शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्ह्यात दहा कलमी कार्यक्रमांची होणार अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:05 IST

नी देशासाठी बलिदान दिले त्या शूरविरांना आठवण्याचा आजचा दिवस आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : नगरपरिषदेचे शतकोत्तर रौप्य महोत्सव, हजारो नागरिकांच्या साक्षीने १२१ फूट उंच राष्टÑध्वजाचे ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्या शूरविरांना आठवण्याचा आजचा दिवस आहे. भंडारा जिल्ह्याची जबाबदारी सहपालकमंत्री म्हणून आपल्यावर असून स्वातंत्र्यदिनाच्या साक्षीने नागपूर सारखाच भंडारा जिल्ह्याचा विकास करण्यावर भर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या १० कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करू, असे प्रतिपादन राज्याचे उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.नगरपरिषद भंडाराला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित शतकोत्तर रौप्य महोत्सव व १२१ फूट उंच स्तंभावर ध्वजारोहण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ध्वजारोहण ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.परिणय फुके, चरण वाघमारे, अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., न.प. उपध्यक्ष कवलजितसिंग चढ्ढा, मुख्याधिकारी अनिल अढागळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष मो.तारिक कुरेशी आदी उपस्थित होते.गांधी चौकात आयोजित या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ना.बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत सर्वाधिक लाभ भंडारा जिल्ह्याला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या कृषी विकास दर वाढविण्याला प्राधान्य राहणार आहे. भंडारा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी ११० कोटीची योजना तयार असून एका वर्षात ती कार्यान्वित होईल. शहरातील भूमिगत वीज जोडणीसाठी प्रयत्न केला जाणार असून भूमिगत गटार योजना करण्यावर लवकर निर्णय घेतला जाईल. नगरपरिषदेने १२१ फूट उंचीचा राष्टÑध्वज उभारून देशभक्तीची आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक व्यक्तींनी चांगल्या गुणांचा उपयोग राष्ट्र व महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.नगरपरिषदेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण यावेळी ना.बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची संकल्पना नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी प्रास्ताविकातून सांगितली. संचालन प्रा. आरती देशपांडे, प्रा. स्मिता गालफाडे यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी मानले.यावेळी शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त विविध देशभक्तीपर नृत्याचे कार्यक्रम नगरपरिषदेच्या शाळांनी सादर केले. प्रारंभी शालेय विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांची मने जिंकली. तसेच आकाशात विविध रंगाचे बलून सोडण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास भंडारा जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हा विविधांगी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद उपभोगल्याचा प्रत्येक नागरिकांमध्ये जाणवत होते. नागरिकांच्या भावना आनंदाने व देशभक्तीने ओतप्रोत होऊन प्रज्वलित झाल्याचे दिसत होते.