शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
6
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
7
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
8
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
9
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
10
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
11
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
13
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
14
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
15
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
16
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
17
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
18
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
19
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
20
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

स्मशानभूमीत उभारला ताडपत्रीचा सभामंडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

०१ लोक ०५ के चुल्हाड (सिहोरा) : लोकप्रतिनिधींनी सभा मंडप बांधकामासाठी निधी दिला नसल्याने गावकऱ्यांनी दु:खितांना मायेचा आधार देण्यासाठी ...

०१ लोक ०५ के

चुल्हाड (सिहोरा) : लोकप्रतिनिधींनी सभा मंडप बांधकामासाठी निधी दिला नसल्याने गावकऱ्यांनी दु:खितांना मायेचा आधार देण्यासाठी थेट स्मशानभूमीत ताडपत्रीचा मंडप उभारला आहे. बिनाखीवासीयांनी प्रेरणादायी निर्णय घेतला असल्याने कौतुक होत आहेत.

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात असणाऱ्या स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अनेक निवेदने दिली आहेत. गावकऱ्यांना बेदखल करण्यात आले आहे. स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधकाम मंजूर करण्याची ओरड होती. पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले नसल्याने गावकऱ्यांनी थेट लोकसहभागातून पुलाचे बांधकाम केले आहे. यामुळे मृतदेह नेताना त्रास कमी झाला आहे. नाल्यापासून स्मशानभूमीपर्यंत पक्का रस्ता नाही. पायवाटेने जावे लागत आहे. लोकप्रतिनिधी व शासनाच्या उदासीनतेमुळे गावकरी चांगलेच संतापले आहेत. याच स्मशानभूमीत आप्तस्वकियांसाठी सभामंडप मंजूर करण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून करीत आहेत. गावकऱ्यांना ‘तारीख पे तारीख’ दिल्या जात आहेत. स्मशानभूमीत ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने झाडाचा आश्रय आप्तस्वकीय घेत आहेत. याच झाडात शोकसभा घेण्याची वेळ आप्तस्वकियांवर आली आहे. आधीच दुःखात असणाऱ्या आप्तस्वकियांना आधार व सेवा देण्यासाठी उदासीनता दिसून येत असल्याने गावकऱ्यांनी लोकसहभागातून ताडपत्रीचा सभामंडप तयार करण्याचा निर्णय घेतला. स्मशानभूमीत ताडपत्रीचा सभामंडप तयार केल्याने ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी मदतीचे ठरत आहे. गावकऱ्यांनी दु:खितांना मायेचा आधार देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. स्मशानभूमीत सभामंडप उभारल्यानंतर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. सामान्य जनतेला सुविधा देण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचा अनुभव गावकरी घेत आहेत. स्मशानभूमीत रस्ता, पूल, सभामंडप, बोअरवेल्स मंजूर करण्यात येत नाही. जिल्हा परिषदअंतर्गत अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजना स्मशानभूमीत पोओचल्या नाहीत. गावाला विकासाच्या बाबतीत उपेक्षित ठेवण्यात येत असल्याचे आरोप गावात होत आहेत.

"स्थानिक स्मशानभूमीत रस्ता, पूल, बोअरवेल्स, सभामंडप बांधकाम मंजूर करण्यासाठी अनेक निवेदने दिली आहेत. परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. यामुळे लोकसहभागातून सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. ताडपत्रीचा मंडप उभारण्यात आल्याने ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी मदतीचे ठरत आहे. या समस्येकडे लक्ष घातले पाहिजे.

देवेंद्र मेश्राम, माजी उपसरपंच, बिनाखी