शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या धोरणामुळे शिक्षक कर्मचारी त्रस्त

By admin | Updated: May 6, 2016 00:33 IST

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला विज्ञानाची प्रयोगशाळा बनवून शासनाचा शिक्षण विभाग नवनवे प्रयोग करू पाहत आहे.

पटनोंदणीवर परिणाम : संच मान्यतेचा तिढा कायम, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर अशोक पारधी पवनीशिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला विज्ञानाची प्रयोगशाळा बनवून शासनाचा शिक्षण विभाग नवनवे प्रयोग करू पाहत आहे. दैनंदिन होत असलेल्या धोरणातील बदलामुळे मराठी माध्यमाच्या शाळेत काम करणारे शिक्षक कर्मचारी त्रस्त झाले आहेत. शासनाच्या कोणत्याही धोरणात स्पष्टता नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीवर परिणाम होऊ लागला आहे.शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ राज्याने केंद्राचे धर्तीवर लागू केला परंतू महाराष्ट्रात अन्य राज्याचे तुलनेत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा सुरू आहेत व त्यादेखील इयत्ता १ ली ते ४ थी प्राथमिक स्तर, इसत्ता ५ वी ते ७ वी उच्च माध्यमिक स्तर, इयत्ता ८ वी ते १० वी माध्यमिक स्तर व इयत्ता ११ वी व १२ वी उच्च माध्यमिक स्तर या वर्गवारीच्या शाळा सुरू असल्याने शिक्षणाचा अधिकारी अधिनियम २००९ ची अंमलबजावणी करताना शिक्षण विभागाची तारांबळ उडत आहे. इयत्ता ४ थी ला ५ वी जोडताना तसेच इयत्ता ७ वी ला ८ वी जोडताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात विद्यार्थी भरतीसाठी दारोदार भटकणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना घामाघाम व्हावे लागत आहे. नवीन शाळा किंवा वर्ग सुरू करताना अंतराची घट ठेवावी लागते, असे कायदा सांगत असताना अधिकारी वर्गाने अंतराचे अटीचा पत्रात उल्लेख न केल्यामुळे इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळांनी कंबर कसली आहे. एक काळ असा होता जेव्हा विद्यार्थी शाळा प्रवेशासाठी यायचे काळ बदलला आता शाळेला विद्यार्थ्यांच्या दारावर प्रवेश घ्या हे सांगायला जावे लागत आहे. अनैसर्गीक स्पर्धा व इंग्रजी शाळांचा झगमगाट यामुळे मराठी माध्यमात शिकविणाऱ्या शिक्षकांना अतिरिक्त होण्याचे भितीपोटी विद्यार्थ्यांच्या पालकांना आमिष देऊन प्रवेशासाठी हातपाय जोडावे लागत आहे.इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्याच्या गुंता सुटायच्या आंतच इयत्ता ९ वी १० वीचे वर्गासाठी जिल्हा परिषदाच्या शाळांनी प्रस्ताव पाठवावा, असे पत्र समाज माध्यमाद्वारे लोकांना वाचायला मिळत आहे. शासनाला नेमके काय साध्य करावयाचे आहे हे कोणाला कळेनासे झाले आहे. बँकाचे राष्ट्रीयीकरण होते तसेच शासनाने एक फतवा काढून सर्वच शाळांना शासकीय शाळा संबोधल्या. शिक्षण क्षेत्रातील प्रयोग थांबू शकतात. लोक सुशिक्षित झाल्याने जन्मदर कमी झाला. त्यामुळे एका तुकडीत कमीतकमी विद्यार्थी असावेत असे असताना तुकडीतील विद्यार्थी संख्या वाढलेली जात आहे. त्यामुळे गावेड्यात गाव तिथे शाळा या धोरणामुळे अत्यल्प पटसंख्या असलेल्या शाळा सुरू आहेत. शासनाने पटसंख्येवर आधारित शिक्षक मान्य करण्याचे धोरण ठरविल्याने बहुवर्ग शिक्षण पद्धती अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुल्याधिष्ठीत शिक्षण मिळणे कठीण झालेले आहे.संचमान्यतेचा तिढा कायम असल्याने अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर टांगलेला आहे. प्रश्न सुटण्याऐवजी क्लिष्ट होत आहे. तरीही शिक्षण विभाग निर्णय घेण्यास विलंब लावत आहे. इयत्ता ५ वी व ८ वी मध्ये पटनोंदणी करीता संपूर्ण जिल्ह्यातील माध्यमिक शाळाच्या शिक्षकांची दमछाक होवू लागली आहे. अहोरात्र फिरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी तयार करणे व त्यासाठी पालकांना आमिष देणे सुरू झाले आहे.