शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

देव्हाडीच्या उड्डाणपुलामध्ये तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:17 IST

देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : पूलावर भगदाड व खड्डे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते. लहान खड्डेही येथे पडणे सुरु झाले आहे. पोकळी भरुन काढण्याकरिता वायब्रेटरचा उपयोग करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. संपूर्ण तांत्रिक बिघाड दूर होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यतेतून देव्हाडी येथील उड्डाणपूल बांधकाम सुरु आहे. २४ कोटींचा हा उड्डाणपूल आहे. मनसर- तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महार्माचा दर्जा सदर रस्त्याला मिळाला आहे. सदर रस्ता चोवीस तास वर्दळीचा आहे. तुमसरकडील उड्डाणपूल पोचमार्ग काटकोनात नसल्याने पूलातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. याच बाजूला मोठा भगदाड पडला होता.पुलाच्या दोन्ही बाजूला दगडांना घट्ट पकडण्याकरिता बेल्टचा वापर करण्यात आला आहे. बेल्ट दोन्ही दगडांना पकडून ठेवत आहे. दरम्यान पूल भरावातील राख अतिशय गुळगुळीत आहे. दगडातील फटीतून ही राख वाहत आहे. पूलात पाणी शिरण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. काटकोनात पूल नसल्याची माहिती येथे पुढे आली आहे. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानेच पूलावर भगदाड व खड्डे पडणे सुरु झाले आहे.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.देव्हाडी उड्डाणपूलात भरावात घातलेली राख तिरोडा येथील वीज कारखान्यातील रासायनिक फलाय अ‍ॅश आहे. सदर उघड्या राखेवर तिन्ही ऋुतूचा परिणाम होतो. ही राख वापरण्याची परवानगी बांधकाम विभागाने दिली आहे. संबंधित अधिकारी याकडे वायब्रेटरचा वापर करुन राखेला दाबण्याचे सांगत आहेत. सुरुवातीपासूनच सदर पूल चर्चेत आहे, पंरतु आजपर्यंत तज्ज्ञाचे पथक येथे आले नाही. केवळ संबंधित खात्याचे वरिष्ठ स्थापत्य अभियंते येथे पाहणी करुन जात आहेत.बांधकामाची गुणवत्ता कमी की तांत्रीक बिघाडउड्डाणपूलाचे बांधकामात सिमेंट दगडांचा वापर करण्यात आला आहे. येथे बांधकामाची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहे की तांत्रिक बिघाड याचा खुलासा केवळ संबंधित विषयाचे तज्ज्ञच करु शकतात. राज्य शासनाने पूलाबाबत गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश येथे देण्याची गरज आहे.