शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

साहेब सांगा, आता आम्ही पोट भरायचे कसे? भंडारा परिसरातील परिस्थिती विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 13:50 IST

Bhandara News, Rain, Agriculture भंडारा परिसरात मुसळधार पावसामुळे शेतातील उभे पीक मातीमोल झाले आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात पंचनामे करून पीक विमा त्वरित देण्याची मागणी

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने अडयाळ व परिसरातील शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. शेतकरी शेतातील परिस्थिती पाहून आपली आपबिती सांगत आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत अनेक समस्यांना तोंड देता देता नाकी नऊ आले पण आलेल्या अवकाळी पावसामुळे मात्र आता पूर्ण कंबरडे मोडले आहे आता पोट भरायचे कसे नी कर्ज फेडायचे कसे?, असा प्रश्न बळीराजा विचारीत आहे.

अडयाळ व परिसरात पेरणीपासून ते आतापर्यंत शेतकऱ्यांनी अनेक संकटाचा सामना केला. त्यात घडाईपेक्षा मडाई झाली तरी शेतकरी घाबरून गेला नाही, आणि हिम्मत सुध्दा सोडली नाही पण आता परतीच्या मुसळधार पावसामुळे मात्र शेतातील उभे पीक मातीमोल झाले आहे. शेवटी शेतकऱ्यांसमोर निसर्गाच्या प्रकोपासमोर काहीही कुणाचेही चालत नाही. गत आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे अडयाळ व परिसरात ह्यकुठे खुशी तर कुठे गमह्ण पाहायला मिळत आहे. शेतातील धान आलेल्या पावसामुळे व सोसाट्याचा वाऱ्यामुळे धानपीक जमीनदोस्त झाले. यावर उपाय म्हणून बरेच शेतकरी गुरुवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतातील पाणी काढण्यात तर काही ठिकाणी शेतकरी शेतात कापणी केलेले धान्य उचलताना दिसून येत आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र अडयाळ व परिसरात पाहायला मिळते आहे.

खर्च झालेला खर्च तरी आता हातात येण्याची शक्यता कमी आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे खर्च भागवणे म्हणजे आता शेतकऱ्यांना जर दिलासा मिळाला तर ठीक आहे. नाहीं तर मग कर्ज भरायची कशी असा प्रश्न आहे. अडयाळ व परिसरात प्रथमत: अळी ने घात केला नंतर पावसाने. पुन्हा धानावर तुडतुडा, करपा रोगाने शेतकरी चिंताजनक स्थितीत असतानाच आता पुन्हा हा अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी आता मोठ्या चिंताजनक स्थितीत सापडला आहे. यावर आता पुढे अजून काय होईल याची सुद्धा चिंता असल्याने शेतकरी आज निराशेच्या छायेत आहे. यावर आता काय उपाययोजना आखली जाते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी अभय शृंगारपवार, देवेंद्र हजारे, शिवशंकर मुंगाटे, युवराज वासनिक, मधू गभने, देविदास नगरे, प्रकाश मानापुरे, मोहन कावळे, राजेंद्र ब्राह्मणकर, सुरेंद्र आयतूलवार व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.याकडे आता लोकप्रतिनिधीनी सुद्धा तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. वर्तमान परिस्थितीत शेतकरी शेतातील पाणी जमेल तेवढी श्रम घेऊन काढण्यात व्यस्त दिसत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती