शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

देव्हाडी उड्डाणपूल बांधकामात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:55 IST

देव्हाडी रेल्वे उड्डाणपूल गोंदिया मार्गावरील बांधकामात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती आहे. भरावात फलाय अ‍ॅश भरुन दोन्ही बाजूला सिमेंट दगड ठेवण्यात आले. दगड ठेवतांनी प्रत्येक इंच ऊंची निश्चित करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष कामात तफावत निर्माण झाल्याने रेल्वे फाटकासमोर ६० ते ७० मीटर अंतरावर तांत्रिक बिघाड आला.

ठळक मुद्देदोन दिवस युद्धस्तरावर कामे : चौकशीदरम्यान उघडकीस आली बाब

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी रेल्वे उड्डाणपूल गोंदिया मार्गावरील बांधकामात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती आहे. भरावात फलाय अ‍ॅश भरुन दोन्ही बाजूला सिमेंट दगड ठेवण्यात आले. दगड ठेवतांनी प्रत्येक इंच ऊंची निश्चित करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष कामात तफावत निर्माण झाल्याने रेल्वे फाटकासमोर ६० ते ७० मीटर अंतरावर तांत्रिक बिघाड आला. शनिवार व रविवारी येथे युध्दस्तरावर कामे करण्यात आली. महागडा बेल्टसह इतर काही साहित्यांचा त्यात नुकसान झाल्याचे समजते.देव्हाडी येथे फाटक क्रमांक ५३२ वर मागील चार वर्षापासून रेल्वे उड्डाणपूलाची कामे सुरु आहेत. पूल भरावात फलाय अ‍ॅशचा भराव करण्यात येत आहे. भरावापूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूला सिमेंट दगड एकावर एक असे ठेवण्यात येते.रेल्वे फाटकापासून ते पूल अ‍ॅप्रोच मार्गावर उतार आहे. उतार हा इंचीप्रमाणे कमी करण्यात येत आहे. रेल्वे फाटकापासून ६० ते ७० मीटर अंतरावर उंचीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला. स्थापत्य अभियंत्यांना चौकशी दरम्यान ही बाब लक्षात आली. त्यानंतर तांत्रिक बिघाड दूर करण्याकरिता शनिवार व रविवारी दिवसभर युध्दस्तरावर कामे करण्यात आली.फलाय अ‍ॅश खाली दोन्ही बाजुच्या दगडांना पकडीकरीता महागडा काळा बेल्ट लावण्यात आला आहे. सदर बेल्ट दगडातून काढण्यात आला.त्याकरिता त्यावर मोठ्या हातोड्याने तो तोडण्यात आल्याची माहिती आहे. दगडाची उंची कमी-जास्त करण्यात आली. येथे महागड्या साहित्यांचेही नुकसान झाले. याप्रकरणी स्थानिक कंत्राटदाराला विचारणा केली असता त्यांनी काहीच माहिती दिली नाही. स्थानिक नागरिकांनी शनिवारी सदर कंत्राटदार दिवसभर मजूरांना व यंत्र चालविणाऱ्यांना मोठमोठ्याने निर्देश देत होते.उड्डाणपूल बांधकामादरम्यान येथे कंत्राटदारानी तांत्रिक व अतांत्रीक कर्मचारी, मजूर वर्ग असतो, पंरतु तांत्रिक व स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचारी येथे उपस्थित राहत नाही. त्यामुळे उड्डापूल बांधकामादरम्यान तांत्रिक बिघाड व अडचणी निर्माण होत असल्याचे समजते. उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने सबंधित विभागाचे तांत्रिक ज्ञान, अनुभव असणारे कर्मचारी येथे उपस्थित राहण्याची गरज आहे.सदर बांधकामादरम्यान तांत्रिक त्रुट्या निर्माण झाल्या तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य मार्गाचे नुकतेच राष्टÑीय महामार्ग म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच सदर रस्त्यावर प्रचंड वाहतुक दिवसभर राहते. सदर निष्कर्ष राज्यमार्ग विभागाने केलेल्या सर्व्हेत समोर आली होती. निश्चितच दर्जेदार कामांची येथे अपेक्षा करण्यात येत आहे.