शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साहेब सांगा, आता आम्ही पोट भरायचे कसे? भंडारा परिसरातील परिस्थिती विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 13:50 IST

Bhandara News, Rain, Agriculture भंडारा परिसरात मुसळधार पावसामुळे शेतातील उभे पीक मातीमोल झाले आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात पंचनामे करून पीक विमा त्वरित देण्याची मागणी

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने अडयाळ व परिसरातील शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. शेतकरी शेतातील परिस्थिती पाहून आपली आपबिती सांगत आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत अनेक समस्यांना तोंड देता देता नाकी नऊ आले पण आलेल्या अवकाळी पावसामुळे मात्र आता पूर्ण कंबरडे मोडले आहे आता पोट भरायचे कसे नी कर्ज फेडायचे कसे?, असा प्रश्न बळीराजा विचारीत आहे.

अडयाळ व परिसरात पेरणीपासून ते आतापर्यंत शेतकऱ्यांनी अनेक संकटाचा सामना केला. त्यात घडाईपेक्षा मडाई झाली तरी शेतकरी घाबरून गेला नाही, आणि हिम्मत सुध्दा सोडली नाही पण आता परतीच्या मुसळधार पावसामुळे मात्र शेतातील उभे पीक मातीमोल झाले आहे. शेवटी शेतकऱ्यांसमोर निसर्गाच्या प्रकोपासमोर काहीही कुणाचेही चालत नाही. गत आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे अडयाळ व परिसरात ह्यकुठे खुशी तर कुठे गमह्ण पाहायला मिळत आहे. शेतातील धान आलेल्या पावसामुळे व सोसाट्याचा वाऱ्यामुळे धानपीक जमीनदोस्त झाले. यावर उपाय म्हणून बरेच शेतकरी गुरुवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतातील पाणी काढण्यात तर काही ठिकाणी शेतकरी शेतात कापणी केलेले धान्य उचलताना दिसून येत आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र अडयाळ व परिसरात पाहायला मिळते आहे.

खर्च झालेला खर्च तरी आता हातात येण्याची शक्यता कमी आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे खर्च भागवणे म्हणजे आता शेतकऱ्यांना जर दिलासा मिळाला तर ठीक आहे. नाहीं तर मग कर्ज भरायची कशी असा प्रश्न आहे. अडयाळ व परिसरात प्रथमत: अळी ने घात केला नंतर पावसाने. पुन्हा धानावर तुडतुडा, करपा रोगाने शेतकरी चिंताजनक स्थितीत असतानाच आता पुन्हा हा अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी आता मोठ्या चिंताजनक स्थितीत सापडला आहे. यावर आता पुढे अजून काय होईल याची सुद्धा चिंता असल्याने शेतकरी आज निराशेच्या छायेत आहे. यावर आता काय उपाययोजना आखली जाते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी अभय शृंगारपवार, देवेंद्र हजारे, शिवशंकर मुंगाटे, युवराज वासनिक, मधू गभने, देविदास नगरे, प्रकाश मानापुरे, मोहन कावळे, राजेंद्र ब्राह्मणकर, सुरेंद्र आयतूलवार व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.याकडे आता लोकप्रतिनिधीनी सुद्धा तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. वर्तमान परिस्थितीत शेतकरी शेतातील पाणी जमेल तेवढी श्रम घेऊन काढण्यात व्यस्त दिसत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती