शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

रेल्वेच्या ओव्हरब्रिज बांधकामाने सांगा, आता जगायचे कसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

अनेक दुकानदारांच्या दोन पिढ्या या रस्त्यावर असलेल्या दुकानांच्या भरवशावर निघाल्या. अचानक अतिक्रमण काढायचे आदेश आल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले आहे. दुकाने बंद झाली तर मुलंबाळ कशी पोसायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करूनच कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : शासकीय यंत्रणा केव्हा कुणाची वाट लावेल याचा नेम नाही. याचा प्रत्यय वरठीवासीयांना आला आहे. रस्त्याच्या कडेला उभे आयुष्य काढणाऱ्यांना एका झटक्यात जागा रिकामी करण्याचे फर्मान आले. जागा रिकामी होईल; पण आता जगायचे कसे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. तूर्तास उपाय सापडत नसल्याने अनेकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असून, त्यांची धडधड वाढली आहे. भंडारा रेल्वे फाटक परिसरात जुना राज्य महामार्ग आहे. गावाच्या बाहेर मुख्य महामार्ग तयार झाल्याने तो रस्ता निरुपयोगी होता. रस्त्यावर वाढलेले रहदारी व ओव्हर ब्रिजचे काम सुरू करायचे असल्याने गावांतर्गत असलेला महामार्ग अचानक प्रकाशझोतात आला. ओव्हर ब्रिज कामानिमित्त महिनाभर बंद राहील. यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक गाववांतर्गत महामार्गावरून वळविण्यात येणार आहे. जवळपास दोन दशकापासून हा रस्ता दुर्लक्षित होता.  यामुळे नागरिकांनी उदरनिर्वाहासाठी दुकाने थाटली. जवळपास २५ ते ३० कुटुंबांचा उदरनिर्वाह या दुकानांवर अवलंबून आहे. अनेक दुकानदारांच्या दोन पिढ्या या रस्त्यावर असलेल्या दुकानांच्या भरवशावर निघाल्या. अचानक अतिक्रमण काढायचे आदेश आल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले आहे. दुकाने बंद झाली तर मुलंबाळ कशी पोसायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करूनच कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी चाचपणीगावातील नागरिकांचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका सरपंच श्वेता येळणे व माजी सरपंच संजय मिरासे यांनी बैठकीत मांडली. दुकानासमोर असलेले टीन शेड काढण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांनी मंजूर केली असून, यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यांची पर्यायी व्यवस्था कुठे करायची, याबाबत चाचपणी सुरू आहे; पण तूर्तास हा प्रश्न सुटण्याची शक्यता नाही.

अनेकांना बसला फटका  - या भागात शुभांगी गणवीर यांचे दुकान आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत त्यांच्या पतीचे निधन झाले. कुटुंबातील कमावता पुरुष गेल्याने त्यांचे सर्व आर्थिक स्रोत बंद झाले. मुले शिकत आहेत. दुकाने पडल्यास उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न आहे.  काही दुकानदार कुटुंबासह त्या भागात राहतात. घरे पडली तर कुटुंबे उघड्यावर येणार असल्याने त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाली आहे.पोलिसांची तत्परता हुकूमशहासारखी - अतिक्रमण काढण्यावरून दुकानदारांत रोष आहे.  मोजणीला आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी अतिक्रमणाबाबत विचारले; पण समाधान न झाल्याने त्यांनी समाधान करण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार करताच पोलिसांचा ताफा काही वेळात दाखल झाला. माहिती घेणे अतिक्रमणधारकांचा अधिकार आहे; पण समाधान न करता जिल्हा प्रशासन दडपशाही करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऐनवेळी आमदार राजू कारेमोरे यांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. एरवी वारंवार फोन करून न पोहोचणारी पोलीस यंत्रणा एका झटक्यात आल्याने इंग्रज राजवटीची आठवण झाली.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणrailwayरेल्वे