शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडीच्या उड्डाणपुलामध्ये तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:17 IST

देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : पूलावर भगदाड व खड्डे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते. लहान खड्डेही येथे पडणे सुरु झाले आहे. पोकळी भरुन काढण्याकरिता वायब्रेटरचा उपयोग करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. संपूर्ण तांत्रिक बिघाड दूर होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यतेतून देव्हाडी येथील उड्डाणपूल बांधकाम सुरु आहे. २४ कोटींचा हा उड्डाणपूल आहे. मनसर- तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महार्माचा दर्जा सदर रस्त्याला मिळाला आहे. सदर रस्ता चोवीस तास वर्दळीचा आहे. तुमसरकडील उड्डाणपूल पोचमार्ग काटकोनात नसल्याने पूलातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. याच बाजूला मोठा भगदाड पडला होता.पुलाच्या दोन्ही बाजूला दगडांना घट्ट पकडण्याकरिता बेल्टचा वापर करण्यात आला आहे. बेल्ट दोन्ही दगडांना पकडून ठेवत आहे. दरम्यान पूल भरावातील राख अतिशय गुळगुळीत आहे. दगडातील फटीतून ही राख वाहत आहे. पूलात पाणी शिरण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. काटकोनात पूल नसल्याची माहिती येथे पुढे आली आहे. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानेच पूलावर भगदाड व खड्डे पडणे सुरु झाले आहे.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.देव्हाडी उड्डाणपूलात भरावात घातलेली राख तिरोडा येथील वीज कारखान्यातील रासायनिक फलाय अ‍ॅश आहे. सदर उघड्या राखेवर तिन्ही ऋुतूचा परिणाम होतो. ही राख वापरण्याची परवानगी बांधकाम विभागाने दिली आहे. संबंधित अधिकारी याकडे वायब्रेटरचा वापर करुन राखेला दाबण्याचे सांगत आहेत. सुरुवातीपासूनच सदर पूल चर्चेत आहे, पंरतु आजपर्यंत तज्ज्ञाचे पथक येथे आले नाही. केवळ संबंधित खात्याचे वरिष्ठ स्थापत्य अभियंते येथे पाहणी करुन जात आहेत.बांधकामाची गुणवत्ता कमी की तांत्रीक बिघाडउड्डाणपूलाचे बांधकामात सिमेंट दगडांचा वापर करण्यात आला आहे. येथे बांधकामाची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहे की तांत्रिक बिघाड याचा खुलासा केवळ संबंधित विषयाचे तज्ज्ञच करु शकतात. राज्य शासनाने पूलाबाबत गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश येथे देण्याची गरज आहे.