शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द धरणावर ताट-वाटी, घागर मोर्चा

By admin | Updated: November 25, 2014 22:49 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांची शेती आणि घरे गेली. त्यात त्यांचे उपजिविकेची साधने बुडाल्यामुळे त्यांच्याजवळ आता काहीच उरले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी

मोबदला देण्याची मागणी : आणखी किती दिवस करायचा संघर्ष- प्रकल्पगोसेबुज : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांची शेती आणि घरे गेली. त्यात त्यांचे उपजिविकेची साधने बुडाल्यामुळे त्यांच्याजवळ आता काहीच उरले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ताट, वाटी, चमचे वाजवित गुंड घागरी, मासे पकडण्याचे धुटी घेऊन गोसीखुर्द धरणावर मोर्चा काढला. संतप्त आंदोलनकर्ते सुरक्षेचे कडे तोडून मुख्य धरणापर्यंत पोहोचले.या मोर्चात पिण्याच्या पाण्याच्या समस्येकरिता घागरी, अन्न सुरक्षेकरिता ताट, वाटी, चमचे, शिक्षण व प्रशिक्षण, नोकरी, रोजगार या समस्येकरिता पाट्या व नदीवरील उदरनिर्वाहाकरिता मासेमारांचे साहित्य असलेले धुट्या, पेलण्या, जाळे घेऊन प्रकल्पग्रस्त मोर्चात सहभागी झाले. सकाळी ११ वाजतापासून बुडीत क्षेत्रातील भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पाथरी पुनर्वसन ठिकाणी येणे सुरु झाले. हजारो प्रकल्पग्रस्त जमा झाल्यानंतर दुपारी १ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये पाथरी, पेंढरी, मेंढा, जामगाव, गिरोला, चिचखेडा, नवेगाव, गोसेबुज, गाडेघाट, घाटउमरी, सौंदड, मालची, गोसीखुर्द, नेरला आदी गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले. संघर्ष हमारा नारा है, प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरी द्या, प्रकल्पग्रस्तांना पैसा द्या आदी घोषणांसह ताट, वाटी, चमचे वाजवून प्रकल्पग्रस्तांनी परीसर दनाणून सोडला होता. मोर्चा मार्गक्रमण करीत २ वाजता धरणावर जलविद्युत निर्मीती प्रकल्पाजवळ पोहोचताच तेथील सुरक्षा रक्षकांच्या विरोधाला न जुमानता प्रकल्पग्रस्तांनी मुख्य धरणापर्यंत धडक दिली.मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेमध्ये गावागावातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रकल्पग्रस्तांना सरकारी, निमसरकारी, खासगी कंपन्यात नोकरी मिळावी, व्यवसायाकरिता १२ लाख रुपयांचे पॅकेज प्रत्येक कुटुंबाला मिळावे, प्रकल्पग्रस्तांना पेंशन मिळावी, जलाशयात मासेमारीचा हक्क मिळावा, १२०० कोटी रुपयाच्या पुनर्वसन पॅकेज वाटपाचा हिशोब जाहीर करावा आदी मागण्या ठेवल्या. जेव्हापर्यंत शासकीय अधिकारी आंदोलनस्थळी येऊन प्रकल्पग्रस्तांचे समाधान करणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा ईशारा दिला. सायंकाळपर्यंत आंदोलन सुरुच होते.या मोर्चाचे आयोजन गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केले होते. यावेळी संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, विठोबा समरीत, मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी दादा आगरे, लक्ष्मीकांत तागडे यांच्या नेतृत्वात पाथरीच्या सरपंचा रिना भुरे, सोमेश्वर भुरे, विनोद शेंडे, गुलाब मेश्राम, सुनंदा समरीत, वामन सेलोकर, समीक्षा गणवीर, किशोर समरीत, स्मृती मेश्राम, केशव हटवार, प्रकाश मेश्राम, गणेश आगरे करीत आहेत. अड्याळचे पोलीस उपनिरीक्षक नेवारे हे स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)