शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तुमसर एमआयडीसीत उद्योग दिले भाडेतत्त्वावर!

By admin | Updated: June 17, 2016 00:34 IST

तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे एमआयडीसीत कारखान्याची परस्पर विक्री, कारखाना भाडेतत्वावर देणे, भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आले.

भूखंडाची परस्पर विक्री : प्रदूषण नियंत्रण मंडळ अनभिज्ञमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे एमआयडीसीत कारखान्याची परस्पर विक्री, कारखाना भाडेतत्वावर देणे, भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आले. अनेक वर्षापासून या जागेवर उद्योगही सुरू झालेले नाही. तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर देव्हाडी येथे सन १९९० मध्ये एमआयडीसी स्थापन झाली होती. शेतकऱ्यांकडून कवडीमोल किमतीत शेती खरेदी करण्यात आली. गाजावाजा करून उद्योगधंदे येणार अशा घोषणा झाल्या. परंतु मागील २६ वर्षापासून येथे एकही मोठा उद्योग स्थापन झाला नाही. केवळ पाच उद्योगधंदे येथे सुरु आहेत. उर्वरीत भूखंड रिकामेच आहेत.वर्षभरापूर्वी एका उद्योजकाने भाडेतत्वावर उद्योग घेतला. नियमानुसार भाडे तत्वावर उद्योग देता येत नसताना परस्पर भाडे तत्वावर हा उद्योग दिला आहे. अपवादात्मकवेळी एमआयडीसीकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. याकरिता शासनाच्या परवानगीची गरज लागते. भाडेतत्वावर घेतलेला हा उद्योग केवळ रात्रीच सुरू असतो. देव्हाडी येथे रात्री धुराचे लोळ दिसतात. त्याला लागूनच नागरिकांची वस्ती आहे. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते हा प्रश्न येथे उपस्थित होतो.भूखंडाची विक्रीया एमआयडीसीत भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आली असून भूखंड एकाच्या नावाने व उद्योग दुसऱ्याने सुरु केला आहे. या एमआयडीसीत मॅग्नीजवर आधारित उद्योगच सुरु आहेत. इतर उद्योग बंद आहेत. नियमानुसार भूखंडाची विक्री करता येत नसताना दोन्ही उद्योजकांनी सामंजस्याने हा प्रकार केला आहे. शासनाची दिशाभूल करणारा हा प्रकार असून याबाबत संबंधित विभागाने चौकशी अद्यापपावेतो केली नाही. १५ ते २० एकरात एमआयडीसी आहे. शासनाच्या नियमानुसार भूखंड घेतल्यावर तीन वर्षात उद्योग सुरु करण्याचा नियम आहे. परंतु येथे २५ वर्षापासून उद्योग सुरु नाही.रिकाम्या जागेवर एका उद्योजकाने झाडांची नर्सरी लावली आहे. दुसरीकडे एमआयडीसीत भूखंड रिकामे नाही असे सांगतात. काही उद्योगांना येथे मोठे भूखंड देण्यात आले. परंतु अतिरिक्त जागा रिकामीच पडून आहे. देव्हाडी एमआयडीसीत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचा पाणी फिल्टर प्लांट तयार केला आहे. हा फिल्टर प्लांट बंदच आहे. १० ते १२ गावांना येथून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता हा फिल्टर प्लांट बांधण्यात आला होता. उद्योगाकरिता येथे भूखंड देण्याचा नियम आहे. देव्हाडी एमआयडीसीतील या प्रकरणाची चौकशी केली तर अनेक अनियमित कामे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.