शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

डॉ.बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:48 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वसमावेश तरतुदी करुन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क प्रदान केले आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज या ठिकाणी जेवढया माहिला उपस्थित आहेत, ....

ठळक मुद्देविनीता साहू : सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वसमावेश तरतुदी करुन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क प्रदान केले आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज या ठिकाणी जेवढया माहिला उपस्थित आहेत, त्यांच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. थोर पुरुषांची जास्तीत जास्त माहिती वाचावी, बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा असा दिलेला मुलमंत्र सर्वांनी अंगिकारावा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केले.डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन सामाजिक न्याय भवनात करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, उपस्थित होते. विनीता साहू पुढे म्हणाल्या की, फक्त पुस्तक वाचन करुन शिक्षण पूर्ण होत नाही, तर ते अनुभवातून पूर्ण होते. माणसाने स्वत:ची ओळख तयार करायला पाहिजे. माणूसकीची ओळख जपा, स्वत:वर विश्वास ठेवा. जीवन संघर्षमय आहे, जीवनात खुप चढ-उतार असतात त्यांचा सामना करा. आपण स्वत:साठी खूप जगलेत आता देशासाठी, समाजासाठी व इतरांसाठी जगा. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगिकारा, असे त्यांनी सांगितले. यावेळी अमित मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या मौलिक कार्यावर प्रकाश टाकून त्यांनी भारतीय राज्य घटनेद्वारे समतेसाठी लढा उभारला असल्याचे सांगितले.प्रास्ताविक करतांना आशा कवाडे यांनी सांगितले की, भारतीय राज्य घटनेमध्ये दलित समाज पुढे येण्यासाठी तरतूद केलेली आहे. त्यामाध्यमातून मागासवर्गींयांचा विकास व्हावा याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय समाजाचा बौध्दीक व शारिरिक सार्वांगिण विकास व्हावा याकरीता व्यसनमुक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.विद्यार्थ्यांकरीता समता दूतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनावर गीत सादर केले. तसेच ओयॉसिस कोचिंग क्लासेसचे संचालक नंदेश्वर यांनी विद्यार्थ्यांसाठी करीअर गाईडन्सचा कार्यक्रम घेतला. संचालन समाज कल्याण निरिक्षक पराग वासनिकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार गृहपाल रजनी वैद्य यांनी मानले. या कार्यक्रमास समाजकार्य महाविद्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेतील कर्मचारी, समता दूत, विद्यार्थी व बी.व्ही.जी. कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.