शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

शेतकऱ्यांकडून वांगे दहा रुपये किलो; ग्राहकांच्या पदरात मात्र तीस रुपये दराने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

भंडारा : भरपूर पावसानंतर भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशाच पडते आहे. एकीकडे ...

भंडारा : भरपूर पावसानंतर भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशाच पडते आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कमी दरात भाजीपाला विकावा लागतो तर दुसरीकडे मात्र ग्राहकांना महागाई वाढल्याचे कारणावरून जादा भावाने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे मधले व्यापारीच मोठे होत आहेत. शेतकरी मात्र वर्षानुवर्षांपासून हलाखीचेच जीवन जगत आहे तर दुसरीकडे व्यापारी मात्र अलिशान गाड्यांमधून फिरतात. ही वेळ कशामुळे निर्माण होत आहे. याचे सरकारने विचारमंथन करण्याची गरज आहे. देशी वाणांना अनेक ग्राहक पसंती देत असले तरी याचे उत्पादन फारसे होत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडत नाही. महिलांची देशी वाणांसह सेंद्रीय भाजीपाल्याला मागणी वाढत असल्याचे सेंद्रीय उत्पादक शेतकरी तानाजी गायधने यांनी सांगितले. जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे मात्र, तरीही भाजीबाजारात पालेभाज्यांचे दर वाढलेलेच दिसत आहेत. एकीकडे वाढती महागाई तर दुसरीकडे रोजगाराची संधी कमी होत असल्याने अनेकांना घर चालविताना कसरत करावी लागत आहे. मात्र, कोणताही राजकीय पक्ष यावर लक्ष देत नसल्याने आता सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सरकार एकीकडे आश्वासने देते. मात्र, दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही कमी करणे सरकारला शक्य होईनासे झाले आहे. यामुळे रोजच्या आहारातील पालेभाज्या गरिबांच्या ताटात दिसेनाशा झाल्या आहेत.

बॉक्स

भावात एवढा फरक कसा

जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. मग तरीही भाजीपाला इतका महाग कसा, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहे.

जिल्ह्यात वांगी, कारले, मिरची, भेंडीसारखी भाजीपाल्याची पिके घेतली जातात. मात्र, फळभाज्या आणि पालेभाज्यांसाठी मात्र आजही जिल्ह्याला इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. व्यापारीच दिवसेंदिवस मोठे होत असल्याने प्रशासनाने यावर अंकुश ठेवायला हवा. मात्र, अनेकजणांचे हितसंबंध आडवे येत असल्याने बळिराजा भरडला जात आहे.

त्यामुळे पालेभाज्या खाण्याचे प्रमाणही कमी केले आहे

ग्राहकांना परवडेना...

कोट

आधी दोनशे रुपयांत आठवड्याचा भाजीपाला मी खरेदी करत होते. मात्र, आता भाजीपालाच काय प्रत्येक गोष्टीत महागाई वाढत आहे. भविष्यात गरिबांना आणखी किती महागाईला तोंड द्यावे लागणार आहे, माहिती नाही.

- वंदना वैद्य, गृहिणी

सरकारने वाढत्या महागाईवर अंकुश ठेवायला हवा. भाज्यांचे दर हे वाढलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हाती कमीच दर पडतो आहे. यातून कोण व्यापारीच मोठे होत आहे ना एकवेळ शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर काही वाटत नाही.

अनिता गिर्हेपुंजे,गृहिणी

कोट

सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करायला हव्यात. आम्ही बाजारात भाजीपाला विकतो. तोच भाजीपाला ग्राहकांना तब्बल किलोमागे वीस ते तीस रुपये जादा दराने विक्री होतो. एकीकडे आमचा लागवडीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

शाम आकरे, शेतकरी, चिखली.

कोट

सर्वच खर्च वाढल्याने बळिराजाला शेती करणे कठीण झाले आहे. कोणतेही पीक घेतले तरी दराचा प्रश्न आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार नाही. तोपर्यंत आपण अमेरिका, जपान, इजिप्त देशासारखी प्रगती करू शकणार नाही. सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य दिले पाहिजे.

- चैतराम हिवसे, शेतकरी खराडी.