शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडी उड्डाणपूल बांधकामात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:55 IST

देव्हाडी रेल्वे उड्डाणपूल गोंदिया मार्गावरील बांधकामात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती आहे. भरावात फलाय अ‍ॅश भरुन दोन्ही बाजूला सिमेंट दगड ठेवण्यात आले. दगड ठेवतांनी प्रत्येक इंच ऊंची निश्चित करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष कामात तफावत निर्माण झाल्याने रेल्वे फाटकासमोर ६० ते ७० मीटर अंतरावर तांत्रिक बिघाड आला.

ठळक मुद्देदोन दिवस युद्धस्तरावर कामे : चौकशीदरम्यान उघडकीस आली बाब

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी रेल्वे उड्डाणपूल गोंदिया मार्गावरील बांधकामात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती आहे. भरावात फलाय अ‍ॅश भरुन दोन्ही बाजूला सिमेंट दगड ठेवण्यात आले. दगड ठेवतांनी प्रत्येक इंच ऊंची निश्चित करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष कामात तफावत निर्माण झाल्याने रेल्वे फाटकासमोर ६० ते ७० मीटर अंतरावर तांत्रिक बिघाड आला. शनिवार व रविवारी येथे युध्दस्तरावर कामे करण्यात आली. महागडा बेल्टसह इतर काही साहित्यांचा त्यात नुकसान झाल्याचे समजते.देव्हाडी येथे फाटक क्रमांक ५३२ वर मागील चार वर्षापासून रेल्वे उड्डाणपूलाची कामे सुरु आहेत. पूल भरावात फलाय अ‍ॅशचा भराव करण्यात येत आहे. भरावापूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूला सिमेंट दगड एकावर एक असे ठेवण्यात येते.रेल्वे फाटकापासून ते पूल अ‍ॅप्रोच मार्गावर उतार आहे. उतार हा इंचीप्रमाणे कमी करण्यात येत आहे. रेल्वे फाटकापासून ६० ते ७० मीटर अंतरावर उंचीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला. स्थापत्य अभियंत्यांना चौकशी दरम्यान ही बाब लक्षात आली. त्यानंतर तांत्रिक बिघाड दूर करण्याकरिता शनिवार व रविवारी दिवसभर युध्दस्तरावर कामे करण्यात आली.फलाय अ‍ॅश खाली दोन्ही बाजुच्या दगडांना पकडीकरीता महागडा काळा बेल्ट लावण्यात आला आहे. सदर बेल्ट दगडातून काढण्यात आला.त्याकरिता त्यावर मोठ्या हातोड्याने तो तोडण्यात आल्याची माहिती आहे. दगडाची उंची कमी-जास्त करण्यात आली. येथे महागड्या साहित्यांचेही नुकसान झाले. याप्रकरणी स्थानिक कंत्राटदाराला विचारणा केली असता त्यांनी काहीच माहिती दिली नाही. स्थानिक नागरिकांनी शनिवारी सदर कंत्राटदार दिवसभर मजूरांना व यंत्र चालविणाऱ्यांना मोठमोठ्याने निर्देश देत होते.उड्डाणपूल बांधकामादरम्यान येथे कंत्राटदारानी तांत्रिक व अतांत्रीक कर्मचारी, मजूर वर्ग असतो, पंरतु तांत्रिक व स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचारी येथे उपस्थित राहत नाही. त्यामुळे उड्डापूल बांधकामादरम्यान तांत्रिक बिघाड व अडचणी निर्माण होत असल्याचे समजते. उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने सबंधित विभागाचे तांत्रिक ज्ञान, अनुभव असणारे कर्मचारी येथे उपस्थित राहण्याची गरज आहे.सदर बांधकामादरम्यान तांत्रिक त्रुट्या निर्माण झाल्या तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य मार्गाचे नुकतेच राष्टÑीय महामार्ग म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच सदर रस्त्यावर प्रचंड वाहतुक दिवसभर राहते. सदर निष्कर्ष राज्यमार्ग विभागाने केलेल्या सर्व्हेत समोर आली होती. निश्चितच दर्जेदार कामांची येथे अपेक्षा करण्यात येत आहे.