शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

गोसीखुर्द धरणावर ताट-वाटी, घागर मोर्चा

By admin | Updated: November 25, 2014 22:49 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांची शेती आणि घरे गेली. त्यात त्यांचे उपजिविकेची साधने बुडाल्यामुळे त्यांच्याजवळ आता काहीच उरले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी

मोबदला देण्याची मागणी : आणखी किती दिवस करायचा संघर्ष- प्रकल्पगोसेबुज : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांची शेती आणि घरे गेली. त्यात त्यांचे उपजिविकेची साधने बुडाल्यामुळे त्यांच्याजवळ आता काहीच उरले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ताट, वाटी, चमचे वाजवित गुंड घागरी, मासे पकडण्याचे धुटी घेऊन गोसीखुर्द धरणावर मोर्चा काढला. संतप्त आंदोलनकर्ते सुरक्षेचे कडे तोडून मुख्य धरणापर्यंत पोहोचले.या मोर्चात पिण्याच्या पाण्याच्या समस्येकरिता घागरी, अन्न सुरक्षेकरिता ताट, वाटी, चमचे, शिक्षण व प्रशिक्षण, नोकरी, रोजगार या समस्येकरिता पाट्या व नदीवरील उदरनिर्वाहाकरिता मासेमारांचे साहित्य असलेले धुट्या, पेलण्या, जाळे घेऊन प्रकल्पग्रस्त मोर्चात सहभागी झाले. सकाळी ११ वाजतापासून बुडीत क्षेत्रातील भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पाथरी पुनर्वसन ठिकाणी येणे सुरु झाले. हजारो प्रकल्पग्रस्त जमा झाल्यानंतर दुपारी १ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये पाथरी, पेंढरी, मेंढा, जामगाव, गिरोला, चिचखेडा, नवेगाव, गोसेबुज, गाडेघाट, घाटउमरी, सौंदड, मालची, गोसीखुर्द, नेरला आदी गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले. संघर्ष हमारा नारा है, प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरी द्या, प्रकल्पग्रस्तांना पैसा द्या आदी घोषणांसह ताट, वाटी, चमचे वाजवून प्रकल्पग्रस्तांनी परीसर दनाणून सोडला होता. मोर्चा मार्गक्रमण करीत २ वाजता धरणावर जलविद्युत निर्मीती प्रकल्पाजवळ पोहोचताच तेथील सुरक्षा रक्षकांच्या विरोधाला न जुमानता प्रकल्पग्रस्तांनी मुख्य धरणापर्यंत धडक दिली.मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेमध्ये गावागावातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रकल्पग्रस्तांना सरकारी, निमसरकारी, खासगी कंपन्यात नोकरी मिळावी, व्यवसायाकरिता १२ लाख रुपयांचे पॅकेज प्रत्येक कुटुंबाला मिळावे, प्रकल्पग्रस्तांना पेंशन मिळावी, जलाशयात मासेमारीचा हक्क मिळावा, १२०० कोटी रुपयाच्या पुनर्वसन पॅकेज वाटपाचा हिशोब जाहीर करावा आदी मागण्या ठेवल्या. जेव्हापर्यंत शासकीय अधिकारी आंदोलनस्थळी येऊन प्रकल्पग्रस्तांचे समाधान करणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा ईशारा दिला. सायंकाळपर्यंत आंदोलन सुरुच होते.या मोर्चाचे आयोजन गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केले होते. यावेळी संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, विठोबा समरीत, मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी दादा आगरे, लक्ष्मीकांत तागडे यांच्या नेतृत्वात पाथरीच्या सरपंचा रिना भुरे, सोमेश्वर भुरे, विनोद शेंडे, गुलाब मेश्राम, सुनंदा समरीत, वामन सेलोकर, समीक्षा गणवीर, किशोर समरीत, स्मृती मेश्राम, केशव हटवार, प्रकाश मेश्राम, गणेश आगरे करीत आहेत. अड्याळचे पोलीस उपनिरीक्षक नेवारे हे स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)