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे.पिण्यासाठी राखीव राहणार पाणीया प्रकल्पांतर्गत डिसेंबरपर्यंत पाणी तलावात व नंतर येणारे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना दिलासाया प्रकल्पाच्या उभारणीमुळे शेतीला सिंचनाची सोय आहे. त्यामुळे निसर्गावर अवलंबून राहणाऱ्यां शेतकऱ्यांना आता तलावाचे पाणी मिळणार. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.सदर प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पंगृहाऊसचे काम पूर्ण झाले असून या पंपहाऊसची चाचणी पूर्ण झाली आहे. येत्या एक दोन दिवसातच या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून या पाण्याचा शेतीला मोठा फायदा होणार आहे.-अमोल चोपडे, उपविभागीय अभियंता