शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

डॉ.बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:48 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वसमावेश तरतुदी करुन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क प्रदान केले आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज या ठिकाणी जेवढया माहिला उपस्थित आहेत, ....

ठळक मुद्देविनीता साहू : सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वसमावेश तरतुदी करुन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क प्रदान केले आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज या ठिकाणी जेवढया माहिला उपस्थित आहेत, त्यांच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. थोर पुरुषांची जास्तीत जास्त माहिती वाचावी, बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा असा दिलेला मुलमंत्र सर्वांनी अंगिकारावा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केले.डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन सामाजिक न्याय भवनात करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, उपस्थित होते. विनीता साहू पुढे म्हणाल्या की, फक्त पुस्तक वाचन करुन शिक्षण पूर्ण होत नाही, तर ते अनुभवातून पूर्ण होते. माणसाने स्वत:ची ओळख तयार करायला पाहिजे. माणूसकीची ओळख जपा, स्वत:वर विश्वास ठेवा. जीवन संघर्षमय आहे, जीवनात खुप चढ-उतार असतात त्यांचा सामना करा. आपण स्वत:साठी खूप जगलेत आता देशासाठी, समाजासाठी व इतरांसाठी जगा. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगिकारा, असे त्यांनी सांगितले. यावेळी अमित मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या मौलिक कार्यावर प्रकाश टाकून त्यांनी भारतीय राज्य घटनेद्वारे समतेसाठी लढा उभारला असल्याचे सांगितले.प्रास्ताविक करतांना आशा कवाडे यांनी सांगितले की, भारतीय राज्य घटनेमध्ये दलित समाज पुढे येण्यासाठी तरतूद केलेली आहे. त्यामाध्यमातून मागासवर्गींयांचा विकास व्हावा याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय समाजाचा बौध्दीक व शारिरिक सार्वांगिण विकास व्हावा याकरीता व्यसनमुक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.विद्यार्थ्यांकरीता समता दूतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनावर गीत सादर केले. तसेच ओयॉसिस कोचिंग क्लासेसचे संचालक नंदेश्वर यांनी विद्यार्थ्यांसाठी करीअर गाईडन्सचा कार्यक्रम घेतला. संचालन समाज कल्याण निरिक्षक पराग वासनिकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार गृहपाल रजनी वैद्य यांनी मानले. या कार्यक्रमास समाजकार्य महाविद्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेतील कर्मचारी, समता दूत, विद्यार्थी व बी.व्ही.जी. कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.